आत्ताच राजू परुळेकरांची सचिनवरची अल्केमिस्ट्री वाचली. सचिनला नावे ठेवून मोठे, प्रसिद्ध होण्याचा किंवा मोठ्या माणसांना आपल्या अज्ञानामुळे दुर्बोध ठरवून प्रसिद्धीचा झोत आपल्यावर वळवण्याचा दुष्फळ प्रयत्न करणाऱ्या अनेक कपाळ करंट्यान्च्या टीम मध्ये राजू परुळेकर याचंही नाव झळकल तर. सचिनचं कौतुक केल म्हणजे Dr हिम्मतराव बावस्कर किंवा मंदा/प्रकाश आमटे यांचा अनादर केला अस कुठे होत? शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष? परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना? आपण का नाही करत काही? आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो तेवढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना ? उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का? म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का? हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का? हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय? परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात ? किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत? नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते (??) ती आपण करता सचिनला क्रिकेट चांगल जमत तो क्रिकेट खेळतो. अमुक तमुक पत्रकाराने पत्रकारिता करण्यापेक्षा ISRO मध्ये जाऊन rockets का नाही उडवली किंवा हेमलकसा मध्ये जाऊन आदिवासी लोकांविषयी कार्य का नाही केल अशी बाष्कळ बडबड सचिनने केल्याच मी तरी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. सचिन, Dr बावस्कर, आमटे दाम्पत्य हे सगळे अशा गोष्टींच्या पार पुढे गेलेले आहेत. फार महान लोक आहेत ते. पण तुमच्या सारख्या पत्रकारांना ते जमण किती कठीण आहे ते दिसतच आहे.
राहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष? पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार? ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)
आणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.
राहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. !!!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Friday, November 20, 2009
Thursday, November 12, 2009
तेव्हा कुठे गेला होता स.पा.सुता तुझा धर्म अर्थात.... आपला तो बाब्या... !!
अबु च्या "धोपट" विधी (म. टा.चा शब्द :-) ) नंतर अपेक्षेनुसारच बरीच चर्वितचर्वण, चर्चा, लेख, मुलाखती, छोटे दंगे, जाळपोळ सगळंच झालं. मनसैनिकांनी अबु आझमीला फटकावलं ते चुक की बरोबर, का फटकावलं, सभागृहात न फटकावता रस्त्यावर फटकावायला हवं होतं की हे काहीच न करता सत्याग्रही मार्गाने धरणं देत बसून राहायला हवं होतं या सगळ्या वादविवादात आत्ता मी शिरत नाही कारण तो आजच्या लेखाचा मुद्दा नाही.
अबु आणि सपाचा (मी चुकुन सापाचा टाइप करत होतो. कीबोर्ड पण मनकवडा रे बाबा ;-) ) मराठीतून शपथ घेण्याला विरोध होता तो या दोन मुद्द्यांवर की
1. त्याला मराठी येत नाही आणि
2. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीत शपथ घेण्याचा त्याला अधिकार आहे.
दोन्ही प्रश्नांची उत्तरे तशी सोप्पी आहेत. प्रथम म्हणजे मराठी येत नसली तरी तो ती शिकु शकला असता किंवा अगदीच सुवर्णमध्य काढायचा झाल्यास शपथेची पहिली ओळ मराठीत आणि उरलेली शपथ हिंदीत घेऊ शकला असता. (सत्यनारायाणाच्या पुजेत आपले भटजी अध्याय वाचताना पहिली ओळ संस्कृत मधे वाचतात आणि त्यापुढचा अध्याय मराठीत सांगतात नाही का.. अगदी तसंच) अर्थात असे करण्याला घटनात्मक आधार आहे का ते मला माहीत नाही पण हे न चालण्यमागचं लॉजिक माझ्या सामान्य मेंदूला तरी काही दिसत नाही. असो.
दुसरा प्रश्न हा मुळातच चुकीचा आहे. बर्याच जणांना माहीत असेल (नसेल) की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ती (वन ऑफ द) अधिकृत भाषा आहे. किंबहुना कुठल्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही. आहेत त्या सगळ्या अधिकृत भाषा. भाषावार प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्याची राज्यभाषा हीच त्या राज्याची अधिकृत भाषा आहे. आणि कुठलीही एकच अशी राष्ट्रभाषा नसल्याने राज्याचा व्यवहार करताना (मंत्रीमंडळाचे कामकाज, शपथविधी इ. इ.) ते राज्यभाषेतच व्हायला हवेत. खरं ना? पण आझमीने राज्यभाषेचं अस्तित्व, महत्व नाकारून हिंदीतून शपथ घेण्याचा हट्ट धरला आणि उपस्थित गांधारी, धृतराष्ट्रांच्या साक्षीने तो फळालाही नेला.. आणि त्याउप्पर जाउन मुलायमने अबु कसा बरोबर आहे, "मनसेने भारतीय संविधान का अपमान किया है" तर अमरसिंगाने एक पायरी/पातळी खाली उतरून "हिंदी हमारी माँ है और आज हमारी माँ नंगी हो गई" असल्या बिनडोक उद्गाराननी हिंदी चॅनेल्सच्या रिपोर्टर्सना बाइट्स दिले. तर आता या मुल्लू, अमुच्या टीमला आपण एक प्रश्न विचारूया..
