* हा सातवा अर्थात अंतिम भाग वाचण्यापूर्वी सहावा भाग वाचला आहेत याची खात्री करून घ्या. पाचव्या भागानंतर सहावा आणि सातवा दोन्ही लागोपाठ टाकलेत म्हणून सांगतोय.
त्या खिडकीच्या बाहेर 'नेरळ जंक्शन' असा ठसठशीत मोठ्या अक्षरात लिहिलेला रेल्वेचा बोर्ड दिसत होता आणि बाजूलाच नेरळ स्टेशनचे ऐसपैस लांब प्लॅटफॉर्म पसरले होते. आमच्या खिडकीपासून ते स्टेशन जेमतेम चार-पाचशे मीटर (होहो.. म्हणजे आम्ही जाळलेल्या (!!!) दुर्मिळ (!!!) गवताच्या सो कॉल्ड क्षेत्रफळाच्या जेमतेम चार-पाचपट) अंतरावर होतं. म्हणजे आम्ही आमची सुटका करायला येणार्या ट्रेनरूपी वैकुंठ विमानापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतो. त्या कल्पनेनेही इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू !! अजून पंधरा मिनिटांत आम्ही ट्रेनमध्ये असणार होतो अर्थात हा जंगल्या आमची ट्रेन चुकू देणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर..
"हे बघा. इकडून आपल्याला इथे येणारी प्रत्येक गाडी आधीच दिसते. त्यामुळे तुमची ट्रेन चुकणार नाही हे नक्की."
खरं तर त्याच्या त्या वाक्याचा, त्या खिडकीचा आणि आमची ट्रेन मिळण्या-न मिळण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण कदाचित तो ते फॉर्म येईपर्यंत असाच काहीतरी वेळ काढत असावा. आणि अर्थातच एवढ्या जवळ स्टेशन बघून आमच्या मनाला एक उभारी मिळाली होती हे मात्र नक्की.
पुढच्या दहा मिनिटांनी दोन गोष्टी झाल्या.. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो आल्या आल्या लगेच ते फॉर्म त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेऊन भरून टाकावेत आणि इथून सुटावं असा विचार मनात आला होता. पण त्या माणसाने आपल्या साहेबाच्या स्टायलीतच हळूहळू एकेक करत ते फॉर्म्स त्याच्या सायबाला दिले. साहेब एकेक फॉर्म काळजीपूर्वक भरायला लागला.
एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण जे काम हातात घेतो ते तडीला जातं, हात लावू त्या गोष्टीचं सोनं होतं, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.. आमचा हा दिवस त्यातलाच होता.
दुसरी गोष्ट अशी झाली की त्या हरकाम्याच्या मागोमाग आम्हाला ट्रेनचा मोठा हॉर्न ऐकू आला आणि त्यामागोमाग ट्रेनच्या हेडलाईटने ती खिडकी उजळून निघाली. आल्यानंतर अक्षरशः दोन मिनिटांत ट्रेनने स्टेशन सोडलं आणि त्याबरोबरच आजच्या दिवसात घरी जाऊन, मस्त गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळी करून, आईच्या हातचं गरम गरम जेवून, पांघरुणात गुडुप्प होऊन, दुसर्या दिवशी दुपारी बाराशिवाय न उठण्याच्या आमच्या साध्या-सोप्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.
"हं.. इथे करा सह्या" असं म्हणून त्याने पॅडला लावलेले फॉर्म्स आणि पेन आमच्या दिशेने सरकवलं. एका पेनाने किंवा पॅडला असलेल्या त्या स्प्रिंगने एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती जखमी करता येऊ शकतं असे आसुरी विचार मनात डोकावून गेले. आणि त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. निदान न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यापेक्षा ते शतपटीने चांगलं होतं. अर्थात आम्ही काही न बोलता अर्धवट बघत/वाचत त्या फॉर्म्सवर सह्या केल्या आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर पडायला लागलो.
