Saturday, March 25, 2023

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स


सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया अशी सर्वत्र घोडदौड करत असलेल्या इस्लामचा गेल्या सुमारे १०० वर्षांतला प्रामुख्याने इंग्लंडमधला प्रवास आणि प्रभाव याचं वर्णन एड हुसेन या लेखकाच्या Among the Mosques: A Journey Across Muslim Britain या पुस्तकात वाचायला मिळतं. जन्माने ब्रिटिश मुस्लिम असलेल्या लेखकाचे आईवडील हे बांग्लादेशी मुस्लिम आहेत. १९६१ मध्ये त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. एड हुसेनचं हे इस्लामविषयक तिसरं पुस्तक असून The Islamist आणि The House of Islam या दोन पुस्तकांत त्याची पूर्वाश्रमीची जडणघडण, इस्लामकडे आकर्षित होणं, इस्लामचा अभ्यास याबद्दल तपशीलवार माहिती आहे. कालांतराने त्यातला फोलपणा कळून आल्यानंतर इस्लामचा ब्रिटनमधला प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेला प्रवास सद्य पुस्तकात पाहावयास मिळतो.



या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला
, तेथील सामान्य नागरिक, प्रमुख व्यक्ती, मौलवी, राजकारणी, टॅक्सी ड्रॉयव्हर अशा सर्व लोकांशी चर्चा करून, त्यांना प्रश्नं विचारून, बोलतं करून त्यांच्या अनुभवांचं एकत्रीकरण करून इस्लामचा गेल्या साधारण १०० वर्षांमधला युकेमधला प्रवास शब्दबद्ध केला आणि अमंग द मॉस्क्स या आपल्या पुस्तकातून वाचकांसमोर आणला. ब्लॅकबर्न, ब्रॅडफर्ड, बर्मिंगहम, बेलफस्ट (नॉर्दर्न आयर्लंड), एडिनबर्ग आणि ग्लास्गो (स्कॉटलंड) आणि लंडन या प्रमुख मुस्लिम बहुल शहरांमधील अनेक धक्कादायक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकात त्या शहरांमधील आणि पर्यायाने ब्रिटनमधील मुस्लिम जीवन, त्यांच्या चालीरीती, कट्टरपणा, धर्मद्वेष्टेपणा या सगळ्यासगळ्याचे हादरवून सोडणारे अनुभव वाचायला मिळतात.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच परिचयाच्या प्रकरणात लेखकाने ब्रिटन आणि तेथील मुस्लिम लोकसंख्येचा धक्कादायक विस्फोट याची सप्रमाण माहिती दिली आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असलेल्या इंग्लंडमध्ये आज किमान दोन हजार मशिदी आहेत. इंग्लंडमधील पहिली मशीद लिव्हरपूलमध्ये सन १८८९ साली उभारण्यात आली. इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलेल्या २० ब्रिटिश मुस्लिमांनी तिची स्थापना केली होती. शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असणाऱ्या इंग्लंडमधील लंडन, ल्युटन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ड्यूसबरी, ब्लॅकबर्न, कीली, नेल्सन इत्यादी शहरांचं आकाश आता मशिदींचे घुमट, मिनार, मनोरे यांनी भरून गेलेलं आढळतं.




ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकस (
ONS) च्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांत संपूर्ण ब्रिटनची लोकसंख्या ४.९ कोटींवरून सुमारे ११ टक्क्यांनी वाढून ५.४ कोटींवर जाऊन पोचली मात्र याच कालावधीत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या मात्र पंधरा लाखांवरून थेट बत्तीस लाखांवर गेली.
थोडक्यात १०७.३ टक्क्यांची अविश्वसनीय आणि धोकादायक वाढ !!! सन २०५० पर्यंत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या एक कोटी तीस लाखांच्या वर जाऊन पोचेल असा अंदाज आहे. 


ब्लॅकबर्न

बर्मिंगहम, रॉशडेल, ब्रॅडफर्ड, कीली अशा अनेक शहरांमध्ये वर्षानुवर्षं स्थायिक झालेल्या पंजाबी आणि काश्मिरी मुसलमानांच्या हातात त्या शहरांची सर्व सत्ता एकवटलेली आहे. मतांच्या लाचारीपायी राजकारणी आणि स्थानिक नेतेही लाळघोटेपणा करत इथल्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष करतात.

लंडन, बर्मिंगहम, ब्लॅकबर्न ही ब्रिटनमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली काही शहरं आहेत. लुईस कॅसी कमिशनने २०१६ साली केलेल्या एका सर्वेक्षणात ब्लॅकबर्नबद्दलचे धक्कादायक निष्कर्ष सामोरे आले. या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये अल्पसंख्यांक असलेले लोक (मुस्लिम) प्रत्यक्षात ब्रिटनच्या अनेक शहरांच्या उपनगरांमध्ये बहुसंख्यांक झाले आहेत आणि त्यात ब्लॅकबर्नचा क्रमांक सर्वात वरचा आहे. ब्लॅकबर्नच्या बास्टवेल आणि शिअरब्रो प्रभागांत मुस्लिम लोकसंख्या अनुक्रमे ८५% आणि ७८% झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ब्लॅकबर्नच्या एकूण एक लाख सतरा हजार लोकसंख्येमध्ये सुमारे पन्नास हजार लोकसंख्या मुस्लिमांची आहे. अजून एक महत्वाची आकडेवारी म्हणजे याच शहरात बेकारी ही ६% आहे जी ब्रिटनच्या राष्ट्रीय सरासरीच्या मानाने खूप अधिक आहे. आणि अर्थातच त्यामुळे गुन्हेगारी देखील आपोआपच खूप अधिक आहे. तिथे श्वेतवर्णीय लोकांवर रस्त्यांत उघडउघड हल्ले केले जातात. ब्लॅकबर्नमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमांव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नाही. थोडक्यात ते No-Go Areas आहेत.

ब्लॅकबर्नमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांना कुठलीही आडकाठी नाही परंतु श्वेतवर्णीय ब्रिटिश लोकांना मोठ्या आवाजात गाणी लावायला परवानगी नाही. इतकंच नव्हे तर तेथील नागरिकांना त्यांच्या देशाचा युनियन जॅक फडकवण्याचीही परवानगी नाही. सरकार मुस्लिमांना वर्णद्वेषी, जातीयवादी वाटू नये म्हणून घेण्यात आलेली खबरदारी आहे ही !!

ब्लॅकबर्नमधल्या एका मदरश्यातल्या शिक्षणाला कंटाळून मदरश्याला रामराम ठोकलेल्या एका तरुण मुलाशी बोलताना लेखकाला बरीच विचित्र माहिती कळली. खऱ्या जगातील सर्व झगमगाटापासून आणि प्रलोभनांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवून फक्त इस्लामचा अभ्यास करायला लागलेल्या या तरुण मुलाला आपल्या आयुष्यातली महत्वाची पाच वर्षं वाया गेल्याची जाणीव झाली. कारण पाच वर्षं  इस्लामचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं की खऱ्या जगातल्या स्पर्धेला सामोरं जाण्याच्या दृष्टीने आवश्यक असं कुठलंही शिक्षण किंवा कौशल्य त्याच्या ठायी नाही. त्याच्या पालकांना पाच वर्षं लुटण्यात आलं. संपत्ती, जमीजुमला, ऐश्वर्य, स्त्रिया या सर्वांना नावं ठेवणाऱ्या त्याच्या शिक्षकाची स्वतःची मात्र अनेक घरं आणि अनेक बायका आहेत. नैराश्याने भरून गेलेले असे नवीन पिढीतील अनेक तरुण या शहरात आढळतात.

ब्रॅडफर्ड

त्यानंतर लेखक ब्रॅडफर्ड या शहरात येऊन पोचतो. ब्रॅडफर्डमधल्या मशिदींचा अधिकृत आकडा हा १०३ आहे. तेथील उपाहारगृहं, क्लब्ज, बार, डिस्को आता बंद झाली आहेत. १९९१ आणि २००१ साली शहरात झालेल्या कुप्रसिद्ध दंगलींनंतर शहरातील BMW चं मोठं शोरूम बंद झालं. इतकंच नव्हे तर कुठलाही मोठा कारचा ब्रँड आता त्या शहरात प्रवेश करत नाही. खुद्द पोलीस स्टेशनच्या बाहेर सुस्वागतम/welcome च्या ऐवजी 'खुशामदीद' लिहिलेले उर्दू फलक लागलेले आहेत.