बरोबर १३ वर्षांपूर्वी उ. प्र. च्या विधानसभेतही शपथ घेण्याच्या भाषेवरून असाच वाद झाला होता. तेव्हा स. पा. च्या पिलावळीतले दोन नेते मियाँ आलम बादी आणि मियाँ वासिम अहमद यांनी आझमी सारखाच वाद घातला होता. त्यांना हिंदीतून शपथ घ्यायची नव्हती तर उर्दूतून घ्यायची होती. उ. प्र. मधे उर्दू बोलणार्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे उर्दूला तिथे द्वितीय क्रमांकाच्या अधिकृत भाषेचा दर्जा आहे. परंतु त्यांना तेव्हा "देवनागरी लिपी असलेल्या भाषेतच शपथ घेऊ शकता" या कारणावरून अडवण्यात आले आणि उर्दुत शपथ घ्यायला मज्जाव केला गेला. मग त्यांनी विधानसभेबाहेर धरणी वगैरे धरली पण तरीही तत्कालीन अध्यक्ष श्री. केशरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना उर्दूतून शपथ घेण्यास परवानगी दिली नाही आणि वर हे ही सुनावले की कुठलं योग्य कारण न देता जर ते सभागृहात अनुपस्थित राहीले तर त्यांना निलंबित केले जाईल. आणि शेवटी सगळ्या सव्यापसव्यानंतर आणि मुलायम सिंगांच्या मध्यस्थी नंतर त्या दोघांनी हिंदीत शपथ घेतली. त्यासंबंधीची बातमी इथे वाचा. म्हणजे त्यांनी एवढा गाजावाजा, सत्याग्रह, धरणी करूनही तेव्हाचे सरकार त्यांच्या पुढे नमले नाही उलट सरकारचा, मंत्रीमंडळाचा, राज्याचा निर्णय मान्य करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. प्रसंगी निलंबनाच्या कारवाईची भीतीही घालण्यात आली. पण वाईट वाटतं ते एवढच की ही एवढी धमक ना महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष सरकारमधे आहे, ना मराठी-हिन्दू चा सी-साँ खेळणार्या विरोधी पक्षांमधे आहे, ना दिल्लीच्या दावणीला बांधलेल्या मीडियामधे आहे की असा दबाव आपल्या राज्यभाषेचा अपमान कराणार्यँच्यावर टाकला जाईल. दुःख आहे ते म्हातारी मेल्याचंही आणि काळ सोकावल्याचंही. म्हणजे तेव्हा हिंदीच्या विरुद्ध आणि उर्दूच्या बाजूने लढणारेच आता हिंदीच्या बाजूने आणि मराठीच्या विरुद्ध लढतायंत, हिंदीच्या बाजूने लढत असल्याचा, हिंदी भाषिकांचा कैवारी असल्याचा किमान देखावा तरी निर्माण करण्यात यशस्वी होतायंत. तेव्हा कुठे गेला होता स. पा. सुता तुझा धर्म एवढंच म्हणू शकतो आपण.. !!!
अबु आणि सपाचा (मी चुकुन सापाचा टाइप करत होतो. कीबोर्ड पण मनकवडा रे बाबा ;-) ) मराठीतून शपथ घेण्याला विरोध होता तो या दोन मुद्द्यांवर की
1. त्याला मराठी येत नाही आणि
2. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीत शपथ घेण्याचा त्याला अधिकार आहे.
दोन्ही प्रश्नांची उत्तरे तशी सोप्पी आहेत. प्रथम म्हणजे मराठी येत नसली तरी तो ती शिकु शकला असता किंवा अगदीच सुवर्णमध्य काढायचा झाल्यास शपथेची पहिली ओळ मराठीत आणि उरलेली शपथ हिंदीत घेऊ शकला असता. (सत्यनारायाणाच्या पुजेत आपले भटजी अध्याय वाचताना पहिली ओळ संस्कृत मधे वाचतात आणि त्यापुढचा अध्याय मराठीत सांगतात नाही का.. अगदी तसंच) अर्थात असे करण्याला घटनात्मक आधार आहे का ते मला माहीत नाही पण हे न चालण्यमागचं लॉजिक माझ्या सामान्य मेंदूला तरी काही दिसत नाही. असो.
दुसरा प्रश्न हा मुळातच चुकीचा आहे. बर्याच जणांना माहीत असेल (नसेल) की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ती (वन ऑफ द) अधिकृत भाषा आहे. किंबहुना कुठल्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही. आहेत त्या सगळ्या अधिकृत भाषा. भाषावार प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्याची राज्यभाषा हीच त्या राज्याची अधिकृत भाषा आहे. आणि कुठलीही एकच अशी राष्ट्रभाषा नसल्याने राज्याचा व्यवहार करताना (मंत्रीमंडळाचे कामकाज, शपथविधी इ. इ.) ते राज्यभाषेतच व्हायला हवेत. खरं ना? पण आझमीने राज्यभाषेचं अस्तित्व, महत्व नाकारून हिंदीतून शपथ घेण्याचा हट्ट धरला आणि उपस्थित गांधारी, धृतराष्ट्रांच्या साक्षीने तो फळालाही नेला.. आणि त्याउप्पर जाउन मुलायमने अबु कसा बरोबर आहे, "मनसेने भारतीय संविधान का अपमान किया है" तर अमरसिंगाने एक पायरी/पातळी खाली उतरून "हिंदी हमारी माँ है और आज हमारी माँ नंगी हो गई" असल्या बिनडोक उद्गाराननी हिंदी चॅनेल्सच्या रिपोर्टर्सना बाइट्स दिले. तर आता या मुल्लू, अमुच्या टीमला आपण एक प्रश्न विचारूया..