"तुमचं नशीब म्हणून आज तुम्हाला सोडतोय. पण पुढच्या वेळी सांभाळून राहा. दरवेळी माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला भेटेलच असं नाही" असा शेरा आमच्या पाठीवर पडला. आता मात्र काय व्हायचं ते होवो. पुढच्या ट्रेनला म्हणजे पहाटेच्या पहिल्या ट्रेनला निदान ४-५ तास तरी होतेच. तोवर याची चांगली कणिक तिंबायचीच. आपलं काय व्हायचं ते होवो. असे अविचार मनात मुळ धरायला लागले. पण पुन्हा एकदा संयम राखून आम्ही तिथून बाहेर पडलो. काही क्षणांपूर्वी फक्त अर्धा किलोमीटर वाटणारं ते अंतर आता पा-च-शे मीटर वाटायला लागलं होतं. कोणाच्याही अंगात आता काडीचाही उत्साह राहिला नव्हता. कसेबसे धडपडत, पाय खेचत आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. किती वेळ लागला, किती वाजलेत कशाकशाची आम्हाला पर्वा नव्हती.
तेवढ्यात स्टेशनच्या जवळच 'पीसीओ' असं लिहिलेला एक मोठ्ठा बोर्ड दिसला आणि अचानक आम्हाला किती उशिरा झालाय, घरचे कसे आपली वाट बघत असतील, काळजीने बेजार झाले असतील वगैरे वस्तुस्थितीचा साक्षात्कार झाला. सगळ्यांनी फोन करायला जाण्यापेक्षा कोणीतरी एकानेच घरी फोन करायचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर्स देऊन त्यांना पुढे सगळ्यांच्या घरी फोन करायला सांगायचे असा एक अतिशय विचित्र निर्णय आम्ही घेतला. आधीच्या प्रत्येक चुकीच्या (बरोबर निर्णय जवळपास नगण्य होते) निर्णयाप्रमाणेच हाही निर्णय आम्ही का घेतला याचं कुठलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.. कदाचित हा निर्णय पूर्णतः चुकीचा नसेलही पण माझ्यापुरता तरी तो पूर्णतः चुकला. कारण आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता आणि मी आमच्या शेजारच्यांचा नंबर दिला होता. त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना मेसेज मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या घरीही मला यायला उशीर होतोय वगैरे काहीही निरोप मिळाला नाही. (अर्थात हे सगळं मला नंतर कळलं)
स्टेशनमध्ये शिरल्याशिरल्या आम्ही प्लॅटफॉर्मवर असलेल्या टाईमटेबलमध्ये पुढची गाडी बघितली. चुकली ती खरोखर शेवटची गाडी होती की अजून एखादी गाडी नंतर आहे अशी वेडी आशाही त्यात होतीच. पण रेल्वेला आमच्या शहाण्या/वेड्या आशेशी काही घेण-देणं नव्हतं. चुकली ती ट्रेन शेवटचीच होती आणि पुढची ट्रेन पहाटे सव्वाचारला होती. थोडक्यात आम्हाला कमीतकमी चार तास तरी या थंडीत कुडकुडत काढायचे होते. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरच्या दिसेल त्या जागेवर आम्ही बसलो आणि सॅक उशाशी घेऊन पसरलो. जरा वेळ झोप लागलीही पण भरपूर डास आणि प्रचंड थंडी यामुळे खूप त्रास होत होता. अखेरीस झोपण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तसेच आडवे पडून, बसून गप्पा आणि डास मारत वेळ काढायला लागलो. डोंबिवली स्टेशनवर असणार्या रात्रभर चालणाया चहाच्या टपरीसारखी टपरी इतर कुठेही नसते या इतर वेळी अभिमानाने मिरवण्याच्या गोष्टीचं निदान त्यावेळी तरी आम्हाला चांगलंच दुःख झालं.
काही किलो गप्पा आणि अंदाजे सहा डझन डास मारायला चार तास लागत असावेत. कारण तेवढं होईस्तोवर आम्हाला ट्रेनचा प्रखर हेडलाईट आणि त्याच्या मागोमाग आमचा त्याक्षणीचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ट्रेनचा भोंगा ऐकू आला. गाडी थांबताक्षणी आम्ही आत शिरलो आणि मिळेल त्या ठिकाणी लवंडलो. थंडगार वार्यात तासभर चांगली गाढ झोप लागली. तासाभराने 'डोंबिवली' असा बोर्ड दिसल्यावर आमचा क्षणभर विश्वासच बसेना. पण ते खरं होतं.