वर्किंग मेन्स क्लब च्या जागी आता लाला'ज वेडिंग हॉल आलाय तर मेलबर्न पबची जागा एशियन फर्निचर शॉपने घेतली आहे. एका जुन्या पबच्या जागी शहाजलाल लतिफीया मशीद आहे तर अन्य एका पबच्या जागी अल-खिद्र कार्पेट्स चं दुकान उघडण्यात आलंय. मेन्स क्लबच्या जागी आता नौशाही जवीया मशीद आहे तर डॉल्स अँड डान्सिंग क्लब च्या ठिकाणी धांगरी शरीफ मशीद उभं राहिलंय  

या सगळ्या मशिदींमध्ये काश्मीर, पॅलेस्टाइनमध्ये मुस्लिमांवर होत असलेले तथाकथित अत्याचार सांगून तरुणांची माथी भडकावण्याची कामं नित्यनियमाने सुरु आहेत. किताब-अत तवहीद हे खुद्द सौदी सरकारने बंदी घातलेलं इस्लाम आणि सलाफीविषयक जहाल पुस्तक इथल्या मशिदींमध्ये राजरोसपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

गरीब कुटुंबियांना सरकारतर्फे दिला जाणारा गरिबी भत्ता हा त्या कुटुंबातील मुलांपर्यंत पोचत नाही. हे सरकारी पैसे काश्मीरमध्ये पाठवून काश्मीरमध्ये एक तर नवीन दुकानं उघडली जातात किंवा टॅक्सीज घेतल्या जातात. इथल्या मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्यांचे हाल मात्र होतंच राहतात. अपंग मुलांसाठी देण्यात येणार सरकारी पाकिस्तनी भत्त्याचाही इथले पाकिस्तानी लोक असाच गैरवापर करतात. इथल्या अनाथ, अपंग मुलासाठी देण्यात आलेले सगळे पैसे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जातात.

२०१६ मध्ये सलमान रश्दी यांचं पुस्तक ब्रॅडफर्डच्या रस्त्यावर जाळण्यात आलं. त्याविरुद्ध लेख लिहून आवाज उठवणाऱ्या 'ड्रमंड रोड स्कुल' या शाळेचे  मुख्याध्यापक श्री हनीफर्ड यांना तडकाफडकीने नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ब्रॅडफर्डचा तत्कालीन महापौराचं नाव 'मोहम्मद अजीब' होतं हा खचितच योगायोग नसावा. त्या शाळेला भेट देण्याच्या मिषाने तिथे पोचलेल्या लेखकाला अत्यंत धक्कादायक अनुभव आले.

'ड्रमंड रोड स्कुल' चं आता IQRA असं नामांतर झालं आहे असं लेखकाला कळलं. दर्शनी खिडकीवर 'Free Palestine' असं लिहिलं असलेल्या त्या शाळेच्या शेजारी आता काश्मिरी हॉल असून दुसऱ्या बाजूला पाकिस्तनी स्टोर आहे. शाळेच्या समोर मशीद बिलाल मदरसा असून मागच्या बाजूला अल मरकज उल इस्लामी ही शाळा सुरु झाली आहे.

IQRA हा उर्दू शब्द असून कुराणात त्याचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ 'वाच' असा असून ही मोहम्मद पैगंबरांना कुराण वाचण्याची करण्यात आलेली आज्ञा आहे हे जेव्हा लेखक आपल्याला सांगतो तेव्हा खरा धक्का बसतो. 'ड्रमंड रोड स्कुल' चं IQRA असं नामकरण का झालं असावं याचं उत्तर थेट शाळेकडूनच जाणून घेण्याचं लेखक ठरवतो. दुसऱ्या दिवशी शाळेच्या दूरधवनी क्रमांकावर फोन करून "शाळेचं नामकरण IQRA असं उर्दू भाषेत का झालं?" असा थेट प्रश्न केल्यावर मिळणारं उत्तर अजूनच चक्रावून टाकणारं असतं. शाळेच्या मते IQRA हा उर्दू शब्द नसून ते Improvement, Quality, Respect and Achievement याचं लघुरूप आहे. "उर्दू IQRA शब्दाशी याचा काहीच संबंध नाही का?" अशी थेट पुन्हा एकवार विचारणा केल्यावर शाळेचं उत्तर असतं की "ही इस्लामी शाळा नसली तरी इथे शिकणारे अधिकतर विद्यार्थी हे मुस्लिम आहेत. त्यामुळे IQRA या शब्दाचा दोनपैकी कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो." !!!

बर्मिंगहम

त्यानंतर लेखक आपला मोर्चा बर्मिंगहम या शहराकडे वळवतो. बर्मिंगहममध्ये Boots, Tesco, Sainsbury’s, Aldi असे कुठलेही लोकप्रिय ब्रिटिश ब्रॅण्ड्स आढळत नाहीत. मात्र हलाल मटणाची दुकानं, हिजाब/बुरखे विकणारी दुकानं, इस्लामी पुस्तकं आणि भेटवस्तू विकणारी दुकानं यांची इथे रेलचेल आहे. बिस्मिल्लाह बिल्डिंगमध्ये असलेल्या जमशेद क्लोदिंग हाऊसच्या बाहेर चेहऱ्यापासून पायापर्यंत पूर्ण कपड्यांत झाकून ठेवण्यात आलेले स्त्रियांचे mannequins आहेत. जुनेद जमशेद या वादग्रस्त पाकिस्तानी गायकाच्या नावाने असलेल्या कपड्यांच्या दुकानात 'शुद्ध इस्लामी' पद्धतीचे कपडे मिळतात. मदिना गिफ्ट शॉप नावाची दुकानं तर जागोजागी दिसतात. एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या जुन्या घरांचं रूप आता बदललंय. सगळी घरं इस्लामी झाली आहेत. जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात किंवा खिडकीत 'या रसूल अल्ला', 'माशा अल्ला', 'बिस्मिल्ला' असे फलक लागलेले आढळतात. मक्केच्या काबाचे फोटो तर जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर टांगलेले किंवा रंगवलेले आढळतात. इथले अनेक तरुण सीरियामध्ये जाऊन आयसिस या इस्लामी अतिरेकी संघटनेत सामील झाले आहेत.

बेलफस्ट, एडिनबर्ग, ग्लास्गो आणि इतरही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये लेखकाला सर्रास होणाऱ्या इस्लामी लग्ना (निकाह) च्या घटना आढळल्या. ब्रिटनमधील जवळपास प्रत्येक मशिदीत इस्लाममान्य अशा शरिया पद्धतीने लग्ने लावली जातात. परंतु यातील कुठल्याही लग्नाची ब्रिटिश कायद्यान्वये नोंदणी केली जात नाही तर ती फक्त शरिया निकाह म्हणूनच राहतात. या पद्धतीमुळे स्त्रियांना धोका असतो. ब्रिटिश कायद्यान्वये लग्न न झाल्याने भविष्यात लग्न मोडायची वेळ आल्यास पुरुष पोटगी, मुलांच्या संगोपनाचा खर्च अशा कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला बांधील राहत नाही. सरळ तलाक देऊन पुढचं लग्न करण्यास तो मोकळा मोकळा होतो. अशा वेळी अनेकदा स्त्रियांना स्वतःच्या मुलांचा ताबाही मिळत नाही.

कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा धाक नसल्याने अशा प्रकारची लग्नं करण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी आहे. मुस्लिम स्त्री-पुरुषांचे पासपोर्टस, मेहर (हुंडा) म्हणून पुरुषाने स्त्रीला काहीएक रक्कम देण्याची तयारी, जन्माला येणारी अपत्यं मुस्लिम म्हणूनच वाढवण्यात येतील अशी खात्री आणि दोन मुस्लिम पुरुष साक्षीदार (स्त्री साक्षीदार चालत नाहीत) आणले की हे निकाह लावले जातात. आणि हे अशा प्रकारचे निकाह करण्याच्या प्रकरणांत अगदी सुशिक्षित लोकांचाही अपवाद नाही. हे सर्रास सगळीकडे, सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये चालतं.

