Wednesday, November 4, 2009

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् !!

ही बातमी वाचून समजा चुकुन तळपायाची आग मस्तकात गेली नाही तरी त्यातली शेवटची ओळ वाचून मात्र ती नक्कीच जाईल. थोडक्यात बातमी पुढील प्रमाणे.

==============================
"वंदे मातरम् हे गीत इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने काढला आहे. देवबंदच्या राष्ट्रीय परिषदेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या फतव्याचे समर्थन केले आहे. अल्लाह व्यतिरिक्त मुस्लिम समाज अन्य कुणाकडेही प्रार्थना करत नाही, असे मत बोर्डाने व्यक्त केले. तर आमचे देशावर प्रेम आहे, परंतु देशाची पूजा करू शकत नाही, असे बोर्डाचे ज्येष्ठ नेते कमाल फारूकी म्हणाले.

दरम्यान, देवबंद येथील जमात-ए-उलेमा हिंदच्या आजच्या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही मार्गदर्शन केले.
==================================

अरे हे काय चाललय काय? मुस्लिम समाजाकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघून मी हा लेख लिहितोय असं कोणाच्या मनात येत असेल तर ते ताबडतोब काढून टाका. पण हे मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि उलेमा वगैरेच मुस्लिम जनतेचं प्रतिनिधित्व करतात ना? म्हणजे मग त्यांनी मांडलेले मत, फतवे हे मुस्लिम समाजाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं कोणी मानलं तर त्यात वावगं काय? अन्यथा मुस्लिम समाजातील इतर संस्थांनी पुढे येऊन सांगावं की हे उलेमा जे काही बडबडत आहेत त्याला आमचा पाठिंबा नाही. हा मुद्दा मांडण्याच कारण एवढंच की या विषयाच्या संदर्भात हे आणि अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. म्हणून सुरुवातीलाच त्यांची उत्तरे दिलेली बरी.

मी मुद्दामच वंदे मातरम्, त्याचा तेजस्वी इतिहास, त्या गीताने हजारो क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा या विषयी बोलणार नाहीए कारण आपण सर्वजण ते जाणतोच. मुख्य आक्षेप आहे तो बातमीच्या शेवटच्या ओळीत मांडण्यात आलेल्या मुद्द्याबद्दल.

ज्या जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने वंदे मातरम् विरुद्ध फतवा काढला आहे त्याच संघटनेच्या परिषदेत आपले केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम उपस्थित रहातात आणि मार्गदर्शन करतात याचा अर्थ काय?? सर्वसामान्य माणसांनी, जे वंदे मातरम् या गीताला पुज्यस्थानी मानतात, जे केंद्रीय गृहमंत्र्यांचा शब्द म्हणजे देशाच्या अतिशय प्रभावी आणि महत्वाच्या अशा गृहखात्याचे अधिकृत विधान मानतात त्यांनी काय समजायचे? की गृह खाते, गृहमंत्री, पंतप्रधान इत्यादींचा या विक्षिप्त निर्णयाला पाठिंबा आहे? वन्दे मातरम् म्हन्टल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात?

खरं तर शिवराज पाटील या ठोकळ्याची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यावर पी चिदंबरम जेव्हा त्यांच्या जागी आले तेव्हा गृहमंत्रालयचा कारभार थोडासा सुधारेल अशी पूसटशी का होईना आशा होती. परंतु त्यांची वन्दे मातरम् बाबतची भूमिका, अफझाल गुरूच्या फाशी संदर्भात त्यांनी केलेली हास्यास्पद विधाने पाहता गृहमंत्रीपदाला लागलेलं ग्रहण इतक्यात काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

No comments:

Post a Comment

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...