उतरल्यावर पटापटा फायनल टाटा-बाय करून आम्ही सगळे दोन ग्रुपमध्ये स्टेशनच्या दोन दिशांना पांगलो. चालत जात जात स्टेशनच्या एका टोकाला आल्यावर बाहेर पडणार एवढ्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने आम्हाला अडवलं. तो कोण आहे वगैरे क्षणभर आम्हाला कळलंही नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अशक्य संताप झाला........................
आता यापुढे मी जे लिहिणार आहे ते म्हणजे निव्वळ फेकाफेकी किंवा शेवटचा प्रसंग उगाच अजून चढवून चढवून सांगण्यासाठी केलेली योजना वाटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच काहीसं वाटलं असतं. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण देऊन सांगतोय की जे घडलं ते अगदी असंच घडलं होतं................
सोमवारचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आणि हा काळा डगला घातलेला माणूस त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला उभा राहून आमच्याकडे तिकीट मागत होता. त्याच्या तोंडावर तिकीट मारून तिथून ताबडतोब बाहेर पडावं म्हणून आम्ही खिशात हात घातला आणि चर्र झालं, बॅगा तपासल्या आणि ठार मेलो. काल पहाटे (म्हणजे बरोबर चोवीस तासांपूर्वी) ज्याने आमची सगळ्यांची तिकिटं काढली होती ती तिकिटं त्याच्याकडेच राहिली होती. पूर्ण वेळ एकत्र असल्याने ती तिकिटं मागून घेण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की त्याची तशी गरजही वाटली नव्हती. पण आता या बाप्याला हे समजावणार कसं?? तिकीट नाही आणि दंड भरायला पैसेही नाहीत.. थोडक्यात नेरळचा टाळलेला तुरुंग डोंबिवलीत येऊनही आमची पाठ सोडणार नव्हता. गेल्या चोवीस तासात आमच्या मानसिकतेत कसला बदल झाला होता !! पूर्वी तुरुंग हा विचारही मनात न
आणू शकणारे आम्ही तोच शब्द किती सहजपणे उच्चारू शकत होतो..
पण नाही. अचानक आमच्यातल्या एकानेच उरलंसुरलं प्रसंगावधान आयत्या वेळी वापरलं आणि त्या टीसीला समजावलं. त्याला सगळी कहाणी इत्यंभूत कथन केली. अर्थात इत्यंभूत म्हणजे आग लागली, दंड भरला वगैरे प्रकार वगळून.. उतरताना रस्ता चुकलो, शेवटची गाडी चुकली त्यामुळे रात्रभर स्टेशनवर बसून राहायला लागलं, आमची तिकिटं मित्रांकडेच राहिली आणि ते आत्ताच दुसर्या बाजूने बाहेर पडले वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आमची एकंदर अवस्था बघून त्याचाही आमच्यावर विश्वास बसला असावा.त्याने काही न बोलता हसून आम्हाला सोडून दिलं. गेल्या चोवीस तासात आमच्याबरोबर घडलेली ही एकमेव चांगली घटना आणि त्यामुळेच इतकी छोटी असूनही (अर्थात सहीसलामत सुटल्याने आता ती आम्हाला छोटीशी वाटत होती.) आम्ही डोंबिवलीतल्या जगप्रसिद्ध २४x७ टपरीवर चहा पिऊन ती सेलिब्रेटही केली.