ग्लास्गो

लेखकाला ग्लास्गोमध्ये आलेला एक अनुभव तर ब्रिटिश मुस्लिमांच्या निष्ठा कुठल्या दिशेने आहेत यावर सुस्पष्टपणे प्रकाश टाकतो. ग्लास्गोमध्ये एका मशिदीत लेखकाला मेजर अब्दुल्ला बटल नावाचा एक ब्रिटिश मुस्लिम सैनिक भेटला. त्याने विषण्ण करणारे अनुभव सांगितले. इराक युद्धातून परत आलेल्या ब्रिटिश मुस्लिम सैनिकांवर इथल्या मुस्लिम जनतेने हल्ले केले, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आलं. कारण एकच की ते मुस्लिम असूनही इराकमधल्या मुस्लिम लोकांशी लढले. मेजर अब्दुल्लाच्या तीन पिढ्या ब्रिटिश सैन्यात आहेत. आणि तरीही तो सैन्यात आहे हे तो ज्या मशिदीत नमाज पढायला येतो तिथे उघडपणे कोणालाही सांगत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मुस्लिमांशी लढणारे मुस्लिम सैनिक (ब्रिटिश असले तरी) धर्मद्रोही आहेत.       

लंडन

लंडनमध्ये पाहिली मशीद बांधायला परवानगी देऊन, वर त्या मशिदीला भरघोस आर्थिक मदत करण्याचं 'पुण्यकर्म' हे अनेकांना प्रातःस्मरणीय असलेल्या विन्स्टन चर्चिल याच्या नावे आहे. १९४० साली बांधण्यात आलेल्या या मशिदीकडे आखाती देश आणि तिथल्या मुस्लिम लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल यादृष्टीने या घटनेकडे बघितलं गेलं. 

लंडन हे ब्रिटनमधलं सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेलं शहर आहे. दुकानं, टॅक्सी, बँका, हॉटेल्स इत्यादी सर्वत्र त्यांचं वर्चस्व आहे. लंडनमध्ये शिया जमातीचंही भरपूर प्रस्थ आहे. मोहरमच्या वेळी काढण्यात आलेल्या मोठ्या मिरवणुकीचं (जलूस) वर्णन करताना लेखकाने त्याला आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. मोहरमच्या आदल्या दिवसापासून लंडनच्या प्रमुख वस्तीत असलेल्या मोठ्या मशिदीपासून ते मोठ्या रस्त्यापर्यंतचा सगळा परिसर बंद केला जातो. चौकाचौकातून दुसऱ्या दिवशीच्या मोहरमच्या मिरवणुकीचे फलक पोलीस स्वतः लावतात. दुसऱ्या दिवशी कित्येक तास आरडाओरडा करत, गोंधळ घालत ती मिरवणूक चालू असते. त्यात शिया जमातीचा प्रेषित अली च्या मृत्यूनिमित्त शोक व्यक्त केला जातो. पुरुष, लहान मुलं, स्त्रिया स्वतःला जखमा करून घेतात. मिरवणुकीतही स्त्रियांची जागा दुय्यमच असते. स्त्रिया मिरवणुकीच्या शेवटी चालत असतात.

मिरवणूक संपल्यावर लेखक त्या मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या अनेक घरांमध्ये जातो आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ती मिरवणूक, आरडाओरडा, मारामारी,  स्त्रियांना दिली जाणारी वागणूक या सर्वांबद्दल सर्व रहिवाश्यांच्या मनात अतिशय चीड आहे. परंतु त्याविरोधात काहीही करू शकत नसल्याने सगळेजण हतबलही आहेत. नगरपालिका, पोलीस यांच्याकडे या विरोधात तक्रार केली तर तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मुस्लिमांविरुद्ध काही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस आणि प्रशासनावर जातीयवादी आणि इस्लामोफोबिक असल्याचे आरोप होतात. त्यामुळे त्या भीतीने त्यांच्या विरोधात कोणीही काहीही कारवाई करत नाही. "हे लोक आमच्या देशाचा सर्वनाश करणार आहेत!!." अशी तिथल्या नागरिकांची सार्वत्रिक भावना आहे.

२०१२ मध्ये ब्रिटनमध्ये एक प्रचंड मोठं लैंगिक शोषणाचा प्रकरण (सेक्स स्कॅण्डल) उघडकीस आलं ज्यात २० ते ५० वयोगटतल्या शेकडो पाकिस्तानी पुरुषांनी संपूर्ण इंग्लंडभर १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या सुमारे एकोणीस हजार मुलींचं वर्षानुवर्षं, वारंवार, सतत लैंगिक शोषण केलं, त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली, बलात्कार केले. कैक घटनांमध्ये दुर्दैवी मुली आणि त्यांचे पालक यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. परंतु एकही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. कारण एकच.. "इस्लामोफोबिया आणि जातीयवादी असण्याचा आरोप होण्याची भीती".  या लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी प्रकरणात सुमारे १९००० अल्पवयीन ब्रिटिश मुलींवर अत्याचार झाले असा अंदाज आहे.

या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.

पुस्तकं

Just a Child: Sammy Woodhouse

Broken and Betrayed: Jayne Senior

Pimped : Samantha Owens

Girl for Sale: Lara McDonnell

Three Girls (मिनिसिरीज)

Betrayed Girls (माहितीपट)


ब्रिटनची सद्यस्थिती

लंडन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ग्लास्गो, मँचेस्टर, रॉशडेल, ड्यूसबरी या आणि अशा अनेक शहरांमधली हजारो मुस्लिम कुटुंबं बँका ते हॉस्पिटल आणि किराणासामान ते टॅक्सी अशा रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा या मूळ ब्रिटिश लोकांशी महिनोंमहिने कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवताही सहजपणे उपभोगू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण मुस्लिमांची हलाल पासून ते बँकिंग, किंवा डेटिंग अप्स पर्यंत अशी स्वतंत्र आणि समांतर अशी अर्थव्यवस्था त्यांनी उभी केली आहे. इजिप्त, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कदाचित नसेल इतकं मदरश्यांचं पेव ब्रिटनमध्ये फोफावतंय! शाळा, उपाहारगृह, बँका, अन्नपदार्थ, टीव्ही वाहिन्या या सगळ्या सगळ्या अधिकाधिक 'इस्लामी' बनण्याचा प्रयत्न करतायत. मदरसे, मशिदींना अधिकाधिक आर्थिक मदती केल्या जातायत, त्यांना अजून जास्त करसवलती दिल्या जातायत.

लंडनच्या शाळाशाळांमध्ये इस्लामचं अंधप्रेम आणि अन्यधर्मीय (काफर) विद्यार्थ्यांविषयी कमालीच्या द्वेषाने भरलेलं वातावरण असतं. मुस्लिम पालक आपल्या पाल्यांना शाळेतल्या नाताळाच्या कार्यक्रमात भाग घेऊ देत नाहीत. अक्षरशः पाच वर्षांच्या मुलींना सक्तीने हिजाब बांधून शाळेत पाठवलं जातं. त्यांना त्यांच्या हिंदू मित्र-मैत्रिणींशी खेळायला मज्जाव केला जातो कारण इस्लामच्या मते हिंदू वाईट/अस्वच्छ असतात. पोहणे किंवा अन्य कुठल्याही मैदानी खेळांमध्ये मुस्लिम मुलींनी भाग घेण्यास पालकांचा सक्त विरोध असतो. नाताळच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमात मुस्लिम विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये अशा सक्त सूचना तर त्यांचे पालक करतातच पण चुकूनही ती गाणी कानांवर पडू नयेत म्हणून गाणी चालू असताना दोन्ही कानांमध्ये बोटं घालून बसण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. यातल्या कुठल्याही प्रकाराला शिक्षक आक्षेप घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाही. कारण तसं केल्यास त्यांना जातीयवादी किंवा इस्लामविरोधक ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे हे प्रकार शांतपणे बघत बसण्याव्यतिरिक्त त्यांना काहीही करता येत नाही.   

या असल्या प्रकारच्या वातावरणात ब्रिटनची पुढची पिढी वाढते आहे. अर्थात ती ही आत्ताच्या पिढीएवढीच किंबहुना अधिकच कट्टर आणि कडवी होणार हे नक्की. सन २०२० मध्ये ब्रिटिश सुरक्षा यंत्रणेने घोषित केलं की ते किमान त्रेचाळीस हजार संशयित अतिरेक्यांवर नजर ठेवून आहेत आणि त्यातले ९०% हे मुस्लिम आहेत.