बरोबर १३ वर्षांपूर्वी उ. प्र. च्या विधानसभेतही शपथ घेण्याच्या भाषेवरून असाच वाद झाला होता. तेव्हा स. पा. च्या पिलावळीतले दोन नेते मियाँ आलम बादी आणि मियाँ वासिम अहमद यांनी आझमी सारखाच वाद घातला होता. त्यांना हिंदीतून शपथ घ्यायची नव्हती तर उर्दूतून घ्यायची होती. उ. प्र. मधे उर्दू बोलणार्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे उर्दूला तिथे द्वितीय क्रमांकाच्या अधिकृत भाषेचा दर्जा आहे. परंतु त्यांना तेव्हा "देवनागरी लिपी असलेल्या भाषेतच शपथ घेऊ शकता" या कारणावरून अडवण्यात आले आणि उर्दुत शपथ घ्यायला मज्जाव केला गेला. मग त्यांनी विधानसभेबाहेर धरणी वगैरे धरली पण तरीही तत्कालीन अध्यक्ष श्री. केशरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना उर्दूतून शपथ घेण्यास परवानगी दिली नाही आणि वर हे ही सुनावले की कुठलं योग्य कारण न देता जर ते सभागृहात अनुपस्थित राहीले तर त्यांना निलंबित केले जाईल. आणि शेवटी सगळ्या सव्यापसव्यानंतर आणि मुलायम सिंगांच्या मध्यस्थी नंतर त्या दोघांनी हिंदीत शपथ घेतली. त्यासंबंधीची बातमी इथे वाचा. म्हणजे त्यांनी एवढा गाजावाजा, सत्याग्रह, धरणी करूनही तेव्हाचे सरकार त्यांच्या पुढे नमले नाही उलट सरकारचा, मंत्रीमंडळाचा, राज्याचा निर्णय मान्य करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. प्रसंगी निलंबनाच्या कारवाईची भीतीही घालण्यात आली. पण वाईट वाटतं ते एवढच की ही एवढी धमक ना महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष सरकारमधे आहे, ना मराठी-हिन्दू चा सी-साँ खेळणार्या विरोधी पक्षांमधे आहे, ना दिल्लीच्या दावणीला बांधलेल्या मीडियामधे आहे की असा दबाव आपल्या राज्यभाषेचा अपमान कराणार्यँच्यावर टाकला जाईल. दुःख आहे ते म्हातारी मेल्याचंही आणि काळ सोकावल्याचंही. म्हणजे तेव्हा हिंदीच्या विरुद्ध आणि उर्दूच्या बाजूने लढणारेच आता हिंदीच्या बाजूने आणि मराठीच्या विरुद्ध लढतायंत, हिंदीच्या बाजूने लढत असल्याचा, हिंदी भाषिकांचा कैवारी असल्याचा किमान देखावा तरी निर्माण करण्यात यशस्वी होतायंत. तेव्हा कुठे गेला होता स. पा. सुता तुझा धर्म एवढंच म्हणू शकतो आपण.. !!!
Wednesday, November 4, 2009
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् !!
ही बातमी वाचून समजा चुकुन तळपायाची आग मस्तकात गेली नाही तरी त्यातली शेवटची ओळ वाचून मात्र ती नक्कीच जाईल. थोडक्यात बातमी पुढील प्रमाणे.
==============================
"वंदे मातरम् हे गीत इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने काढला आहे. देवबंदच्या राष्ट्रीय परिषदेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या फतव्याचे समर्थन केले आहे. अल्लाह व्यतिरिक्त मुस्लिम समाज अन्य कुणाकडेही प्रार्थना करत नाही, असे मत बोर्डाने व्यक्त केले. तर आमचे देशावर प्रेम आहे, परंतु देशाची पूजा करू शकत नाही, असे बोर्डाचे ज्येष्ठ नेते कमाल फारूकी म्हणाले.
दरम्यान, देवबंद येथील जमात-ए-उलेमा हिंदच्या आजच्या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही मार्गदर्शन केले.
==================================
अरे हे काय चाललय काय? मुस्लिम समाजाकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघून मी हा लेख लिहितोय असं कोणाच्या मनात येत असेल तर ते ताबडतोब काढून टाका. पण हे मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि उलेमा वगैरेच मुस्लिम जनतेचं प्रतिनिधित्व करतात ना? म्हणजे मग त्यांनी मांडलेले मत, फतवे हे मुस्लिम समाजाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं कोणी मानलं तर त्यात वावगं काय? अन्यथा मुस्लिम समाजातील इतर संस्थांनी पुढे येऊन सांगावं की हे उलेमा जे काही बडबडत आहेत त्याला आमचा पाठिंबा नाही. हा मुद्दा मांडण्याच कारण एवढंच की या विषयाच्या संदर्भात हे आणि अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. म्हणून सुरुवातीलाच त्यांची उत्तरे दिलेली बरी.
मी मुद्दामच वंदे मातरम्, त्याचा तेजस्वी इतिहास, त्या गीताने हजारो क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा या विषयी बोलणार नाहीए कारण आपण सर्वजण ते जाणतोच. मुख्य आक्षेप आहे तो बातमीच्या शेवटच्या ओळीत मांडण्यात आलेल्या मुद्द्याबद्दल.
ज्या जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने वंदे मातरम् विरुद्ध फतवा काढला आहे त्याच संघटनेच्या परिषदेत आपले केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम उपस्थित रहातात आणि मार्गदर्शन करतात याचा अर्थ काय?? सर्वसामान्य माणसांनी, जे वंदे मातरम् या गीताला पुज्यस्थानी मानतात, जे केंद्रीय गृहमंत्र्यांचा शब्द म्हणजे देशाच्या अतिशय प्रभावी आणि महत्वाच्या अशा गृहखात्याचे अधिकृत विधान मानतात त्यांनी काय समजायचे? की गृह खाते, गृहमंत्री, पंतप्रधान इत्यादींचा या विक्षिप्त निर्णयाला पाठिंबा आहे? वन्दे मातरम् म्हन्टल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात?