घरी पोचल्यावर दार उघडता उघडताच आईचा काळजीने काळवंडलेला चेहरा, रात्रभर जागरण केल्याने तारवटलेले डोळे आणि "अरे काय हे? होतास कुठे तू रात्रभर??" ने झालेलं स्वागत पाहताच मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण दुसर्याच क्षणी लक्षात आलं की निरोप पोचलेला नसावा !! त्यामुळे शूज काढता काढताच दिवसभर घडलेले वेगवेगळे किस्से आणि ओढवलेले प्रसंग यांचं साग्रसंगीत (पण अर्थातच तीव्रता कमी करून) कथाकथन करून आणि फोन करून निरोप द्यायला सांगितलं होतं हेही अगदी हायलाईट करून सांगून झालं. गरमागरम खाऊन, पिऊन गादीवर अंग टाकताना अजूनही हे खरं घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. काल याच गादीवरून उठताना परत झोपायला जाईपर्यंत थेट चोवीस तास उलटून जातील आणि त्या चोवीस तासांत "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" किंवा "जान बची लाखो पाए" असल्या वाक्प्रचारांचे अर्थ एवढे जवळून आणि ठसठशीतपणे समजण्याइतके अनुभव गाठीशी बांधले जातील याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूला झाडं, जंगल, दगड-धोंडे (आणि फॉरेस्ट ऑफिस आणि तुरुंगही) नसून आपली नेहमीची गादी, उशी, पांघरूण आहे हे पाहून प्रचंड हायसं वाटलं. बहुतेक स्वप्नातही मी पुन्हा एकदा प.. प.. पेब उतरून आलो होतो.. !!! संध्याकाळी सगळ्यांशी बोलताना जवळपास प्रत्येकाच्या घरी असंच स्वागत झालं असल्याचं कळलं. पण एवढं सगळं होऊनही एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे कोणाच्याही घरून ट्रेक्सना बंदी आली नाही, ट्रेक्स चालूच राहिले. मात्र त्या दिवसानंतर आम्ही कोणीही कधीच त्या दिवसाविषयी, त्या पेब ट्रेकविषयी एकमेकांशी आणि कोणाशीच कधीच विशेष बोललो नाही.
त्यानंतर अनेक ट्रेक केले.. पेबच कमीत कमी ४-५ वेळा केला. अनेक ट्रेक्सना चुकलो, पडलो, घसरलो, धडपडलो, उपाशी राहिलो, पाण्यासाठी वणवण केली, वैतागलो, चिडलो, संतापलो, डिप्रेस झालो. पण दर वेळी ८ फेब्रुवारीचा पेब ट्रेक आठवला की अचानक सगळं सुसह्य वाटायला लागायचं. त्या दिवसाच्या मानाने आजचा दिवस एवढा वाईट नक्कीच नाही असं जाणवायचं, वाट आपोआप सापडायची, आपोआपच धीर यायचा, सगळं सहज शक्य वाटायला लागायचं..... हा त्या पेब ट्रेकमधून मिळालेला पॉझिटिव्ह धडा !!!
या ट्रेकनंतर मी ट्रेकशी संबंधित तीन गोष्टी कधीही केल्या नाहीत
१. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.
२. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.
३. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही. !!!!!
- (एकदाचं) समाप्त
भाग १ इथे वाचा
भाग २ इथे वाचा
भाग ३ इथे वाचा
भाग ४ इथे वाचा
भाग ५ इथे वाचाभाग ६ इथे वाचा
त्या खिडकीच्या बाहेर 'नेरळ जंक्शन' असा ठसठशीत मोठ्या अक्षरात लिहिलेला रेल्वेचा बोर्ड दिसत होता आणि बाजूलाच नेरळ स्टेशनचे ऐसपैस लांब प्लॅटफॉर्म पसरले होते. आमच्या खिडकीपासून ते स्टेशन जेमतेम चार-पाचशे मीटर (होहो.. म्हणजे आम्ही जाळलेल्या (!!!) दुर्मिळ (!!!) गवताच्या सो कॉल्ड क्षेत्रफळाच्या जेमतेम चार-पाचपट) अंतरावर होतं. म्हणजे आम्ही आमची सुटका करायला येणार्या ट्रेनरूपी वैकुंठ विमानापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतो. त्या कल्पनेनेही इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू !! अजून पंधरा मिनिटांत आम्ही ट्रेनमध्ये असणार होतो अर्थात हा जंगल्या आमची ट्रेन चुकू देणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर..
"हे बघा. इकडून आपल्याला इथे येणारी प्रत्येक गाडी आधीच दिसते. त्यामुळे तुमची ट्रेन चुकणार नाही हे नक्की."
खरं तर त्याच्या त्या वाक्याचा, त्या खिडकीचा आणि आमची ट्रेन मिळण्या-न मिळण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण कदाचित तो ते फॉर्म येईपर्यंत असाच काहीतरी वेळ काढत असावा. आणि अर्थातच एवढ्या जवळ स्टेशन बघून आमच्या मनाला एक उभारी मिळाली होती हे मात्र नक्की.
पुढच्या दहा मिनिटांनी दोन गोष्टी झाल्या.. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो आल्या आल्या लगेच ते फॉर्म त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेऊन भरून टाकावेत आणि इथून सुटावं असा विचार मनात आला होता. पण त्या माणसाने आपल्या साहेबाच्या स्टायलीतच हळूहळू एकेक करत ते फॉर्म्स त्याच्या सायबाला दिले. साहेब एकेक फॉर्म काळजीपूर्वक भरायला लागला.
एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण जे काम हातात घेतो ते तडीला जातं, हात लावू त्या गोष्टीचं सोनं होतं, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.. आमचा हा दिवस त्यातलाच होता.
दुसरी गोष्ट अशी झाली की त्या हरकाम्याच्या मागोमाग आम्हाला ट्रेनचा मोठा हॉर्न ऐकू आला आणि त्यामागोमाग ट्रेनच्या हेडलाईटने ती खिडकी उजळून निघाली. आल्यानंतर अक्षरशः दोन मिनिटांत ट्रेनने स्टेशन सोडलं आणि त्याबरोबरच आजच्या दिवसात घरी जाऊन, मस्त गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळी करून, आईच्या हातचं गरम गरम जेवून, पांघरुणात गुडुप्प होऊन, दुसर्या दिवशी दुपारी बाराशिवाय न उठण्याच्या आमच्या साध्या-सोप्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.
"हं.. इथे करा सह्या" असं म्हणून त्याने पॅडला लावलेले फॉर्म्स आणि पेन आमच्या दिशेने सरकवलं. एका पेनाने किंवा पॅडला असलेल्या त्या स्प्रिंगने एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती जखमी करता येऊ शकतं असे आसुरी विचार मनात डोकावून गेले. आणि त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. निदान न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यापेक्षा ते शतपटीने चांगलं होतं. अर्थात आम्ही काही न बोलता अर्धवट बघत/वाचत त्या फॉर्म्सवर सह्या केल्या आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर पडायला लागलो.
"तुमचं नशीब म्हणून आज तुम्हाला सोडतोय. पण पुढच्या वेळी सांभाळून राहा. दरवेळी माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला भेटेलच असं नाही" असा शेरा आमच्या पाठीवर पडला. आता मात्र काय व्हायचं ते होवो. पुढच्या ट्रेनला म्हणजे पहाटेच्या पहिल्या ट्रेनला निदान ४-५ तास तरी होतेच. तोवर याची चांगली कणिक तिंबायचीच. आपलं काय व्हायचं ते होवो. असे अविचार मनात मुळ धरायला लागले. पण पुन्हा एकदा संयम राखून आम्ही तिथून बाहेर पडलो. काही क्षणांपूर्वी फक्त अर्धा किलोमीटर वाटणारं ते अंतर आता पा-च-शे मीटर वाटायला लागलं होतं. कोणाच्याही अंगात आता काडीचाही उत्साह राहिला नव्हता. कसेबसे धडपडत, पाय खेचत आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. किती वेळ लागला, किती वाजलेत कशाकशाची आम्हाला पर्वा नव्हती.
तेवढ्यात स्टेशनच्या जवळच 'पीसीओ' असं लिहिलेला एक मोठ्ठा बोर्ड दिसला आणि अचानक आम्हाला किती उशिरा झालाय, घरचे कसे आपली वाट बघत असतील, काळजीने बेजार झाले असतील वगैरे वस्तुस्थितीचा साक्षात्कार झाला. सगळ्यांनी फोन करायला जाण्यापेक्षा कोणीतरी एकानेच घरी फोन करायचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर्स देऊन त्यांना पुढे सगळ्यांच्या घरी फोन करायला सांगायचे असा एक अतिशय विचित्र निर्णय आम्ही घेतला. आधीच्या प्रत्येक चुकीच्या (बरोबर निर्णय जवळपास नगण्य होते) निर्णयाप्रमाणेच हाही निर्णय आम्ही का घेतला याचं कुठलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.. कदाचित हा निर्णय पूर्णतः चुकीचा नसेलही पण माझ्यापुरता तरी तो पूर्णतः चुकला. कारण आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता आणि मी आमच्या शेजारच्यांचा नंबर दिला होता. त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना मेसेज मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या घरीही मला यायला उशीर होतोय वगैरे काहीही निरोप मिळाला नाही. (अर्थात हे सगळं मला नंतर कळलं)
स्टेशनमध्ये शिरल्याशिरल्या आम्ही प्लॅटफॉर्मवर असलेल्या टाईमटेबलमध्ये पुढची गाडी बघितली. चुकली ती खरोखर शेवटची गाडी होती की अजून एखादी गाडी नंतर आहे अशी वेडी आशाही त्यात होतीच. पण रेल्वेला आमच्या शहाण्या/वेड्या आशेशी काही घेण-देणं नव्हतं. चुकली ती ट्रेन शेवटचीच होती आणि पुढची ट्रेन पहाटे सव्वाचारला होती. थोडक्यात आम्हाला कमीतकमी चार तास तरी या थंडीत कुडकुडत काढायचे होते. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरच्या दिसेल त्या जागेवर आम्ही बसलो आणि सॅक उशाशी घेऊन पसरलो. जरा वेळ झोप लागलीही पण भरपूर डास आणि प्रचंड थंडी यामुळे खूप त्रास होत होता. अखेरीस झोपण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तसेच आडवे पडून, बसून गप्पा आणि डास मारत वेळ काढायला लागलो. डोंबिवली स्टेशनवर असणार्या रात्रभर चालणाया चहाच्या टपरीसारखी टपरी इतर कुठेही नसते या इतर वेळी अभिमानाने मिरवण्याच्या गोष्टीचं निदान त्यावेळी तरी आम्हाला चांगलंच दुःख झालं.