भविष्य
एकूण चित्र फार विदारक आहे. सुरुवातीच्या काही शतकांमध्ये तलवारींच्या जोरावर रक्तपात करत जगभर पसरलेल्या इस्लामला रक्तविहीन क्रांती करण्याचा, संपूर्ण जगाचं  रूपांतर 'दार उल इस्लाम' अर्थात इस्लामची भूमी म्हणून करण्याचा एक अतिशय सोपा आणि तितकाच प्रभावी असा मार्ग सापडला आहे. ते त्यांच्या मार्गाने अविरतपणे चालतायत. प्रश्न हा आहे की जग डोळे उघडणार आहे का? या अक्राळविक्राळ जागतिक समस्येवर उपाय शोधणं ही तर पुढची बाब झाली पण आधी ही समस्या अस्तित्वात आहे हे तरी आपण मान्य करणार आहोत का? आपल्या उत्तरावर आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अवलंबून आहे हे नक्की!

-हेरंब ओक

Saturday, February 25, 2023

भारत-पाकिस्तान ते कोरिया-जपान.... व्हाया चीन

गेल्या एक-दीड महिन्यांत दोन अप्रतिम पुस्तकं वाचण्याचा योग आला. अक्षरशः खिळवून ठेवणारी, हतबुद्ध करून सोडणारी! एक फिक्शन कादंबरी आणि दुसरं म्हणजे आत्मचरित्र. कादंबरी आहे ती ही भारतात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आणि त्या घटनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक लहान मोठ्या तपशीलांबाबत महिती देणारी तर आत्मचरित्र आहे ते एका उत्तर कोरियन व्यक्तीचं.

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी निश्चलनिकरणाची ऐतिहासिक घोषणा केली. या महत्त्वाच्या घटनेला मध्यवर्ती ठेवून श्री अय्यर यांनी 'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' ही कादंबरी लिहिली. निश्चलनिकरण, त्याची कारणं , आवश्यकता, अनिवार्यता, परिणाम अशा अनेक अंगांना लेखाने या पुस्तकात स्पर्श केला आहे. भारतीय राजकारणातील अनेक चिरपरिचित पात्रं, त्यांचे स्वभाव, लकबी घेऊन आणि मूळची नावं किंचितच बदलेल्या स्वरूपात आपल्याला भेटतात. त्यात चिदंबरम पासून ते सोनिया आणि मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

भारतीय चलनाची छपाई करण्यासाठीच्या एका यंत्राच्या (LEPE Machine) गुप्त लिलावाच्या घटनेपासून पुस्तकाला सुरुवात होते आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला आणि अखेरीस एकेक नवीन धक्का वाचकांना बसत जातो. अनेक घटनांची मांडणी असूनही वेगवान हाताळणीमुळे पुस्तक कुठेही आणि किंचितही कंटाळवाणं होत नाही. काही वेळातच कोट्यवधी खोट्या नोटा घेऊन केरळच्या किनाऱ्यावर पोचणारं जहाज, त्या पैशाचं शिताफीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आलेलं वाटप अशा अविश्वसनीय घटनांबद्दलच्या माहितीबरोबरच त्या पैशाचा लव्ह-जिहाद, लॅन्ड-जिहाद, दहशतवादी उद्योग इत्यादींनासाठी केला जाणार वपर आणि या सगळ्यात पाकिस्तानचा असणारा थेट सहभाग  याविषयी अतिशय खुलेपणाने मांडणी केलेली आढळते. त्याच्याच जोडीला, दरम्यानच्या काळात भारतीय राजकारणात घडणाऱ्या घटना आणि राजकारण्यांचे निर्ल्लज उद्योग वाचताना अक्षरशः संताप येतो.

श्री अय्यर

श्री अय्यर यांच्या मनी सिरीजमधील हे पाहिलं पुस्तक असून दुसरं पुस्तक 'हू पेंटेड माय लस्ट रेड?' हे आयपीएल मधील राजकीय लागेबांधे आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. तर तिसरं पुस्तक 'हू पेंटेड माय फ्युचर ब्राईट?' असून ते भारतीय राजकारणातील नजीकच्या भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांबद्दल आहे. ही  दोन पुस्तकंदेखील लवकरच वाचण्याचा मानस आहे.  

'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' मध्ये असंख्य छोटे छोटे तपशील आहेत आणि अनेक राजकीय घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघितलं गेलं आहे. त्यामुळे अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मी सांगेन. या पुस्तकाचा अनुवादही उपलब्ध असून घातसूत्रचे लेखक श्री दीपक करंजीकर यांनी 'विघ्नाविराम' या नावे तो केला आहे.

=======================================

'अ रिव्हर इन डार्कनेस' 


'अ रिव्हर इन डार्कनेस' या मासाजी इशिकावा (Masaji Ishikawa) लिखित आत्मचरित्रात उत्तरकोरियाच्या 

कम्युनिस्ट हुकूमशाही सरकारच्या राजवटीत असंख्य हालअपेष्टा आणि भ्रष्टाचार आणि उपासमार यामुळे मरणोन्मुख झालेल्या जनतेचं अत्यंत भयकारी चित्रण आहे. लेखकाचे वडील मूळचे दक्षिण कोरियन असून आणि आई जपानी होती. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जपानच्या पराभवानंतर सुमारे चोवीस लाख कोरियन सैनिक जपानमध्ये अडकून पडले ज्यात लेखकाचे वडीलही होते. कालांतराने त्यांचं स्थानिक जपानी मुलीशी लग्न होतं. काही वर्षांनी जपानमध्ये अडकलेल्या कोरियन नागरिकांना जवळपास जबरदस्तीनेच उत्तर कोरियाला नेण्यात येतं, ज्यात जपान सरकारचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.

उत्तर कोरिया म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असून तिथे जाणं हे जणू  प्रत्येक कोरियन नागरिकाचं कर्तव्यच आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात उत्तर कोरियाला पोचल्यानंतर स्वर्ग तर राहोच पण किमान नागरी सुविधा आणि प्राथमिक गरजा पूर्ण होण्याच्या बाबतीतही तिथे कशी मारामार आहे हे लेखकाच्या कुटुंबियांच्या लक्षात येतं. त्यात पुन्हा जपानमधून आलेले (Returnees) म्हणून कोरियन सरकार आणि जनतेकडून या लोकांना सदैव दिली जाणारी वाईट वागणूक आणि केला जाणारा भेदभाव यामुळे मूळची वाईट परिस्थिती अधिकच भयानक होते.

दिवसचे दिवस होणारी उपासमार, लहान मुलांचं कुपोषण, सरकारी अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आणि तरीही सतत स्वस्तुतीत मग्न असणारं सरकार पाहून जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ ची प्रकर्षाने आठवण येते. ऑरवेलने काल्पनिक म्हणून लिहिलेय कादंबरीतील कित्येक घटना उत्तर कोरियात प्रत्यक्षात जशाच्या तशा घडताना पाहून धक्का तर बसतोच पण ऑरवेलच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटल्यावाचूनही राहत नाही. 

मासाजी इशिकावा 

असंख्य लटपटी, खटपटी, मानहानी, अपमान, जवळच्यांचे मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न अशा अनेक अविश्वसनीय आणि हेलावून टाकणाऱ्या घडामोडींनंतर लेखकाची उत्तर कोरियातील आणि चीन यांच्या मध्ये वाहणारी यालु नदी जीवाच्या करारावर ओलांडून जाऊन चीनमार्गे जपान मध्ये प्रवेश करण्याची तयारी होते. पुस्तकाच्या अखेरीस का होईना भेटणाऱ्या काही चांगल्या व्यक्ती आणि नशिबाची साथ यामुळे लेखकाचा उत्तर कोरियातील छत्तीस वर्षांचा नरकवास संपुष्टात तर येतो परंतु त्याचबरोबर एक नवीन दुःख त्याची सदैव सोबत करणार असतं.