खरं तर शिवराज पाटील या ठोकळ्याची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यावर पी चिदंबरम जेव्हा त्यांच्या जागी आले तेव्हा गृहमंत्रालयचा कारभार थोडासा सुधारेल अशी पूसटशी का होईना आशा होती. परंतु त्यांची वन्दे मातरम् बाबतची भूमिका, अफझाल गुरूच्या फाशी संदर्भात त्यांनी केलेली हास्यास्पद विधाने पाहता गृहमंत्रीपदाला लागलेलं ग्रहण इतक्यात काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
==============================
"वंदे मातरम् हे गीत इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने काढला आहे. देवबंदच्या राष्ट्रीय परिषदेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या फतव्याचे समर्थन केले आहे. अल्लाह व्यतिरिक्त मुस्लिम समाज अन्य कुणाकडेही प्रार्थना करत नाही, असे मत बोर्डाने व्यक्त केले. तर आमचे देशावर प्रेम आहे, परंतु देशाची पूजा करू शकत नाही, असे बोर्डाचे ज्येष्ठ नेते कमाल फारूकी म्हणाले.
दरम्यान, देवबंद येथील जमात-ए-उलेमा हिंदच्या आजच्या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही मार्गदर्शन केले.
==================================
अरे हे काय चाललय काय? मुस्लिम समाजाकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघून मी हा लेख लिहितोय असं कोणाच्या मनात येत असेल तर ते ताबडतोब काढून टाका. पण हे मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि उलेमा वगैरेच मुस्लिम जनतेचं प्रतिनिधित्व करतात ना? म्हणजे मग त्यांनी मांडलेले मत, फतवे हे मुस्लिम समाजाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं कोणी मानलं तर त्यात वावगं काय? अन्यथा मुस्लिम समाजातील इतर संस्थांनी पुढे येऊन सांगावं की हे उलेमा जे काही बडबडत आहेत त्याला आमचा पाठिंबा नाही. हा मुद्दा मांडण्याच कारण एवढंच की या विषयाच्या संदर्भात हे आणि अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. म्हणून सुरुवातीलाच त्यांची उत्तरे दिलेली बरी.
मी मुद्दामच वंदे मातरम्, त्याचा तेजस्वी इतिहास, त्या गीताने हजारो क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा या विषयी बोलणार नाहीए कारण आपण सर्वजण ते जाणतोच. मुख्य आक्षेप आहे तो बातमीच्या शेवटच्या ओळीत मांडण्यात आलेल्या मुद्द्याबद्दल.
ज्या जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने वंदे मातरम् विरुद्ध फतवा काढला आहे त्याच संघटनेच्या परिषदेत आपले केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम उपस्थित रहातात आणि मार्गदर्शन करतात याचा अर्थ काय?? सर्वसामान्य माणसांनी, जे वंदे मातरम् या गीताला पुज्यस्थानी मानतात, जे केंद्रीय गृहमंत्र्यांचा शब्द म्हणजे देशाच्या अतिशय प्रभावी आणि महत्वाच्या अशा गृहखात्याचे अधिकृत विधान मानतात त्यांनी काय समजायचे? की गृह खाते, गृहमंत्री, पंतप्रधान इत्यादींचा या विक्षिप्त निर्णयाला पाठिंबा आहे? वन्दे मातरम् म्हन्टल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात?
खरं तर शिवराज पाटील या ठोकळ्याची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यावर पी चिदंबरम जेव्हा त्यांच्या जागी आले तेव्हा गृहमंत्रालयचा कारभार थोडासा सुधारेल अशी पूसटशी का होईना आशा होती. परंतु त्यांची वन्दे मातरम् बाबतची भूमिका, अफझाल गुरूच्या फाशी संदर्भात त्यांनी केलेली हास्यास्पद विधाने पाहता गृहमंत्रीपदाला लागलेलं ग्रहण इतक्यात काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
स्पर्धा ... वैचारिक गुलामगिरीची !!
नुकतीच ही राष्ट्रकुल (commonwealth) स्पर्धाँची बातमी वाचली. राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे काय तर इंग्रजांच्या वसाहतींच्या देशांचं मिनी ओलिंपिक. किंवा भारतीयांच्या मानसिक गुलामगिरीचा अजुन एक उत्तम नमुना. अर्थातच जे देश एकेकाळी इंग्रजांचे गुलाम होते तेच देश या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही एकेकाळी आमचे गुलाम होतात (आणि अजूनही मानसिक गुलाम आहातच) हे इतर जगाला सांगण्याची सुपीक डोक्याच्या इंग्रजांची पद्धत. आणि आपणही ते मारे एवढे मिरवतो, त्याला एवढ महत्व देतो की आपल्या राष्ट्रपती इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या राणीबरोबर त्या स्पर्धांच्या ज्योतीच उद्घाटन करतात. एक मुद्दा लक्षात घ्या. विरोध हा त्या स्पर्धेला, त्यातील खेळांना किंवा किंबहुना सहभागी होणार्या देशांना नाही. विरोध आहे तो स्पर्धेच्या नावाला, किंवा सहभागी देशांच्या निवडीच्या निकषाबद्दल. इंग्रजांच्या वसाहतीच जर अस्तित्वात नाहीत तर त्या वसाहतीच्या सामूहिक खेळ / स्पर्धा घेण्याच प्रयोजन काय? हे मानसिक गुलामगिरीच लक्षण नाही काय? (भाषिक गुलामगिरी तर वर्षानुवर्षे आहेच.)
या मताच्या विरोधात काही मुद्दे / प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ.
1. नावात काय आहे.
2. क्रिकेट हा पण इंग्रजांचाच खेळ आहे. तो कसा चालतो तुम्हाला???