काही किलो गप्पा आणि अंदाजे सहा डझन डास मारायला चार तास लागत असावेत. कारण तेवढं होईस्तोवर आम्हाला ट्रेनचा प्रखर हेडलाईट आणि त्याच्या मागोमाग आमचा त्याक्षणीचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ट्रेनचा भोंगा ऐकू आला. गाडी थांबताक्षणी आम्ही आत शिरलो आणि मिळेल त्या ठिकाणी लवंडलो. थंडगार वार्यात तासभर चांगली गाढ झोप लागली. तासाभराने 'डोंबिवली' असा बोर्ड दिसल्यावर आमचा क्षणभर विश्वासच बसेना. पण ते खरं होतं.
उतरल्यावर पटापटा फायनल टाटा-बाय करून आम्ही सगळे दोन ग्रुपमध्ये स्टेशनच्या दोन दिशांना पांगलो. चालत जात जात स्टेशनच्या एका टोकाला आल्यावर बाहेर पडणार एवढ्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने आम्हाला अडवलं. तो कोण आहे वगैरे क्षणभर आम्हाला कळलंही नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अशक्य संताप झाला........................
आता यापुढे मी जे लिहिणार आहे ते म्हणजे निव्वळ फेकाफेकी किंवा शेवटचा प्रसंग उगाच अजून चढवून चढवून सांगण्यासाठी केलेली योजना वाटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच काहीसं वाटलं असतं. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण देऊन सांगतोय की जे घडलं ते अगदी असंच घडलं होतं................
सोमवारचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आणि हा काळा डगला घातलेला माणूस त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला उभा राहून आमच्याकडे तिकीट मागत होता. त्याच्या तोंडावर तिकीट मारून तिथून ताबडतोब बाहेर पडावं म्हणून आम्ही खिशात हात घातला आणि चर्र झालं, बॅगा तपासल्या आणि ठार मेलो. काल पहाटे (म्हणजे बरोबर चोवीस तासांपूर्वी) ज्याने आमची सगळ्यांची तिकिटं काढली होती ती तिकिटं त्याच्याकडेच राहिली होती. पूर्ण वेळ एकत्र असल्याने ती तिकिटं मागून घेण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की त्याची तशी गरजही वाटली नव्हती. पण आता या बाप्याला हे समजावणार कसं?? तिकीट नाही आणि दंड भरायला पैसेही नाहीत.. थोडक्यात नेरळचा टाळलेला तुरुंग डोंबिवलीत येऊनही आमची पाठ सोडणार नव्हता. गेल्या चोवीस तासात आमच्या मानसिकतेत कसला बदल झाला होता !! पूर्वी तुरुंग हा विचारही मनात न
आणू शकणारे आम्ही तोच शब्द किती सहजपणे उच्चारू शकत होतो..