अतिशय आनंद आणि तितकंच टोकाचं दुःख अशा एका विचित्र मनस्थितीत वाचकाला ठेवून पुस्तक संपतं. शेवटची ओळ वाचून झाली तरी मासाजी इशिकावा आणि त्यांच्यासारख्या असंख्य दुर्दैवी जीवांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी भोगलेल्या अतीव हालअपेष्टा वाचून वाचकांच्या मनात दाटून येणारी विषण्णता काही केल्या जात नाही आणि त्याच वेळी निव्वळ एका चांगल्या देशात जन्म घेतल्याने अन्य लोकांपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हाही विचार मनात आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक

Sunday, January 1, 2023

२०२२ चा पुस्तकीय लेखाजोखा

 

१. ब्लॅक फ्रायडे : एस हुसेन झैदी (अनुवाद - सायली राजाध्यक्ष)
२. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी : सदानंद दाते
३. मी फुलनदेवी : अनुवाद - डॉ प्रमोद जोगळेकर
४. एका दिशेचा शोध : संदीप वासलेकर
५. बिराड : अशोक पवार
६. गावकुसाबाहेरची माणसं : लक्ष्मण गायकवाड
७. संवादू अनुवादू : उमा कुलकर्णी
८. निवडक कन्नड कथा : उमा कुलकर्णी
९. कर्वालो : श्री. के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी (अनुवाद - उमा कुलकर्णी)
१०. धर्मश्री : डॉ एस एल भैरप्पा (अनुवाद - विजयालक्ष्मी रेवणकर)
११.  टाईमपास : प्रोतिमा बेदी (अनुवाद - सुप्रिया वकील)
१२. फेरा : तस्लिमा नसरीन (अनुवाद - मृणालिनी गडकरी)
१३. अंश : रत्नाकर मतकरी
१४. तेल नावाचं वर्तमान : गिरीश कुबेर
१५.  लंडन बॉम्बिंग २००५ : निळू दामले
१६. विंचवाचं तेल : सुनीता भोसले
१७. श्री सदा आनंद बाबा : दिवाकर नेमाडे
१८.  शिंडलर्स लिस्ट : थॉमस केनीली ( अनुवाद - संजय दाबके)
१९. पणतीला जपताना : समीर दरेकर
२०. अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर  : संजय बारू (अनुवाद - लीना सोहोनी)

काश्मीर विषयक पुस्तकं

२१. काश्मीरनामा : सच्चिदानंद शेवडे
२२. काश्मीर - एक शापित नंदवन : शेषराव मोरे
२३. दहशतीच्या छायेत  : तेज एन धर (अनुवाद - सुजाता देशमुख)
२४. काश्मीर धुमसते बर्फ : जगमोहन (अनुवाद - मो ग तपस्वी)
२५. कशीर : सहना विजयकुमार  (अनुवाद - उमा कुलकर्णी)
२६. रक्तगुलाब : आशिष कौल (अनुवाद - छाया राजे)

सुहास शिरवळकर
२७. काळंबेरं
२८. कणाकणाने

पंकज कालुवाला
२९. इस्रायलची मोसाद
३०. जर्मन गुप्तचर यंत्रणा

निरंजन घाटे
३१. झू
३२. आधुनिक युद्ध कौशल्य

व्यंकटेश माडगूळकर
३३. वावटळ
३४. वारी

नारायण धारप
३५. अघटित
३६. किमयागार
३७. लुचाई
३८. बलिदान
समर्थकथा
३९. समर्थांची ओळख
४०. समर्थांना आव्हान
४१. समर्थांचा विजय
४२. विषारी वारसा

अरुण शौरी
४३. द वर्ल्ड ऑफ फतवाज : अनुवाद - भारती पांडे
४४. आत्मवंचना (Self Deception) : अनुवाद - अशोक पाथरकर
४५. गव्हर्नन्स : अनुवाद - भारती पांडे
४६. ख्यातनाम इतिहासकार : अनुवाद - सुधा नरवणे

ध्रुव भट्ट
४७. तत्त्वमसि :  अनुवाद - अंजनी नरवणे
४८. अतरापी : अनुवाद - सुषमा शाळिग्राम

जॉर्ज ऑरवेल
४९. १९८४ : अनुवाद - अशोक पाध्ये
५०. अ‍ॅनिमल फार्म : अनुवाद - भारती पांडे

अनिता पाध्ये
५१. एकटा जीव
५२. एक होता गोल्डी

यदुनाथ थत्ते
५३. मुस्लिम समाजातील वाहते वारे
५४. मुस्लिम मनाचा कानोसा

डॉ एस एल भैरप्पा (अनुवाद - उमा कुलकर्णी)
५५. तंतू
५६. साक्षी
५७. गृहभंग
५८. परिशोध

अच्युत गोडबोले
५९. किमयागार
६०. अर्थात
६१. अनर्थ

English

६२. A Time for Mercy : John Grisham
६३. Forrest Gump : Winston Groom
६४. First Blood : David Morrell
६५. Missionary Position : Christopher Hitchens
६६. Chanakya's Chant : Ashwin Sanghi
६७. Ed Husain : Among the mosques

Lee Child
६८. Killing Floor
६९. No Plan B

Irving Wallace
७०. The Celestial Bed
७१. The Miracle

Jeff Lindsay
७२. Darkly Dreaming Dexter
७३. Dearly Devoted Dexter
७४. Dexter in the Dark
७५. Dexter by Design

Michael Connelly
(Mickey Haller series)
७६. The Brass Verdict
७७. The Reversal
७८. The Fifth Witness
७९. The Gods of Guilt
८०. The Law of Innocence

(Harry Bosch series)
८१. Black Echo
८२. Black Ice
८३. City of Bones

(Renee Ballard series)
८४. The Late Show
८५. Dark Sacred Night

श्राव्य पुस्तके (ऑडिओ बुक्स)

८६. २६/११, कसाब आणि मी : रमेश महाले (वाचन : उपेंद्र लिमये)
८७. (कदाचित) इमॅजिनरी : गणेश मतकरी
८८. रारंगढांग : प्रभाकर पेंढारकर
८९. सुहेलदेवची पराक्रमगाथा : अमिश त्रिपाठी
९०. प्रतिपश्चंद्र : डॉ प्रकाश कोयाडे
९१. शितू : गो नी दांडेकर

जयवंत दळवी
९२. अंधाराच्या पारंब्या
९३. सारे प्रवासी घडीचे
९४. पुरुष

हृषीकेश गुप्ते
९५. हाकामारी
९६. तीळा तीळा दार उघड
९७. परफेक्ट बाई फोल्डिंगचा पुरुष
९८. भयकथा
९९. काळजुगारी

सुहास शिरवळकर
१००. माध्यम
१०१. झलक
१०२. सॉरी सर
१०३. न्याय अन्याय
१०४. म्हणून
१०५.  काटेरी
१०६. सहज
१०७. असह्य

निरंजन घाटे
१०८. हेरांच्या जगात
१०९. मानवाच्या शोधाची कहाणी
११०. प्राणी जीवनगाथा
१११. अग्निबाणाचा इतिहास

पुलं
११२. काय वाट्टेल ते होईल
११३. हसवणूक
११४. जावे त्यांच्या देशा
११५. एका कोळीयाने

Novellas/Short stories
राष्ट्रीय आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सुधीर जोगळेकर
The Black Phone : Joe Hill
The Fourth Man : Lee Child
The Christmas Scorpion  : Lee Child
Smile : Lee Child
Sincere Warning About The Entity In Your Home : Jason Arnopp

हृषीकेश गुप्ते (audio book) कथा
मोठी तिची सावली
पानगळ
मुआवजा

Wednesday, November 9, 2022

अरुण शौरी : विचारमंथन


अरुण शौरी हे अत्यंत बुद्धिमान अर्थतज्ज्ञ
मुरब्बी राजकारणी आणि तितकेच अभ्यासू विचारवंत म्हणून भारतीय जनतेला सुपरिचित आहेत. त्यांनी अनेक मासिके/वृत्तपत्रांमधून महत्वाच्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांवरून त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला झालेलीच असते. या अशा अत्यंत प्रतिभावंत आणि कर्तबगार व्यक्तीने लिहिलेली तब्ब्ल चार पुस्तकं गेल्या दोन महिन्यांत वाचण्याचा योग आला. यापूर्वी त्यांचे वृत्तपत्रांमधून छापून आलेले लेख वगळता मी त्यांचं कुठलंच पुस्तक वाचलेलं नव्हतं. या चारही पुस्तकांचे विषय एकमेकांपेक्षा सर्वस्वी भिन्न असूनही प्रत्येक पुस्तकात संबंधित विषय इतक्या प्रभावीपणे मांडणे आणि त्यासाठी शेकडो पुस्तकेपत्रव्यवहारखंडग्रंथ यांचे संदर्भ म्हणून वापर करूनते योग्य ठिकाणी मांडून वाचकाला त्या विषयाची इत्यंभूत माहिती अतिशय सोप्या शब्दांत करून देण्याची त्यांची हातोटी बघून थक्क व्हायला होतं. या चार पुस्तकांचे विषय भारत-चीन संबंधभारतीय राजकारणातली नोकरशाहीतथाकथित सुप्रसिद्ध असे भारतीय इतिहासतज्ज्ञ आणि मुस्लिम समाजातील फतवे आणि त्यांचा इतिहास असे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न असे आहेत. प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके-पत्रव्यव्हार-खंड वाचून, पानापानांवर त्यांचे संदर्भ देऊन केलेलं हे लिखाण वाचणं हा वाचक म्हणून अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे.