3. क्रिकेटेतर खेळांचा विकास कसा होणार. त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा हे एक उत्तम व्यासपीठ आहे
असे इतर ही अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण त्यातल्या त्यात धारदार, टोकदार प्रश्नांचा विचार आपण करू :)
1. नावात काय आहे या सारख मूर्ख विधान खरच दुसर नसेल. (सॉरी शेक्स्पियर आजोबा).. कारण आपण सर्वच जाणतो आणि वेळोवेळी त्याचा प्रत्ययही घेतो की नावातच सगळं आहे. नावावरूनच या स्पर्धा कुठल्या स्वरूपाच्या आहेत, सहभागी देशांचा निकष काय आहे इत्यादी महत्वाच्या बाबी ठरवल्या जातात. नाही का? त्यांना आपण सरळ एशियाड / ओलिंपिक अस काही म्हणू शकत नाही.. हो ना? एशियाड हा एशिया खंडातील देशांमधे खेळला जाणार खेळ आहे तर ओलिंपिक म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधे. पण त्यात कुठेही तुमचा वर्ण, वंश, किंवा मुख्य म्हाणजे तुमच्यावर 70 वर्षांपूर्वी कोणी राज्य केल होत असल्या मूर्ख गोष्टी निवडीचा निकष म्हणून वापरल्या जात नाहीत.
2. क्रिकेट हा इंग्रजांनीच चालू केलेला खेळ असला तरी त्यात कोणीही खेळू शकतो. फक्त इंग्रजच किंवा फक्त ज्यांच्यावर इंग्रजांनी राज्य केलय अशाच देशांनी तो खेळावा असले फालतू नियम त्या खेळाबाबत नाहीत.
3. क्रिकेटेतर खेळांचा विकास जरूर व्हायला हवा. नाही हवाच. पण त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा कशाला? आपण मिनी-एशियाड, मिनी ओलिंपिक, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी (देश) अशा अनेक प्रकारच्या लढती, स्पर्धांच आयोजन करू शकतो. त्यासाठी इंग्लंडच्या राणीने ज्यांच्या डोक्यावर वरदहस्त(!!!??) ठेवला होता / आहे असेच देश हवे अशी काही अट असणार नाही.
खेळांचा प्रसार, क्रिकेटेतर खेळ हा मुद्दा नाहीच आहे. मूळ मुद्दा हा आहे की ही लपून छपुन केली जाणारी शाब्दिक, वैचारिक गुलामगिरीच आहे हे आपल्याला कळतय का? पटतय का? निदान त्याची जाणीव तरी आहे का? कारण अशी काही जाणीव असेल तरच त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण करणार ना? अन्यथा इंग्रज मायबाप सरकार देवाच सरकार होत असे मानणारे, म्हणणारे महाभाग तेव्हाही आणि आत्ताही काय कमी होते/ आहेत ?
या मताच्या विरोधात काही मुद्दे / प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ.
1. नावात काय आहे.
2. क्रिकेट हा पण इंग्रजांचाच खेळ आहे. तो कसा चालतो तुम्हाला???
3. क्रिकेटेतर खेळांचा विकास कसा होणार. त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा हे एक उत्तम व्यासपीठ आहे
असे इतर ही अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण त्यातल्या त्यात धारदार, टोकदार प्रश्नांचा विचार आपण करू :)
1. नावात काय आहे या सारख मूर्ख विधान खरच दुसर नसेल. (सॉरी शेक्स्पियर आजोबा).. कारण आपण सर्वच जाणतो आणि वेळोवेळी त्याचा प्रत्ययही घेतो की नावातच सगळं आहे. नावावरूनच या स्पर्धा कुठल्या स्वरूपाच्या आहेत, सहभागी देशांचा निकष काय आहे इत्यादी महत्वाच्या बाबी ठरवल्या जातात. नाही का? त्यांना आपण सरळ एशियाड / ओलिंपिक अस काही म्हणू शकत नाही.. हो ना? एशियाड हा एशिया खंडातील देशांमधे खेळला जाणार खेळ आहे तर ओलिंपिक म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधे. पण त्यात कुठेही तुमचा वर्ण, वंश, किंवा मुख्य म्हाणजे तुमच्यावर 70 वर्षांपूर्वी कोणी राज्य केल होत असल्या मूर्ख गोष्टी निवडीचा निकष म्हणून वापरल्या जात नाहीत.
2. क्रिकेट हा इंग्रजांनीच चालू केलेला खेळ असला तरी त्यात कोणीही खेळू शकतो. फक्त इंग्रजच किंवा फक्त ज्यांच्यावर इंग्रजांनी राज्य केलय अशाच देशांनी तो खेळावा असले फालतू नियम त्या खेळाबाबत नाहीत.
3. क्रिकेटेतर खेळांचा विकास जरूर व्हायला हवा. नाही हवाच. पण त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा कशाला? आपण मिनी-एशियाड, मिनी ओलिंपिक, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी (देश) अशा अनेक प्रकारच्या लढती, स्पर्धांच आयोजन करू शकतो. त्यासाठी इंग्लंडच्या राणीने ज्यांच्या डोक्यावर वरदहस्त(!!!??) ठेवला होता / आहे असेच देश हवे अशी काही अट असणार नाही.
खेळांचा प्रसार, क्रिकेटेतर खेळ हा मुद्दा नाहीच आहे. मूळ मुद्दा हा आहे की ही लपून छपुन केली जाणारी शाब्दिक, वैचारिक गुलामगिरीच आहे हे आपल्याला कळतय का? पटतय का? निदान त्याची जाणीव तरी आहे का? कारण अशी काही जाणीव असेल तरच त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण करणार ना? अन्यथा इंग्रज मायबाप सरकार देवाच सरकार होत असे मानणारे, म्हणणारे महाभाग तेव्हाही आणि आत्ताही काय कमी होते/ आहेत ?