पण नाही. अचानक आमच्यातल्या एकानेच उरलंसुरलं प्रसंगावधान आयत्या वेळी वापरलं आणि त्या टीसीला समजावलं. त्याला सगळी कहाणी इत्यंभूत कथन केली. अर्थात इत्यंभूत म्हणजे आग लागली, दंड भरला वगैरे प्रकार वगळून.. उतरताना रस्ता चुकलो, शेवटची गाडी चुकली त्यामुळे रात्रभर स्टेशनवर बसून राहायला लागलं, आमची तिकिटं मित्रांकडेच राहिली आणि ते आत्ताच दुसर्या बाजूने बाहेर पडले वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आमची एकंदर अवस्था बघून त्याचाही आमच्यावर विश्वास बसला असावा.त्याने काही न बोलता हसून आम्हाला सोडून दिलं. गेल्या चोवीस तासात आमच्याबरोबर घडलेली ही एकमेव चांगली घटना आणि त्यामुळेच इतकी छोटी असूनही (अर्थात सहीसलामत सुटल्याने आता ती आम्हाला छोटीशी वाटत होती.) आम्ही डोंबिवलीतल्या जगप्रसिद्ध २४x७ टपरीवर चहा पिऊन ती सेलिब्रेटही केली.
घरी पोचल्यावर दार उघडता उघडताच आईचा काळजीने काळवंडलेला चेहरा, रात्रभर जागरण केल्याने तारवटलेले डोळे आणि "अरे काय हे? होतास कुठे तू रात्रभर??" ने झालेलं स्वागत पाहताच मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण दुसर्याच क्षणी लक्षात आलं की निरोप पोचलेला नसावा !! त्यामुळे शूज काढता काढताच दिवसभर घडलेले वेगवेगळे किस्से आणि ओढवलेले प्रसंग यांचं साग्रसंगीत (पण अर्थातच तीव्रता कमी करून) कथाकथन करून आणि फोन करून निरोप द्यायला सांगितलं होतं हेही अगदी हायलाईट करून सांगून झालं. गरमागरम खाऊन, पिऊन गादीवर अंग टाकताना अजूनही हे खरं घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. काल याच गादीवरून उठताना परत झोपायला जाईपर्यंत थेट चोवीस तास उलटून जातील आणि त्या चोवीस तासांत "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" किंवा "जान बची लाखो पाए" असल्या वाक्प्रचारांचे अर्थ एवढे जवळून आणि ठसठशीतपणे समजण्याइतके अनुभव गाठीशी बांधले जातील याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूला झाडं, जंगल, दगड-धोंडे (आणि फॉरेस्ट ऑफिस आणि तुरुंगही) नसून आपली नेहमीची गादी, उशी, पांघरूण आहे हे पाहून प्रचंड हायसं वाटलं. बहुतेक स्वप्नातही मी पुन्हा एकदा प.. प.. पेब उतरून आलो होतो.. !!! संध्याकाळी सगळ्यांशी बोलताना जवळपास प्रत्येकाच्या घरी असंच स्वागत झालं असल्याचं कळलं. पण एवढं सगळं होऊनही एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे कोणाच्याही घरून ट्रेक्सना बंदी आली नाही, ट्रेक्स चालूच राहिले. मात्र त्या दिवसानंतर आम्ही कोणीही कधीच त्या दिवसाविषयी, त्या पेब ट्रेकविषयी एकमेकांशी आणि कोणाशीच कधीच विशेष बोललो नाही.
त्यानंतर अनेक ट्रेक केले.. पेबच कमीत कमी ४-५ वेळा केला. अनेक ट्रेक्सना चुकलो, पडलो, घसरलो, धडपडलो, उपाशी राहिलो, पाण्यासाठी वणवण केली, वैतागलो, चिडलो, संतापलो, डिप्रेस झालो. पण दर वेळी ८ फेब्रुवारीचा पेब ट्रेक आठवला की अचानक सगळं सुसह्य वाटायला लागायचं. त्या दिवसाच्या मानाने आजचा दिवस एवढा वाईट नक्कीच नाही असं जाणवायचं, वाट आपोआप सापडायची, आपोआपच धीर यायचा, सगळं सहज शक्य वाटायला लागायचं..... हा त्या पेब ट्रेकमधून मिळालेला पॉझिटिव्ह धडा !!!
या ट्रेकनंतर मी ट्रेकशी संबंधित तीन गोष्टी कधीही केल्या नाहीत
१. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.
२. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.
३. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही. !!!!!
- (एकदाचं) समाप्त