आपण एकेका पुस्तकाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

पुस्तक क्रमांक १


मूळ पुस्तक : Self-Deception

अनुवादित पुस्तक : आत्मवंचना

अनुवाद : अशोक पाथरकर

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद करायला हवं की हे संपूर्ण पुस्तक अन्य इतर संदर्भांबरोबरच प्रामुख्याने SWJN अर्थात Selected Works of Jawaharlal Nehru या ग्रंथाच्या जवळपास ८० हून अधिक खंडांमधले असे निवडक खंड ज्यांत नेहरूंचा भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहारनोंदी आणि त्या संदर्भात केलेली भाषणं इत्यादी आहेत अशा खंडांवर आधारलेलं आहे.

तत्कालीन भारत-चीन संबंधांच्या बाबतीत पंतप्रधान म्हणून नेहरूंचं धोरण कसं होतंदृष्टिकोन कसा होतात्यांचे काय परिणाम झाले हे वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे तत्कालीन राजदूतांनी भारत-चीन संदर्भातील वेळोवेळी व्यक्त केलेली मतं आणि माध्यमं व त्यांच्या प्रतिक्रिया इत्यादी मुद्द्यांची साद्यन्त माहिती वाचकाला मिळते.

नेहरूंच्या अक्साई चीनच्या बाबतीतल्या "हा प्रदेश केवळ वाळवंट असून या भागात गवताचं पातंही उगवत नाही" या अत्यंत वादग्रस्त विधानापासून ते भारताने अरुणाचल प्रदेश आणि एकूणच ईशान्य भारतातल्या राज्यांकडे केलेलं दुर्लक्ष यांच्या नोंदी वाचायला मिळतात. "अरुणाचल हा चीनचाच प्रदेश आहे.", "अरुणाचल हा भारताने बळजबरीने ताब्यात ठेवलेला चीनी प्रदेश आहे." अशी विधानं चीनच्या नेतृत्वाकडून अधिकृतपणे आणि वारंवार केली जात असतानाही त्याकडे भारतीय नेतृत्व साफ दुर्लक्ष करत राहिलं. चीनच्या अधिकृत नकाशात संपूर्ण अरुणाचलबरोबरच आसामचा बराचसा भाग चीनचा म्हणून दाखवला जात होता. तिबेट जेव्हा भारताकडे लष्करी मदतीसाठी विनवण्या करत होतं तेव्हा तिबेटला मदत तर पुरवली गेली नाहीच पण उलट "चीनचा शस्त्रबळाने पराभव करता येईल हा विचार भ्रामक आहे" अशी मखलाशीही करण्यात आली.

 जॅकस मार्टिन या ब्रिटिश विशेषज्ज्ञाच्या एका प्रबंधात एक थक्क करणारं उदाहरण वाचायला मिळतं. तो म्हणतो, "पूर्वीचा चीन, हा आज चीन म्हणून जो आहे असा दावा केला जातो त्याच्या *फक्त* एक तृतीयांश होता"

यावरून गेल्या काही दशकांमध्ये उत्तरोत्तर वाढत गेलेल्या, चीनच्या सत्तापिपासू अपप्रवृत्तीवर झगझगीत प्रकाश पडतो.

 नेहरूंच्या काळापासून चालू असलेला भारतीय सत्ताधाऱ्यांचा चीनच्या बाबतीतला बोटचेपेपणा हा थेट डॉ मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत कसा चालू होता हे दाखवणाऱ्या एका घटनेचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. हा प्रसंग २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान दिल्लीत घडला होता.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक गेम्सच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये चीन सरकारने तिबेटी जनतेचे निषेध आंदोलन नेहमीप्रमाणेच अतिशय क्रूरपणे दडपून टाकले. आणि ते ही खुद्द आपल्या देशाच्या राजधानीत. प्रत्यक्ष नवी दिल्लीत. जगातील कुठल्याही सरकारने जे केले नव्हते ते मनमोहन सिंग सरकारने दिल्लीला केले. कोणत्याही सरकारने दिला नसता इतका भ्याड आणि भित्रा प्रतिसाद आपल्या सरकारने दिला. ऑलिम्पिक मशालीसाठीची दौड जेमतेम दोन किलोमीटर अंतर कापणार होती. या दोन किमीसाठी सरकारने वीस हजारांपेक्षा जास्त जवान‚ पॅरामिलिटरी जवान‚ पोलीस आणि साध्या वेषातील पोलीस त्या मार्गाभोवती व जवळपासच्या भागांत तैनात केले होते. तिबेटी निर्वासितांना मारहाण करून दूर ठेवण्यात आले. सरकारी कार्यालये बंद होती. रस्ते अडवण्यात आले होते. मेट्रो बंद करण्यात आली. अगदी संसद सदस्यांनासुद्धा संसदेला लागून असलेल्या विजय चौकातून आपल्या घरी जाण्यापासून थांबवण्यात आले. हे सर्व ऑलिम्पिकच्या प्रेमामुळे करण्यात आले असे तुम्हाला वाटतेते चीनच्या भीतीमुळे करण्यात आले.

चीनची विस्तारवादी प्रवृत्तीवाढती भूक आणि त्याला भारतीय नेतृत्वाच्या बोटचेप्या धोरणांमुळे मिळत गेलेलं प्रोत्साहन आणि या सर्वांमध्ये भारतभूमीचं झालेलं नुकसान या सगळ्याचं तपशीलवार वर्णन वाचायचं असल्यास हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक तसेच भारत-चीन संबंध या विषयात रुची असणाऱ्यांनीही आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

 

पुस्तक क्रमांक २


मूळ पुस्तक : Governance

अनुवादित पुस्तक : गव्हर्नन्स

अनुवाद : भारती पांडे

भारतातील नोकरशाहीअनेक खातीअनेक शासकीय विभाग आणि उपविभाग आणि त्यांचे आपापसातले तंटेबखेडे आणि त्या संदर्भात या सर्वांचा एकमेकांशी वर्षानुवर्षं गोगलगायीच्या गतीने चालत असलेला निर्बुद्ध पत्रव्यवहार हा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. अनेक खाती आणि विभागांनी एकमकांवर दाखल केलेलं खटलेत्यांचे निकालवरच्या न्यायालयांमध्ये केली गेलेली अपील्सया अनुषंगाने केला जाणारा कधीही न संपणारा अर्थहीन पत्रव्यवहार आणि त्यात उधळले जाणारे सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रूपये या सर्वांवर हे पुस्तक परखड भाष्य करतं. त्यातले काही तऱ्हेवाईक आणि तितकेच बालिश प्रसंग बघितले की वाचकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही.

१. दिल्लीत सरकारी मालकीची असलेली कित्येक हॉटेल्स बेकायदा आहेत.

२. अनेकांचे मालक ठाऊक नाहीत.

३. अनेकांवर खटले चालू आहेत.

४. कित्येक खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने निकाल लागलेले असूनही मूळ मालक अद्यापही त्या वास्तूची मालकी सोडायला तयार नाही आणि तरीही सरकार त्याबाबतीत काहीही पावलं उचलत नाही.

या असल्या विस्मयकारक गोष्टी वाचून वाचकाला धक्काच बसतो.

दुसरं एक प्रकरण असंच धक्कादायक आहे. दोन खात्यांदरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारात नजरचुकीने काही हजार कोटींनी वाढवला गेलेला आकडात्यामुळे जमाखर्चात उदभवलेली भानगड त्यावरून कित्यके महिने चालू असणारा पत्रव्यवहार आणि शेवटी कोणीतरी एका पक्षाने समजूतदारपणा दाखवून पडती बाजू घेणे अशा प्रसंगांची मालिका वाचली की या लोकांचा मेंदूकॉमन सेन्स वगैरे शब्दांशी दुरान्वये तरी संबंध आलेला असतो की नाही असा प्रश्न पडतो.

 एक प्रसंग तर इतका दुर्दैवी आहे की हे सगळं खोटंच आहे असं वाटायला लागतं.

काही खात्यांच्या एका सामूहिक बैठकीत एका खात्याने दुसऱ्या खात्याला काही लेखी सूचना केल्या होत्या. त्या सूचना करताना त्यांनी त्या हिरव्या शाईचा वापर केला होता. दरम्यान त्या सूचनांकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष करून त्याऐवजी "कुठल्याही खात्याला सूचना करताना सर्वमान्य अशा काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर न करता हिरव्या शाईचा वापर करण्याचा अधिकार आहे का?" आणि "हिरवी शाई वापरून केल्या गेलेल्या सूचना ग्राह्य धाराव्यात का?" या मुद्द्यांवर कित्येक महिने खंडीने पत्रव्यवहार केला गेला आणि अखेरीस हिरवी शाई चालेल असा निर्णय घेतला गेला!