Thursday, October 29, 2009
तेरी जात का !!
आज मजा आली. आमच्या एका याहू ग्रूप वर एका सदस्याने तामीळनाडूच्या एका देवळात दलितांना प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या एका बातमीची लिंक पाठवली होती. आणि झालं मग. एकच चर्चा सुरू झाली.जातपात किंवा जनरल कॅस्ट सिस्टम, धर्मांतर अशा वळणावरुन जाता जाता ती हळूहळू आणि थोडीशी जातीव्यवस्था का हवी, जातीव्यवस्था विसर्जीत (!!!) करण्याआधीतिला योग्य पर्याय शोधायला हवा अशा वळणांवर जायला लागली. मग आम्हीही थोडी आमची लेखणी (आपला कीबोर्ड हो) चालवली. तोच reply जसाच्या तसा खाली देतोय.
--------------------------------
जातीव्यवस्थेला कधीही कुठलाही पर्याय असु शकत नाही. जातीव्यवस्था नष्ट (विसर्जीत हा शब्द जातीव्यवस्थेला खूपच मान देणारा आहे त्यामुळे) करणे हा एकमेव पर्याय आहे. जातीव्यवस्थेतून निर्माण होणार्या विषामतेची झळ आपल्याला कधीच बसत नाही, बसली नाही (कारण आपण असे प्रसंग फक्त पुस्तक/वर्तमानपत्रातूनच वाचतो) आणि ज्यांना ती बसते त्यांच्यापासून आपण सुरक्षित अंतरावर असतो त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही. ज्या जातीव्यवस्थेने शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर यासारख्या महापुरुषांना सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? जातीव्यवस्थेमुळे झालेले असंख्य दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत. फक्त ते डोळसपणे मान्य करायला लागतील इतकंच. (शिवाजीमहाराजंसारख्या महापुरुषाला राज्याभिषेक नाकारण्यात आला होता तो ते ब्राह्माण की क्षत्रिय की राजपूत या वादामुळेच.)
-- ब्राह्मणात पुन्हा तुम्ही कोकणस्था की देशस्थ की कर्हाडे की देवरुखे?.. त्यात पुन्हा यजुर्वेदी की ऋग्वेदी, आणि अजुन घोळ घालायचे असतील तर हे पुढचा ऐका.. तुम्ही शुक्ल यजुर्वेदी की कृष्ण यजुर्वेदी.. ???
-- मराठ्यांमधे पुन्हा कुणबी की ९६ कुळी मराठा की अजुन काही. (मराठा आरक्षणाचा वाद कशा मुळे निर्माण झाला काही अंदाज?)
-- अरे हे तर लेवा पाटील. आम्ही ९६ कुळी.. तुमची आणि आमची सोयारीक जुळु शकत नाही..
-- आम्ही सारस्वत. म्हणजे सरस्वतीचे भक्त. म्हणजे मांस खाणारे ब्राह्मणच.
-- आम्ही सोनार.. म्हणजे दैवद्न्य ब्राह्मण..
असे तट अजूनही पडताना दिसतात. मला नाही वाटत या गटातटातुन कोणालाही काही फायदा होतोय.. !!
या जातीव्यवस्थेमुळेच दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे गुरू मानायचे की नाही असे वाद घालण्यात येतात. समर्थ रामदसांची रामदास ठोसर अशी संभावना करण्यात येते. बाबासाहेब पुरंदर्यांचं शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरील श्रेष्ठत्व नाकारलं जातं ते या जातीपतीतील भेदांमुळेच. संभाजी ब्रिगेड ची साइट/ब्लॉग एकदा वाचून बघा म्हणजे जाती व्यवस्थेने खोलवर केलेले दुष्परिणाम कळून येतील.
खेडेगावांमधे (ज्यांच्यापसून आपण फक्त काही मैलांवर आहोत किंवा थोडक्यात सुरक्षित अंतरावर आहोत) अजुन ही दलितांसाठी वेगळा पाणवठा असतो. त्यांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. त्यांना देवळात जायला मज्जाव असतो.. २००६ चं महाराष्ट्रातलं भैय्यालाल भोतमांगे प्रकरण एवढ्यात विसरलो आपण?
अनिल आवचटानच कुठलाही पुस्तक काढून वाचा म्हणजे जातीव्यवस्थेचे चटके किती तीव्र असतात ते कळेल.
आता conversions विषयी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर का होतं? सगळे धर्मांतर करणारे अशिक्षित नसतात. सगळीच धर्मांतरे धनाच्या लालसेने किंवा जबरदस्तीने होत नसतात. त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे ही भ्रष्ट जाती व्यवस्था. जर माझ्या धर्मात राहून (निव्वळ माझ्या जातिमुळे जो माझ्या उदात्त (!!) धर्माचाच एक भाग आहे) मला कायम हीन वागणूक मिळत असेल, मला माझ्या सामान्य अधिकारांपासून वंचित ठेवले जाणार असेल तर खड्ड्यात गेला तुमचा धर्म. मी धर्मच बदलतो. सगळ्याच कटकटी मिटल्या. ही आणि फक्त हीच मानसिकता असते. हे फक्त हिंदू धर्मविषयीच आहे असं नाही. अनेक आफ्रो-अमेरिकन्स/ब्लॅक्स हे इस्लाम स्वीकारतात कारण त्यांच्या धर्मात त्यांना सतत हीन वागणूक दिली जाते. मुसलमानांमधे होणारे सुन्नी आणि शिया वाद/दंगली तर सर्वश्रुतच आहेत.
