Tuesday, November 14, 2017

ठसका !

शी आई. किती उचकी लागली आहे बघ ना.

शी काय त्यात? पाणी पी थोडं. लगेच थांबेल मग उचकी.

आई, ते उचकीचं तू काय सांगितलं होतंस? मला कोणाची तरी आठवण येत असली की उचकी येते ना?

हाहाहाहा. नाही रे राजा. कोणीतरी तुझी आठवण काढत असेल तर मग तुला उचकी लागते.

अग आई, पण कळणार कसं कोण आठवण काढतंय, कोणामुळे उचकी लागली आहे ते?

तसं कळत नाही राजा. पण आपण एक गंमत करूया. आपण तुझे मित्र, भावंडं असं एकेक करत सगळ्यांची नावं घेत जाऊया. ज्याचं नाव घेतल्यावर तुझी उचकी थांबेल ती व्यक्ती तुझी आठवण काढत होती असं समजायचं. चालेल?

बापरे. एवढी नावं घेत बसू मी?

मग काय? त्यात काय झालं? नावं घेता घेता उचकी थांबेल की तुझी.

नाही हा. मुळीच नाही. मी नाही एवढ्या सगळ्यांची नावं घेत बसणार. मी फक्त एकाच फ्रेंडचं नाव घेणार आणि पुढे फक्त 'एट सेट्रा' म्हणणार !!!!

मातोश्रींना लागलेला ठसका अजूनही थांबलेला नाहीये !!!!

#आदि_व_इत्यादी

No comments:

Post a Comment

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...