भारतीय नोकरशाहीच्या अशा थक्क करून सोडणाऱ्या असंख्य निर्बुद्ध घटनांचे उल्लेख या पुस्तकात पानोपानी भेटीस येतात आणि वाचकाला नैराश्यग्रस्त करून सोडतात.


पुस्तक क्रमांक ३


मूळ पुस्तक : The Eminent Historians

अनुवादित पुस्तक : ख्यातनाम इतिहासकार

अनुवाद : सुधा नरवणे

 डॉ भैरप्पा यांचं आवरण हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना भारताच्या कला आणि शिक्षण क्षेत्रावर डाव्या विचारांच्या मंडळींची कशी मजबूत विखारी पकड आहे याचा चांगलाच अंदाज असेल. हे पुस्तक वाचताना आवरण या कादंबरीत वाचलेल्या काल्पनिक प्रसंगांशी नातं सांगणाऱ्या परंतु प्रत्यक्षात घडलेल्या घटना आपल्या भेटीस येतात आणि हतबुद्ध व्हायला होतं. 

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या नेमणुकांत केल्या गेलेल्या पक्षपतांच्या त्रोटक उल्लेखांसोबतच ICHR अर्थात Indian Council of Historical Research (भारतीय इतिहास अनुसंधान परिषद) या महत्त्वपूर्ण संस्थेतएकाच विचारसरणीच्या (तथाकथित) इतिहासतज्ज्ञांच्या (!) नेमणूका वारंवार आणि वर्षानुवर्षे कशा केल्या जातात यावर लेखक प्रश्नचिन्ह उमटवतात. ICHR मध्ये २५ वर्षांत रोमिला थापर आणि सतीशचंद्र यांची चार वेळा तर इरफान हबीब आणि एस गोपाल यांची अनुक्रमे पाच आणि तीन वेळा नेमणूक केली गेली. इतकंच नव्हे तर ICHR च्या अध्यक्षपदासाठीही अशाच प्रकारचे खेळ खेळण्यात आले होते. यातल्या अनेक इतिहासतज्ज्ञांनी एखाद्या प्रकल्पासाठी सरकारकडून लाखो रूपये घेऊन तो प्रकल्प पूर्ण न करता ते पैसे हडपले, वारंवार मुदतवाढ मागून घेतली आणि वरून त्यासाठी अतिरिक्त मानधनही घेत राहिले आणि अंतिमतः प्रकल्प पूर्ण केलाच नाही अशा स्वरूपाची असंख्य उदाहरणं शौरी यांनी दिली आहेत.

श्री श्रीमाळी नावाच्या एका डाव्या विचारांच्या इतिहासकाराने टीव्हीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमात असं विधान केलं की "प्राचीन भारतात गोमांस खाल्ले जात होते असे सुस्पष्ट उल्लेख वेदात आहेत". त्यावेळी आपले सनातन ग्रंथवेदपुराणे इत्यादींचे तज्ज्ञ असलेल्या श्री रघुवंशी नामक व्यक्तीने त्यावर आक्षेप नोंदवला आणि प्रतिप्रश्न केला की अशा अर्थाचा उल्लेख श्री श्रीमाळी यांनी कुठल्या ग्रंथात वाचला आहे त्याचा संदर्भ सांगावा. श्रीमाळी यांनी असे संदर्भ अनेक ठिकाणी सापडतात असं ठोकून दिलं. तरीही श्री रघुवंशी यांनी त्यांना निदान एखादा वेदऋचाश्लोक यांचा संदर्भ देण्याची विनंती केली ज्याचं उत्तर श्रीमाळी यांना अर्थातच देता आलं नाही. त्यानंतर त्यांनी "मी वेद नाहीतर वैदिक वाङ्मय असे म्हंटले होते" अशी मखलाशी केली. त्यानंतर कुठल्या वैदिक वाङ्मयात हा उल्लेख आहे हे विचारल्यावर त्यांच्याकडे अर्थातच उत्तर नव्हतं. अखेरीस श्रोत्यांमधून एक विद्वान गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्याबरोबर चारही वेद आणले आहेत. श्रीमाळी यांनी कृपा करून त्यात तो संदर्भ शोधून दाखवावा. श्रीमाळी यांनी त्या वेदांना हात तर लावला नाहीच आणि तरीही स्वतःच्याच असत्यकथनाला ते ठामपणे चिकटून राहिले. त्यानंतर श्री रघुवंशी यांनी वेदांमधील एकामागोमाग एक असे अनेक श्लोक वाचून दाखवले की ज्यांत गोमांस खाऊ नये असे स्पष्ट उल्लेख करण्यात आले होते. एवढं होऊनही श्री श्रीमाळी हेच म्हणत राहिले की "मला एखादी ऋचा म्हणू दाखवता आली नाही याचा अर्थ असा नाही की मी तज्ज्ञ नाही. त्याचप्रमाणे गोमांस भक्षणाच्या विरुद्ध अनेक ऋचा काढून दाखवल्या तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्याकाळी गोमांस खाल्ले जात नव्हते."

काही दिवसांनी श्रीमाळी यांनी 'द हिंदूया वृत्तपत्रातील आपल्या लेखात सदर प्रसंगाचा उल्लेख करून असे सांगितले की मी एखाद्या श्लोकाचा संदर्भ देऊ शकलो याचा अर्थ असा नाही की प्राचीन भारतात गोमांस भक्षण अमान्य होते."

 

पुढचा प्रसंग मात्र खासच धक्कादायक आणि निराशाजनक आहे. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने १९८९ मध्ये काढलेल्या एका आदेशात असं स्पष्टपणे म्हंटलं की नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात "मुस्लिम राज्यकर्त्यांवर कुठलीही टीका नसावी. त्याचप्रमाणे मुस्लिम राज्यकर्ते आणि आक्रमकांनी मंदिरे उध्वस्त केल्याचे उल्लेख नसावेत. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मुस्लिम राजकर्त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या उल्लेखांमध्ये खाली सूचना सुचवण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी केली जावी". थोडक्यात हा एक प्रकारचा फतवाच होता. कोणते उल्लेख वगळावेत आणि सुधारित उल्लेख काय असावेत यांची एक भलीमोठी यादीच परिपत्रकात जोडण्यात आली होती.

त्यातले काही महत्वाचे उल्लेख आणि बदल आपण बघू.

१.      मूळ : अरबांनी गोहत्येवर बंदी घातली होती.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

२.      मूळ : महमूद कट्टर मुस्लिम होता. 'इस्लाम किंवा मृत्यूअसा इस्लाम धर्माचा गाभा होता.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

३.      मूळ : हिंदू स्त्रियामुस्लिमांच्या नजरेस पडू नयेत म्हणून त्यांना घरातच राहायला सांगत.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

४.      मूळ : लावण्यवती राणी पद्मिनी हिची प्राप्ती करून घेण्यासाठी अल्लाउद्दीनने चितोडवर हल्ला केला.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

५.      मूळ : हिंदुस्थानातील लोकांवर आपला धर्म लादण्यासाठी मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

६.      मूळ : सुलतान महमूदाने मोठ्या प्रमाणावर हत्यालुटालूटविध्वंस आणि धर्मांतरे केली.

सुधारित : हत्या आणि धर्मांतरे हे उल्लेख वगळले जावेत.

७.      मूळ : सुलतान महमूदाने सोमनाथ मंदिरातील जडजवाहिरांची लूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली.

सुधारित : "शिवलिंगाची पायरी बनवली" हा उल्लेख वगळला जावा.

 

'औरंगजेबाचे धार्मिक धोरणया प्रकरणातील मजकूर गाळण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. हिंदूंशी तो कसा अमानुषपणे वागलाहिंदू मंदिरांचे त्याने काय केलेइस्लामचा प्रचार इत्यादींबद्दलचे सर्व उल्लेख वगळून टाकण्याचे या परिपत्रकवजा फतव्यात म्हंटले होते.

 आणि परिपत्रकात म्हंटल्याप्रमाणे हे सर्व बदल हे (तथाकथित) इतिहासतज्ञांच्या मदतीने आणि मान्यतेने होत होते हे विशेष दुर्दैवी! अशा प्रकारचा दुषित इतिहास भारताच्या उगवत्या पिढ्यांच्या माथ्यावर वर्षानुवर्षे लादून या तथाकथित ख्यातनाम इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचे आणि भावी पिढ्यांचे कधीही भरून येऊ न शकणारे असे नुकसान केले आहे.


पुस्तक क्रमांक ४. 


मूळ पुस्तक : The World of Fatwas

अनुवादित पुस्तक : : फतव्यांचे जग

अनुवाद : भारती पांडे

हे पुस्तक मला सर्वांत आवडलेलं आणि तितकंच डोकं भंडावून सोडणारं आहे. "फतवा म्हणजे काय?" या प्राथमिक प्रश्नापासून पुस्तकाची सुरुवात होते. फतवा म्हणजे निर्णय किंवा हुकूम. रोजच्या जीवनात कसे वागावे किंवा नित्य दिनक्रमातील प्रसंगांमध्ये काय भूमिका घ्यावी अशा स्वरूपाच्या शंकाएखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनेइस्लामी तज्ज्ञांसमोर मांडल्यावरतज्ज्ञांनी कुराण आणि हदीसमधील घटना आणि श्लोक यांच्या माध्यमातून दिलेली उत्तरं म्हणजे फतवा. यात आरोग्यवैवाहिक संबंधपरंपरावारसाहक्क अशा दैनंदिन मुद्द्यांपासून ते थेट सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवतीभूकंप का होतातशुक्रवारीच पवित्र दिवस काअशा सर्व प्रकारच्या प्रश्नोत्तरांचा समावेश असतो. सदर पुस्तकासाठी संदर्भ म्हणून लेखकाने १९८२ ते १९८७ या काळात प्रसिद्ध झालेल्या किफायती उल मुफ्ती यांच्या फतव्यांच्या ९ खंडांचा आणि त्याचप्रमाणे अहलउलेयारहिमिया अशा अन्य पाच संग्रहांचा आधार घेतला आहे. 

"भूकंप का होतो?" या प्रश्नाला "पृथ्वीवरील ज्या ठिकाणचं पाप वाढतं तेथील नस खेचली जाते आणि भूकंप होतो" असं उत्तर मिळतं. साप किंवा विंचवाच्या विषयावरील उपाय म्हणून देवाचा धावा करावा असं उत्तर येतं. अन्नपदार्थात माशी पडली तर ती कशी काढावी याचे नियम आहेत. हात पाय कसे धुवावेतलघवीला/शौचाला कसे जावे इत्यादींचेही नियम सांगितले आहेत.

काफर कोणाला मानावे?” या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकांनेक मुद्द्यांचं मंथन केलेलं आढळतं. प्रत्येक जीव जन्माला येताना इस्लामीच असतो परंतु त्याचे पालक त्याला अज्ञानाने ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात अशी मखलाशी केली जाते. वेदगीता आणि कुराण हे सर्व सारख्याच योग्यतेचे धर्मग्रंथ आहेत असे मानणारा तसेच इस्लाम आणि अन्य धर्म समान आहेत असे मानणारा इसम काफर समजावा. यापैकी काहीही गंमतीने किंवा वैतागाने उच्चारलं गेलं असलं तरीही त्याला काफर समजण्यात यावं अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश दिलेले आढळतात.

शिक्षणाविषयी किंवा खरं तर शिक्षणाच्या निरुपयोगीतेविषयी आणि अनावश्यकतेविषयी बरंच भाष्य केलेलं आहे. ज्या शिक्षणामुळे मोमीन अर्थात मुस्लिम लोक, इस्लामी रूढी आणि श्रद्धा यांचा तिटकारा करू लागतात असं आधुनिक शिक्षण घेण्यापेक्षा निरक्षर राहणं केव्हाही उत्तम असं सांगितलं गेलं आहे. झाडूवाल्याची नोकरी सोडून इंग्रजी शिक्षण घेणे हे तर अजूनच वाईट असा एक स्पष्ट निकाल आहे. (स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी काश्मिरी मुसलमानांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आल्यावर आलेली ही प्रतिक्रिया आहे.)

 

स्त्रिया आणि स्त्रीशिक्षण या विषयावर असंख्य फतवे आहेत. स्त्रिया चटकन बिघडू शकत असल्याने त्यांना शिक्षणसंस्थांना मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. स्त्री गुलामाशी संभोग पूर्णतः मान्य आहे. पत्नीशी शारीरिक संबंध कसे ठेवावेतमेहर म्हणजे कायउजूर म्हणजे काय इत्यादी स्त्रियासंभोगविवाह आणि संसार इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारे फतवे आहेत.

स्त्रियांविषयीची अनेक मतं धक्कादायक आहेत.

१.      पुरुषांसाठी सर्वात दुःखद बाब म्हणजे स्त्री आहे.

२.       नरकातही स्त्रियाच बहुसंख्येने आहेत.

३.       स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत अर्धी बुद्धी असते.

आणि या प्रत्येक मुद्द्याची कारणंही संबंधित फतव्यांमधून देण्यात आलेली आहेत.

तिहेरी तलाक आणि अटीयुक्त (conditional) तलाक म्हणजे काय आणि त्यातला फरक समजावून सांगणारे फतवे आहेत. तिहेरी तलाक च्या संबंधात पाकिस्तानी टेलिव्हिजनवरच्या एका जोडप्याच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग डोळे उघडणारा आहे.

पाकिस्तानी टीव्हीवरील एका मालिकेत नवराबायकोचं काम करणारं आणि प्रत्यक्ष आयुष्यातही नवरा-बायको असलेल्या दाम्पत्याचा धक्कादायक प्रसंग पुढीलप्रमाणे. मालिकेतला नवरा त्याच्या मालिकेतल्या बायकोला मालिकेत तलाक देतो. तो भाग संपल्यावर अर्थातच ते प्रसंग पूर्वीप्रमाणे म्हणजे अर्थातच विवाहित दाम्पत्याप्रमाणे राहू लागतं. ही बातमी कर्णोपकर्णी मौलवींपर्यंत पोचते आणि प्रकरण चिघळतं. मौलवींच्या मतानुसार एकदा तलाक झाल्यावर ते जोडपं, त्या स्त्रीचा इस्लामी नियमांप्रमाणे हलाला होईपर्यंत पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. हलाला म्हणजे अर्थातच त्या स्त्रीला अन्य एखाद्या पुरुषासोबत निकाह करून
, लैंगिक संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि त्यानंतर त्या पुरुषाने तलाक दिल्यानंतरच ती परत आपल्या जुन्या पतीशी विवाह करू शकते. मौलवींनी त्या स्त्रीला हलाला करून, 'शुद्धहोऊन मगच तिच्या मूळ नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करता येईल असा निवाडा दिला आणि तिला त्याप्रमाणे वागायला लावलं.

हे मूळ पुस्तक प्रचंड मोठं आहे. भारती पांडे यांनी मूळ पुस्तकाचा संपूर्ण अनुवाद केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अनेक संदर्भांची पुनरावृत्ती झाली आहे. एकच संदर्भ अनेकदा निरनिराळ्या उदाहरणांमध्ये पुनःपुन्हा दिले गेला आहे आणि त्यामुळे पुस्तकाची पृष्ठसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे असे पुनरावृत्ती झालेले संदर्भ वगळून त्यांनी पुस्तकाचा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपात अनुवाद केला आणि त्यानंतर हे पुस्तक आकाराला आलं.

आपण कल्पनाही करून शकणार नाही इतक्या विविध प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या पुस्तकात वाचकांच्या भेटीस येतात. एका ठिकाणी तर तब्बल दोन पानं भरून छोटे छोटे असे फक्त प्रश्न दिलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पुरवणाऱ्या फतव्यांची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

इस्लामी प्रेरणा, जीवन, धर्म, जीवनशैली, चालीरीती, कट्टरता आणि या सगळ्यावर मौलाना, मुल्ला, मौलवी इत्यादींची असलेली पोलादी पकड या सर्वांची इत्यंभूत माहिती मिळवायची असल्यास हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे.

 

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट विषयसंबंधीचे शेकडो संदर्भअगदी सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवून त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करून सोडण्याची आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची एक विलक्षण हातोटी डॉ अरुण शौरी यांच्या लेखनात आहे. प्रत्येकाने हे अंजन आवर्जून घ्यावंच. अर्थात त्यानंतरही डोळे उघडणं/न उघडणं हे मात्र सर्वस्वी वाचकांच्याच हातात आहे.

-हेरंब ओक

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स

सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...