सॉरी.. बरच मोठं आणि विस्कळित झालं ईमेल. पण जे जसं सुचलं/साचलं होतं तसं लिहिलं. कारण जेव्हा एक तरुणांचा ग्रूप २१ व्या शतकात जातीव्यवस्थेच्या फायद्यांविषयी, ती विसर्जित न करण्या विषयी बोलू लागतो तेव्हा एक भयंकर विचित्र फीलिंग येत त्याचाच हा परिपाक !!
--------------------------------
जातीव्यवस्थेला कधीही कुठलाही पर्याय असु शकत नाही. जातीव्यवस्था नष्ट (विसर्जीत हा शब्द जातीव्यवस्थेला खूपच मान देणारा आहे त्यामुळे) करणे हा एकमेव पर्याय आहे. जातीव्यवस्थेतून निर्माण होणार्या विषामतेची झळ आपल्याला कधीच बसत नाही, बसली नाही (कारण आपण असे प्रसंग फक्त पुस्तक/वर्तमानपत्रातूनच वाचतो) आणि ज्यांना ती बसते त्यांच्यापासून आपण सुरक्षित अंतरावर असतो त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही. ज्या जातीव्यवस्थेने शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर यासारख्या महापुरुषांना सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? जातीव्यवस्थेमुळे झालेले असंख्य दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत. फक्त ते डोळसपणे मान्य करायला लागतील इतकंच. (शिवाजीमहाराजंसारख्या महापुरुषाला राज्याभिषेक नाकारण्यात आला होता तो ते ब्राह्माण की क्षत्रिय की राजपूत या वादामुळेच.)
-- ब्राह्मणात पुन्हा तुम्ही कोकणस्था की देशस्थ की कर्हाडे की देवरुखे?.. त्यात पुन्हा यजुर्वेदी की ऋग्वेदी, आणि अजुन घोळ घालायचे असतील तर हे पुढचा ऐका.. तुम्ही शुक्ल यजुर्वेदी की कृष्ण यजुर्वेदी.. ???
-- मराठ्यांमधे पुन्हा कुणबी की ९६ कुळी मराठा की अजुन काही. (मराठा आरक्षणाचा वाद कशा मुळे निर्माण झाला काही अंदाज?)
-- अरे हे तर लेवा पाटील. आम्ही ९६ कुळी.. तुमची आणि आमची सोयारीक जुळु शकत नाही..
-- आम्ही सारस्वत. म्हणजे सरस्वतीचे भक्त. म्हणजे मांस खाणारे ब्राह्मणच.
-- आम्ही सोनार.. म्हणजे दैवद्न्य ब्राह्मण..
असे तट अजूनही पडताना दिसतात. मला नाही वाटत या गटातटातुन कोणालाही काही फायदा होतोय.. !!
या जातीव्यवस्थेमुळेच दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे गुरू मानायचे की नाही असे वाद घालण्यात येतात. समर्थ रामदसांची रामदास ठोसर अशी संभावना करण्यात येते. बाबासाहेब पुरंदर्यांचं शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरील श्रेष्ठत्व नाकारलं जातं ते या जातीपतीतील भेदांमुळेच. संभाजी ब्रिगेड ची साइट/ब्लॉग एकदा वाचून बघा म्हणजे जाती व्यवस्थेने खोलवर केलेले दुष्परिणाम कळून येतील.
खेडेगावांमधे (ज्यांच्यापसून आपण फक्त काही मैलांवर आहोत किंवा थोडक्यात सुरक्षित अंतरावर आहोत) अजुन ही दलितांसाठी वेगळा पाणवठा असतो. त्यांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. त्यांना देवळात जायला मज्जाव असतो.. २००६ चं महाराष्ट्रातलं भैय्यालाल भोतमांगे प्रकरण एवढ्यात विसरलो आपण?
अनिल आवचटानच कुठलाही पुस्तक काढून वाचा म्हणजे जातीव्यवस्थेचे चटके किती तीव्र असतात ते कळेल.
आता conversions विषयी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर का होतं? सगळे धर्मांतर करणारे अशिक्षित नसतात. सगळीच धर्मांतरे धनाच्या लालसेने किंवा जबरदस्तीने होत नसतात. त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे ही भ्रष्ट जाती व्यवस्था. जर माझ्या धर्मात राहून (निव्वळ माझ्या जातिमुळे जो माझ्या उदात्त (!!) धर्माचाच एक भाग आहे) मला कायम हीन वागणूक मिळत असेल, मला माझ्या सामान्य अधिकारांपासून वंचित ठेवले जाणार असेल तर खड्ड्यात गेला तुमचा धर्म. मी धर्मच बदलतो. सगळ्याच कटकटी मिटल्या. ही आणि फक्त हीच मानसिकता असते. हे फक्त हिंदू धर्मविषयीच आहे असं नाही. अनेक आफ्रो-अमेरिकन्स/ब्लॅक्स हे इस्लाम स्वीकारतात कारण त्यांच्या धर्मात त्यांना सतत हीन वागणूक दिली जाते. मुसलमानांमधे होणारे सुन्नी आणि शिया वाद/दंगली तर सर्वश्रुतच आहेत.
सॉरी.. बरच मोठं आणि विस्कळित झालं ईमेल. पण जे जसं सुचलं/साचलं होतं तसं लिहिलं. कारण जेव्हा एक तरुणांचा ग्रूप २१ व्या शतकात जातीव्यवस्थेच्या फायद्यांविषयी, ती विसर्जित न करण्या विषयी बोलू लागतो तेव्हा एक भयंकर विचित्र फीलिंग येत त्याचाच हा परिपाक !!
Friday, October 23, 2009
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !!
भावनांची व्याकुळता आठवणींचा जंजाळ
झाकोळल्या क्षितिजाला गडद अंधारलेली किनार
अडकलेला कण न कण, कोंडलेला श्वास अन श्वास
राहून राहून होणारे सारे सारे तुझेच भास
ओहटल्या सागराला आर्त हाकांचं वलय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||१||
अनोळखी माणसांचं वैराण वाळवंट
निर्जीव चेहर्यांच अरण्य घनदाट
निःशब्द रस्त्यांवर हुंकार अस्पष्ट
साथीला बोचणारी बेचैनी मात्र स्पष्ट
एकटेपणाची अशी कधी होते का सवय?
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||२||
तेज लोपलेला सूर्य आणि डागाळलेला चन्द्र
कोमेजल्या फुलांचे आटलेले गंध
कुंद हवेतले निराश उःश्वास
बेचव उन्हं आणि कुबट पाउस
सारं सारं जणू विचित्र विचित्र झालंय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||३||
ओळखीच्या वाटा पण अनोळखी पावलं
काळोख्या उजेडाच्या निस्तेज सावल्या
हव्याशा आठवणींचे लख्ख कवडसे
सोबतीला दाबलेले हुंकार आणि उसासे
नको नको असलं तरी सारं खरयं
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! सांग ना मला उत्तर हवयं !! ||४||
हेरंब ओक
२८ एप्रिल '०९
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !!
भावनांची व्याकुळता आठवणींचा जंजाळ
झाकोळल्या क्षितिजाला गडद अंधारलेली किनार
अडकलेला कण न कण, कोंडलेला श्वास अन श्वास
राहून राहून होणारे सारे सारे तुझेच भास
ओहटल्या सागराला आर्त हाकांचं वलय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||१||
अनोळखी माणसांचं वैराण वाळवंट
निर्जीव चेहर्यांच अरण्य घनदाट
निःशब्द रस्त्यांवर हुंकार अस्पष्ट
साथीला बोचणारी बेचैनी मात्र स्पष्ट
एकटेपणाची अशी कधी होते का सवय?
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||२||
तेज लोपलेला सूर्य आणि डागाळलेला चन्द्र
कोमेजल्या फुलांचे आटलेले गंध
कुंद हवेतले निराश उःश्वास
बेचव उन्हं आणि कुबट पाउस
सारं सारं जणू विचित्र विचित्र झालंय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||३||
ओळखीच्या वाटा पण अनोळखी पावलं
काळोख्या उजेडाच्या निस्तेज सावल्या
हव्याशा आठवणींचे लख्ख कवडसे
सोबतीला दाबलेले हुंकार आणि उसासे
नको नको असलं तरी सारं खरयं
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! सांग ना मला उत्तर हवयं !! ||४||
हेरंब ओक
२८ एप्रिल '०९
शिल्लक !!
२६ नोव्हेंबर च्या मुंबई हल्ल्यानंतर तुकड्यातुकड्यात सुचलेली कविता !!
शिल्लक !!
थोडीशी लाज विकत घ्यायची होती
या सत्ताधार्यांना वाटण्यासाठी
या राजकारण्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी
या सत्तापिपासुंना भीक म्हणुन देण्यासाठी
या झोपेच सोंग घेतलेल्या कुंभकर्णांना उठवण्यासाठी ||१||
थोडीशी माणुसकी विकत घ्यायची होती
मेलेल्या मढयावरचं लोणी खाणार्या
असंख्य बलिदानांवरही खुर्चीची पोळी भाजणार्या
निष्पापांच्या जिवांशी खेळणार्या
जवानांच्या मृत्युला "कुत्र्याचीही" किंमत न देणार्या
या मानवी चेहर्यात वावरणारया श्वापदांसाठी ||२||
थोडं रौद्र थोडं धैर्य थोडं वीर्य विकत घ्यायच होत
या मनगटातल्या ताकदी संपलेल्या
चर्चेची गुर्हाळं चालवून कागदी घोडे नाचावणार्या
पोकळ धमक्यांनी शत्रूला घाबरवल्यासारखं करणार्या
शब्दांचे बुडबुडे उडवणार्या या भेकड युद्धतज्ज्ञांसाठी ||३||
असं बरंच काही मागण्यासाठी देवाकडे गेलो होतो
तर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
कारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!
हेरंब ओक
१९ जानेवारी '०९
शिल्लक !!
थोडीशी लाज विकत घ्यायची होती
या सत्ताधार्यांना वाटण्यासाठी
या राजकारण्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी
या सत्तापिपासुंना भीक म्हणुन देण्यासाठी
या झोपेच सोंग घेतलेल्या कुंभकर्णांना उठवण्यासाठी ||१||
थोडीशी माणुसकी विकत घ्यायची होती
मेलेल्या मढयावरचं लोणी खाणार्या
असंख्य बलिदानांवरही खुर्चीची पोळी भाजणार्या
निष्पापांच्या जिवांशी खेळणार्या
जवानांच्या मृत्युला "कुत्र्याचीही" किंमत न देणार्या
या मानवी चेहर्यात वावरणारया श्वापदांसाठी ||२||
थोडं रौद्र थोडं धैर्य थोडं वीर्य विकत घ्यायच होत
या मनगटातल्या ताकदी संपलेल्या
चर्चेची गुर्हाळं चालवून कागदी घोडे नाचावणार्या
पोकळ धमक्यांनी शत्रूला घाबरवल्यासारखं करणार्या
शब्दांचे बुडबुडे उडवणार्या या भेकड युद्धतज्ज्ञांसाठी ||३||
असं बरंच काही मागण्यासाठी देवाकडे गेलो होतो
तर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
कारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!
हेरंब ओक
१९ जानेवारी '०९
Subscribe to:
Posts (Atom)
रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन
काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...
-
सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, ...
-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम ...