"मी पंखा झालोय यार तिचा.. आणि तिच्या त्यांचाही. काय तो त्यांचा दांडगा आवेश, तो सळसळता उत्साह, ती जळजळीत भाषा, ती रसरशीत लेखणी, ते विखारी फुत्कार, घुत्कार, ठुत्कार, डूत्कार, युत्कार ('त्कार' च्या अलिकडे काहीही लिहिलं तरी चालतं. ते फुत्कार क्याटागरीतलंच ठरतं.) ... जिओ लोक्स जिओ.. तुम्ही महान आहात.. तुमच्यापुढे इतर लोक ते काय... भ्याड, मुर्दाड, स्वाभिमान गमावलेले, कणा नसलेले.. थुत् तिच्यायला त्या इतर लोकांच्या.. तुमची जातच साली काय और आहे. मानला यार तुम्हाला"
आजकाल मी तिचं आणि तिच्या त्यांचं कौतुक करताना थकत नाही.. थकूच शकत नाही.. प्रेमात पडलोय मी त्यांच्या.. त्यांच्या धडाडीच्या.. त्यांच्या त्या जोरदार घोषणांच्या... त्यांच्या तडफेच्या....
"साली ती पाहिजे तर अशी आणि तिचे ते पाहिजेत तर असे.. उगाच नाही तिला 'बरगड्डी संघटना' म्हणत आणि तिचे 'ते' म्हणजे तिचे कार्यकर्ते... माफी सरकार माफी.. कार्यकर्ते नाही मावळे.. बेड्डर, निड्डर मावळे... आंगाश्शी.. हल्ली कुठलाही ब्लॉग, वृत्तपत्रं, बातम्या, मासिकं, वेबसाईटस इत्यादी काहीही बघितलं तरी तिचा आणि त्यांचा उदोउदो चालू असतो सगळीकडे.. छा गेलेत मस्त सगळीकडे !! सध्याच्या काळात एवढ्या वेगाने आणि फार्फार जोमाने घोडदौड करत पुढे येत 'समाजप्रबोधनाचं' (काही सडके याला समाज विघटनाचं कार्यही म्हणतात. म्हणोत च्यायला.. आपल्याला काय.) काम करणारी दुसरी 'ती' माझ्यातरी पाहण्यात नाही."
शेवटी व्हायचं तेच झालं. तिच्याबद्दल इतकं वाचून, ऐकून, पाहून माझा कणा ताठ झाला, स्वाभिमान जागृत झाला, उत्साह परत आला.. आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याची मला नव्याने ओळख झाली. जर नुसतं वाचून, ऐकून इतका प्रभाव पडत असेल तर मग प्रत्यक्ष तिच्या त्यांना भेटून तर माझ्या जीवनात किती आमुलाग्र बदल होईल विचार करा... हट साला.. अमुलाग्र बदल काय.. ही भटी-बामणी भाषा नकोच.. मी पेटून उठलो, जडावलेल्या मेंदूत तप्त सळया डागाव्यात त्याप्रमाणे मी भस्सकन जागा झालो.. हां.. जमतंय जमतंय.. जमेल जमेल.. !!
तर असा पेटून उठल्यावर, कणा ताठ करून, मेंदू जागृत करून मी थेट पोचलो ते तिच्या हापिसात. आणि दारातूनचं ओरडलो
"ए हलकट कुत्र्यांनो.. असे बसलात काय षंढासारखे? मी तुमच्याकडे आलोय ते तुमच्यात सामील व्हायला. मलाही घ्या तुमच्यात. मलाही काम करू द्या तुमच्याबरोबर. माझं रक्त सळसळत आहे, मेंदूत जाळ आहे, कणा ताठ आहे, स्वाभिमान जागृत आहे."
"अरे ए... कोण तू? काय हवंय तुला? कशासाठी आला आहेस इथे?" त्यांच्यातला मुख्य वाटणारा असा एकजण म्हणाला.
"मला तुमच्यात सामील व्हायचंय. तुमच्याबरोबर काम करायचंय. माझा कणा ताठ आहे, मेंदू जागा आहे."
"अबे, ते सगळं ठीक आहे. पण आम्ही असं कोणालाही आमच्यात सामील करून घेत नाही. आमच्या काही अटी आहेत."
"हो अटी बीटी सगळ्या माहित्येत मला. षंढ नको, नपुंसक नको, स्वाभिमान हवा, मुठी आवळता यायला हव्यात, स्वतःला मावळा म्हणता यायला हवं वगैरे वगैरे ना?"
"अरे तेवढंच नाही बाबा. अजूनही चिकार अटी आहेत. या बघ" असं म्हणत त्याने चक्क एक कागदाचं मोठं भेंडोळंच माझ्या पुढ्यात नाचवलं. अधीरतेने ते हातात घेऊन मी ते अधाशासारखं वाचायला लागलो. त्यात बरगड्डी संघटनेत सहभागी होण्यासाठीची पात्रता, त्यांचे नियम, अटी वगैरे वगैरे दिल्या होत्या. एकंदरीत फारच विचारपूर्वक, अभ्यास करून सगळे मुद्दे मांडलेले होते हे तर स्पष्टच होतं.
बरगड्डी संघटना : पात्रता, नियम व अटी
१. 'बामण' हा शब्द शुद्ध लिहिता आला पाहिजे. अलिकडे 'बामण' ला 'ब्राह्मण' असं म्हणण्याची आणि 'ब्राह्मण' हा शब्दच योग्य आहे असा प्रचार करण्याची एक फ्याशन आलेली आहे. तर या अपप्रचाराला बळी न पडता 'बामण' असं योग्य पद्धतीनेच लिहिता आलं पाहिजे.
२. किरटेगाव बुद्रुकच्या 'दै. सत्यभेदक बातमीदार' किंवा भाम्बुर्डी खुर्दच्या ' दै. रणमर्दाचा आसूड' यांसारख्या महान वृत्तपत्रात पत्रकारितेचा अनुभव असावा. तिथे संपादक असाल तर उत्तमच. अगदीच काही नाही तर निदान संपादकांशी चांगली ओळख तरी असावी. तुमच्या स्वतःच्याच मालकीचं वृत्तपत्र असेल तर मग तर सोन्याहून पिवळं. तुम्हाला संघटनेत महत्वाचं पद मिळणार याची खात्री बाळगा.
३. लेख, ब्लॉग, सदर इ. काहीही लिहिताना दर एका वाक्याआड 'षंढ' हा शब्द आला पाहिजे. षंढ शब्दाचा वाक्यात उपयोग करता आला नाही तर तुमच्या वकुबावर नक्कीच प्रश्नचिन्ह उमटवलं जाईल आणि तुमचा संघटनेतला प्रवेश लांबेल.
४. नागडा, हरामखोर, भट, भटुरडा, नीच, हलकट, पाजी हे शब्द 'षंढ' एवढ्या वारंवारतेने नाही तरी बर्यापैकी मुबलक प्रमाणात वापरता आले पाहिजेत.
५. तसंच नपुंसक, रक्त, पेटून, हराम, अवलाद, वर्णवर्चस्व, कष्टकरी, शास्त्री, पिलावळ, भांडार, कर, थंड, रक्त, साले, नीच यांसारखे विविध शब्दही अतिशय कुशलतेने आणि खुबीने जागोजाग पेरता आले पाहिजेत.
६. फक्त मराठा जातीच्या व्यक्तींचा उल्लेख करतानाच नावापुढे जी, साहेब, राव वगैरे शब्द लावले जावेत. अन्य कुठल्याही नावांपुढे हे उल्लेख चालणार नाहीत. कारण जे मराठा नाहीत ते कर्तृत्ववान नाहीत हे तर उघडच आहे. तरीही अजूनही कोणाला काही शंका असल्यास कुठले शब्द कशा रीतीने वापरावेत याचा एक छोटा नमुना पुढीलप्रमाणे. पाहिले शब्द हे (बामणांच्या) बोलीभाषेतील आहेत तर त्यांच्या पुढे दिलेले शब्द हे बरगड्डीच्या सुधारित भाषेतील आहेत.
बाबासाहेब = बाब्या
देशपांडे = देशपांड्या
रामदास = रामदाश्या
पुरंदरे = पुरंदर्या
दादोजी = दादू इत्यादी इत्यादी इत्यादी
७. कुठल्याही पुस्तकातल्या उपमा, अलंकार, वर्णन वगैरेंचे उगाच बामणी अर्थ लावू नयेत. बामणाने लिहिलेल्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात एक छुपा अर्थ असतो. आणि प्रत्येक बामण हा नीच, हलकट, पाजी, बेशरम (इथे आपल्या आवडीची विशेषणं/शिव्या आपल्याला कंटाळा येईपर्यंत लावू शकता. कारण ही प्रत्येक शिवी प्रत्येक बामणाला लागू पडतेच.)
उदा. "अ आणि ब यांचं गोत्र एकच होतं" याचा बामणी अर्थ त्यांचं ध्येय, इच्छा, आकांक्षा, दिशा एकच होत्या असा हे बामण तुम्हाला सांगतील. पण याचा खराखुरा आणि छुपा अर्थ मात्र "अ आणि ब चं 'वेगळंच' नातं होतं" हा होतो हे चतुराईने ओळखता आलं पाहिजे.
८. इतिहासातल्या कुठल्याही एका बामण व्यक्तीबद्दल सणसणीत, खणखणीत, दणदणीत माहिती काढून, शोध लावून त्या बामणाचं छुपं स्वरूप सगळ्यांसमोर उघडं केलेलं असेल अशा स्वरूपाचं एखादं २५-३० पानी का होईना पण पुस्तक किंवा गेला बाजार एखादं इ-बुक तरी छापलेलं असलंच पाहिजे.
९. झाकी-बाकी यांसारखी प्रत्यक्षात य ला ट सारखी असणारी पण प्रत्यक्षात सर्वसामान्यांना प्रचंड जवळची अशी वाटणारी, प्रचंड अर्थ असणारी यमकं जुळवता आली पाहिजेत.
उदा : "भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा अभी बाकी है" ही जगप्रसिद्ध घोषणा आपण ऐकली असेलच. दरम्यान गेल्याच आठवड्यात एका नवीन मावळ्याने बरगड्डीत प्रवेश मिळवताना खाली दिलेली घोषणा दिली. त्याला एका क्षणात बरगड्डीचं आजीव सभासदत्व मिळालं.
(बरगड्डीत प्रत्येकालाच न्याय मिळतो याचं यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण दुसरं काय मिळणार?)
ती घोषणा : "रामादाश्या तो झाकी है, ज्ञान्या अभी बाकी है"
ही नऊ अटींची नियमावली वाचता वाचताच माझं रक्त सळसळायला लागलं होतं. मेंदू पेटून उठला होता. सर्वांग थरथरायला लागलं होतं. या अटी वाचून मी प्रचंड प्रभावित आणि उत्साहित झालो होतो. कधी एकदा बरगड्डीत सामील होतो असं झालं होतं मला. पण त्या समोरच्याला काही विशेष घाई नसावी. त्याला काही विशेष वाटलं नाही माझी अवस्था बघून.
त्याने थंडपणे (चुकून षंढपणेच लिहिणार होतो. प्रभाव प्रभाव म्हणतात तो हाच असावा.) विचारलं "मान्य आहेत सगळ्या अटी? सगळ्या नियमांची पूर्तता होते आहे?"
मी घाईघाईने पुन्हा एकदा सगळे नियम वाचले आणि अत्यानंदाने हो SSS अशी आरोळी ठोकली.
"बरं मग कुठल्या वृत्तपत्राशी तुम्ही संबंधित आहात?"
"अम्म्म्म्म.. कुठल्याच नाही" मी पडेल स्वरात म्हणालो.
"बरं मग एखादं पुस्तक बिस्तक? इ-बुक ही चालेल." नाही हो तेही नाही. मी जवळपास रडवेला व्हायला आलो होतो.
"हूं !!!" तो अपार तुच्छतेने माझ्याकडे बघून म्हणाला "असं चालणार नाही. २ आणि ७ या तर सगळ्यांत महत्वाच्या अटी आहेत. त्या पाळल्या गेल्याच पाहिजेत. च्यायला, काही तयारी करत नाहीत आणि येतात उठून बरगड्डीत जायचं म्हणून. नेहमीचं आहे हे तुम्हा लोकांचं."
"प्लीज काहीतरी करा ना. काहीतरी करता येईलच. काहीतरी मार्ग असेलच."
"हम्म. मार्ग आहेच. तुम्ही काही पहिले नाही आहात अशा अटी पूर्ण न करणारे. पण तुमच्यासारख्यांसाठीच आम्ही एक तरतूद केली आहे."
"कोणती तरतूद? सांगा ना.." मी प्रचंड आनंदी होत विचारलं.
"सांगतो. नीट ऐका."
"बोला, बोला. ऐकतोय"
"तुम्हाला लिहिता येतं का, तुमचं मत मांडता येतं का, वेळप्रसंगी पेपरात लिहायची वेळ आली, एखाद्या वादग्रस्त विषयावर छोटसंच का होईना पण एखादं इ-बुक काढायची वेळ आली तर ते जमेल का याची परीक्षा म्हणून तुम्ही एक काम करायचं. तुम्हाला आमच्या या बरगड्डी संघटनेत का यावसं वाटलं, तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केलेत, तुम्हाला काय अनुभव आले, तुम्ही इथे कसे आलात, इथे काय झालं हे सगळं एका छोट्या वृत्तांकनाच्या/बातमीच्या स्वरूपात लिहून आणायचं. सगळं लिहा, तुम्हाला काय वाटेल ते लिहा. अगदी आपलं हे बोलणं, नियम, अटी, तुमचे अनुभव वगैरे यावर लिहिलंत तरी चालेल. पण काहीतरी लिहावं लागेल. तुम्ही तुमचा लेख आम्हाला द्यायचा. आमची कमिटी तो लेख वाचेल आणि त्यावरून तुम्हाला बरगड्डीत प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवलं जाईल."
मी प्रचंड खुश झालो. हे काम नक्की होईल असं वाटत होतं. असा एखादा लेख मी कधी लिहिला नव्हता पण लिहिणं काही अवघडही नव्हतं. शाळेतल्या निबंधासारखं तर लिहायचं होतं. त्यात काय मोठंसं???
-------
मला जाम टेन्शन आलंय. त्याने सांगितल्याप्रमाणेच मी बरगड्डीत का आलो, संघटनेचा सभासद व्हावसं मला का वाटलं, अटी, नियम काय होते, ते मी कसे पूर्ण केले वगैरे वगैरे काहीतरी लिहून टाकून तो लेख मी त्यांना देऊन आलोय. कुठला काय? अहो हाच वर दिलेला... थोडा बाळबोध वाटतोय पण जाउदे... आवडला का तुम्हाला? आवडेल का त्यांनाही? मिळेल का मलाही बरगड्डीचं सभासदत्व? टेन्शन.... नुसतं टेन्शन सालं !!! पण काम होईल बहुतेक... असं वाटतंय तरी खरं....
"रामादाश्या तो झाकी है, ज्ञान्या अभी बाकी है"
"हेल बरगड्डी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!"
*** मला हे माहित आहे आणि कळतंही आहे की बरगड्डीचे कितीही दावे असले तरी सगळेच मराठा लोक काही बरगड्डीच्या बाजूचे नाहीत, उलट बरगड्डीचे लोक हे जे काही करताहेत त्यांचा त्यांना रागच आहे. तसंच बरगड्डीचे लोक जातीपातीच्या नावावर आपल्याच समाजात फुट पाडताहेत याचीही सर्व सुज्ञांना जाणीव आहेच हेही मला ठाऊक आहे. परंतु हीच जाणीव वेड पांघरून पेडगावला जाणार्या बरगड्डीवाल्यांनाही व्हावी म्हणून हा खटाटोप (तो व्यर्थच जाणार याची खात्री असली तरीही) !!!!!!...... अजून एक गोष्ट म्हणजे इतक्या वेळा जातीपातीचा उल्लेख पोस्टमध्ये आल्याबद्दल माझी मलाच प्रचंड लाज वाटते आहे. पण हल्ली हे असले 'आधुनिक जातीभेदा'चे आणि उगाचंच एकाच समाजाला त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल आजही पद्धतशीरपणे दोषी ठरवून उफराटे न्याय लावण्याचे हे प्रकार फार म्हणजे फारच वाढले आहेत. वृत्तपत्रांपासून ते थेट ब्लॉगपर्यंतचं प्रत्येक माध्यम या किडीने व्यापलं आहे हे बघून कसंसंच होतं. "जाउदे, मुर्ख आहेत च्यायला.. कशाला लक्ष द्यायचं यांच्याकडे" असं म्हणून या विचित्र प्रकारांकडे दुर्लक्ष करून गप्प बसलो तर म्हातारीही मरते आणि काळही सोकावतो. त्यामुळे त्या काळाला (उर्फ कलीला) वेळीच रोखण्यासाठी हा आपला छोटासा खारीचा वाटा. तरीही नकळतच का होईना चुकूनही कोणाच्या (अर्थातच बरगड्डीचे गडी सोडून) भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सखेद अंतःकरणाने क्षमा मागतो.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक....
ReplyDeleteमला माहित होतं तुझी यावर पोस्ट येणारच...हा खरा सत्यवान फ़्लेवर आहे....शॉलीड रे!!
हेरंब...हे फ़क्त द्वेषाच राजकारण चालु आहे...दोन समाजात तेढ निर्माण करुन आपली पोळी भाजुन घ्यायची एवढ एकच काम जोरात चालु आहे.
माणुसकी,जिव्हाळा,प्रेम हाच खरा ्धर्म आहे...यांना नाही कळणार दे सोडुन.
Layee beshh livlay rao tumi.. agadi paytaanane hanlay ki Mardaa. ...Bindaas thokaa rao.. Ami haayech barobar :)
ReplyDeleteहेरंबा सलाम!!! बाकि काहीच लिहीत नाही... बाबालाही आज हेच लिहीलेय रे.... मानलं तूम्हा दोघांनाही आज!!
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteसही! एकदम हेरंब टच.
इंग्रजांनी दोन धर्मांमध्ये फुट पाडून राजकारण केलं, आता हा दोन जाती/समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न चालु आहे.
Divide and rule.
खर सांगू हेरंब काय कॉमेंट देवू कळत नाहीये
ReplyDeleteतू उत्तम लिहिलेस त्या बद्दल वाद नाही एकदम वटवट स्टाईल ... आवडल ...पण आज ब्राम्हण लोकांबद्दल आहे...उद्या दलित मराठ्याबद्दल बोलतील...अन मग एक एक करून शेवटी सगळा इतिहास हा मुस्लीम धार्जिणा होईल... :(
अतिश्य उत्तम पोस्ट झाली आहे!! खरं आहे, ब्राम्हणांच्या नावाने ठाहो फोडून कुणाचा विकास होणार आहे? आणि भडकवतात कुणाला? तर अल्पशिक्षित, बेकार तरुणांना. जणू काय त्यांच्या ह्या परिस्थितीला ब्राम्हणच जवाबदार आहेत.
ReplyDeleteपण, अफझलखानाच्या दर्ग्या विरुद्ध कुणीही ब्र काढत नाही. ज्या खानाने तुळजापूर, पंढरपूरची देवळं फोडली त्याची प्रतापगडाच्या पायथ्याशी पूजा केली जाते, त्याच्या नावाचा उरुस भरवला जातो, त्याचा विरुद्ध कृति करायला हे मर्द नेते आणि त्यांचे मावळे अजिबात धजावत नाहीत. ह्यांचं लक्ष कोण, तर दादोजीं सारखे स्वामी-निष्ठ, समर्थां सारखे संत, आणि बाबासाहेबां सारखे अभ्यासू!!
प्रचंड भारी!
ReplyDelete३-५ फार्फार आवडलं! :)
मी सध्या ब्राह्मण ह्या शब्दाला समानार्थी शब्दांची यादी बनवतोय... मला वाटतं, शब्दकोशच तयार होईल एखादा!:P
wa..ekdam masta lihile aahe tumhi!
ReplyDeletePan tumcha lekh ha bahujanan wirudhha bamani kawa
aani ek mothe shadyantra aahe..he tya Mulniwasi lokanna lawkarach samjel.. :)
tenva japun
btw, tithe bamananna prawesh nishiddha aahe! so
its really tough getting there! :(
<<"जाउदे, मुर्ख आहेत च्यायला.. कशाला लक्ष द्यायचं यांच्याकडे" असं म्हणून या विचित्र प्रकारांकडे दुर्लक्ष करून गप्प बसलो तर म्हातारीही मरते आणि काळही सोकावतो. त्यामुळे त्या काळाला (उर्फ कलीला) वेळीच रोखण्यासाठी हा आपला छोटासा खारीचा वाटा <<
ReplyDeleteही तुमची भावना मला समजते. पण यातून काही रोखले जाते का? की त्यात भर पडते? - असा प्रश्न मला नेहमीच पडतो. शिवाय ज्यांना हे समजते त्यांच्यापर्यंतच आपल्यासारख्यांची मजल, ज्यांना समजत नाही त्यांना समजवण्याचे आव्हान अधिकच बिकट! अर्थात आपला blog आपली मते मांडण्यासाठी असतो आणि त्याचा चांगला उपयोग तुम्ही करत आहात याबद्दल तुमचे कौतुकही केले पाहिजे.
तू पेटलायंस!! काय खरं नाय त्यांचं.
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteगेले काही दिवस काही नवोदित "सत्य" शोधक मंडळींचे ब्लॉग वाचून खूप करमणूक होत होती. आता अजून रंगत येणार असे दिसते :) मस्त शालजोडीतले मारले आहेत. आणि शीर्षक तर एकदम चपखल!
चालू द्या!
हेरंब, अतिशय मार्मिक लेखन. तुझ्या लेखातलं काही क्वोट करण्यात अर्थ नाही कारण सगळाच लेख अप्रतीम झाला आहे. मी आताच एक असलंच पण विडंबनात्मक लेखन टाकलं आहे.
ReplyDeletehttp://mandarvichar.blogspot.com/2010/09/blog-post_24.html
मधुकर रामटेके यांच्या या बिनडोक जातीयवादी व विखारी लेखनावर हे माझे विडंबनात्मक उत्तर.
http://mdramteke.blogspot.com/2010/09/blog-post_14.html
हेरंबजी की हेरंब्या हीच का ती सुधारीत भाषा??? ;)
ReplyDeleteपार पार धोबी पछाड...ह्याला म्हणतात सत्यवानाची वटवट, धन्य झालो परत तुला त्याच जोश मध्ये बघून..
लगे रहो....ई-बुक कधी काढतोयस ;) हा हा हा
हेरंब हे लिखान त्वरीत मायबोलीवर टाक. ह्यात मजा आहे, कुणाचा अपमान नाही.
ReplyDeleteहेरंबा .....
ReplyDeleteचाबूक पोस्ट झालीये.
या अति शिकलेल्या अडाणी लोकांनी फक्त लोकांना भडकावून आपल्या पोळ्या भाजायला सुरवात केली आहे.
आणि दुर्दैव हे कि काही लोक याला बळी पडतायेत.
हीच ती लोकशाहीची काळी बाजू, तोंड आहे आणि अक्कल/ मेंदू नाही म्हणून उठसुठ कोणीही उठतो आणि नवीन इतिहास सांगतो.
------
बाकी "मी पंखा झालोय यार तिचा.." हि सुरवात वाचून मला वाटल तू **देवा वर काही लिहिलास कि काय.
आभार योगेश.. अरे गेले काही दिवस सतत हेच चालू आहे. तेच तेच वाचून वैताग आला होता नुसता.. तेव्हा म्हटलं यांना आपल्या लेखणीचं पाणी पाजूया ;)
ReplyDelete>> हेरंब...हे फ़क्त द्वेषाच राजकारण चालु आहे...दोन समाजात तेढ निर्माण करुन आपली पोळी भाजुन घ्यायची एवढ एकच काम जोरात चालु आहे.
हे तुला, मला आणि किंबहुना जे हे मुद्दाम करताहेत त्यांनाही कळतं रे. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण आणि कसं उठवणार? आपण आपले पोस्टी टाकत बसणार आणि हे लोक देश पेटवत राहणार !!! :(
एफएक्यू, अनेक आभार.. अहो खरं तर पायाताणाने हाणलं तर आपलंच पायताण खराब होईल असली यांची लायकी.. असो.. अति व्हायला लागलं की ठोकणारच.. सोडतो की काय :)
ReplyDeleteआणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !
तन्वे, आभार ग.. बाकी काहीच लिहिलं नाहीस तरी न लिहिलेलं पोचलं.. त्याबद्दल पुन्हा आभार. बाबाचा आणि माझा योगायोग भारी जुळून आला :)
ReplyDeleteसोनाली, धन्स धन्स.. असल्या लोकांना असेच टच द्यावे लागतात अधून मधून.. अग हा फुट पाडण्याचा प्रयत्न आहे हे त्यांच्या नेत्यांनाही माहित आहे आणि मुद्दामच पद्धतशीरपणे तसे प्रयत्न चालू आहेत. पण त्यांच्यातल्या ब्लॉग लिहिणाऱ्या, पेपरात बातम्या लिहिणाऱ्या लोकांना या उघड्या डोळ्यांनी चाललेल्या गोष्टी कशा दिसत नाहीत याचं आश्चर्य वाटत राहतं..
ReplyDeleteबाकी आहेस कुठे तू? कशी आहेस? आर्यनच्या विश्वाचं 'परिवलन' , 'परिभ्रमण' होत नाही हल्ली :( .. असं करू नकोस.. कळू डे आम्हालाही त्या विश्वाची खबर !
सागर, अनेक आभार..
ReplyDeleteअरे मलाही कळतंय रे.. म्हणून मुद्दाम आवर्जून सांगतो. मी हा लेख लिहिला ते ब्राह्मण, मराठा किंवा अन्य कोणी म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून आणि कोणत्याही एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायला काही मी बरगड्डी मावळा नाही. मी हल्ला केला आहे तो त्या कुजक्या, सडक्या प्रवृत्तीवर..
>> अन मग एक एक करून शेवटी सगळा इतिहास हा मुस्लीम धार्जिणा होईल... :(
शक्यतो हे असं होऊ न देणं यासाठी प्रयत्न करत रहाणं याशिवाय दुसरं आहे तरी काय आपल्या हातात !!
विनय, खूप खूप आभार. अहो ब्राह्मण काय नी इतर कोणी काय. कुठल्याही जातीच्या लोकांना एकगठ्ठा नावं ठेवून काय होणार आहे. लढायचं तर त्या प्रवृत्तीशी. पण दुर्दैवाने हे समजण्याइतकी 'त्यांची' कुवत नाही आणि ज्यांची कुवत आहे ते सत्तेत, स्वार्थात मश्गुल !!
ReplyDeleteअहो आणि हे देवळं, मुर्त्या फोडणारे, गणेशाच्या मूर्तीची विटंबना करणारे मुसलमान तर त्यांना अतिप्रिय.. अर्थात मी ही अजाणतेपणे जनरलाइज्ड स्टेटमेंट करतोय. पण माझा आक्षेप पुन्हा त्या प्रवृत्तीवरच आहे.
दुर्दैव बिचाऱ्या त्या दादोजी, समर्थ आणि बाबासाहेबांसारख्या योग्यांचं दुसरं काय !!
बाबा, प्रचंड आभार :) .. बघ बोललो होतो ना तुला काल :) ग्रेट माईन्डस..... ;) ..
ReplyDeleteहा हा शब्दकोश.. आयडिया भारी आहे.. बरगड्डी जॉईन करता आली तर बघ. त्यांच्याकडे असे अनेक शब्दकोश तयार असतील ;)
अनेक आभार प्रसाद.. हा हा हा.. बामणी कावा, षडयंत्र !!! सगळं ओळखीचं वाटतंय ;) हेहे
ReplyDelete.. खरंच जपू राहायला लागणार आता :P
हो मागे मी खऱ्याखुऱ्या बरगड्डीच्या लोकांना या संदर्भात विचारलं होतं तेव्हा त्यांनीही
हेच "बामणांना प्रवेश नाही" असं ठासून सांगितलं होतं ;) .. गंमत वाटली होती फार :)
सविताताई, मलाही तुमचं म्हणणं पटतंय. पण असले हजारो लेख, भाषणं, ब्लॉग्स आले की आपण १-२ पोस्ट मध्ये उत्तरं देतो. अर्थात आपण लिहिलं काय आणि न लिहिलं काय या गोष्टी रोखल्या जातील किंवा थांबतील/कमी होतील याची सुतरामही शक्यता नाहीच. पण "शक्य असूनही आपण प्रयत्नच केला नाही" असं वाटायला नको म्हणून काहीतरी खरडलं. म्हणून तर खारीचा वाटा म्हणतोय मी.
ReplyDeleteआणि अजून एक.. या वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्या त्यांच्या नेत्यांपेक्षा ज्यांना समजत नाही त्या सध्या लोकांना समजावणं सोपं आहे असं मला वाटतं. कारण ते बिचारे खरोखरीचेच अज्ञानी आहेत त्यांच्या नेत्यांसारखे सगळं माहित असूनही फाटाफुटी करणारे तरी नाहीत.
प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.
कांचन, गेले कित्येक दिवस मुर्खासारखी बडबड चालू आहे ग त्या ब्लॉग्सवर.. शेवटी राहवलं नाही आणि घातला दणका.. अजून एक गंमत म्हणजे त्या सगळ्या ब्लॉग्सवाल्यांच्या पोस्ट्सवर कमेंट टाकून या पोस्टची लिंक मी त्यांना दिली आहे. डोळे उघडले तर नशीबच (जे घडणं या जन्मात तरी शक्य नाही.)
ReplyDeleteनिरंजन, या नवोदित "सत्य"शोधक आणि 'गप्पाटप्पा' वाल्या मंडळींसाठीच होता हा आजचा खास प्रसाद !!! अशांना शालजोडीतले कळतील की नाही काय माहित. शाल टाकून देऊन नुसतेच जोडे हाणायची पाळी नाही आली म्हणजे मिळवलं. पुन्हा एकदा आभार..
ReplyDeleteमंदार,
ReplyDeleteप्रचंड भन्नाट लिहिलं आहेस.. खरंच एखाद्याला अल-कायदा म्हणजे साधुसंतांची स्वारी स्वारी मुल्लामौलवींची संघटना वाटेल रे अशाने ;)
मस्तच !!
>> हेरंबजी की हेरंब्या हीच का ती सुधारीत भाषा??? ;)
ReplyDeleteहा हा हा.. जबरी रे सुहास.. सहीच :) .. जमली जमली तुला ती भाषा :P
>> धन्य झालो परत तुला त्याच जोश मध्ये बघून..
खूप बरं वाटलं तुझी ही प्रतिक्रिया बघून. जोश पुन्हा एकदा तात्पुरता न ठरला म्हणजे नशीब ;)
इ-बुक... हा हा हा.. त्यांनी माझं सभासदत्व मान्य केलं की काढतोच लगेच इ-बुक.. त्यात पहिला लेख हाच असणार :P
केदार, खूप आभार. रागवू नकोस पण माय(ज)बोलीवरचा पूर्वानुभव फारसा चांगला नसल्याने (किंबहुना प्रचंड वाईट असल्याने) मी तिकडे जाणं हल्ली टाळतोच.. आणि तिकडे पुन्हा admin ला हा लेख झेपला नाही की ते काढून टाकणार.. त्यापेक्षा गड्या आपला ब्लॉग बरा. आपण आपल्या ब्लॉगचे, मर्जीचे मालक.
ReplyDeleteसॉरी.. विषयांतराबद्दल क्षमस्व.. तुझी कळकळ कळली पण मला ते शक्य होणार नाही त्याबद्दल क्षमस्व..
धन्यु धन्यु सचिन... तेच रे.. हे प्रकार मुद्दाम करणाऱ्या वरच्या फळीतल्या लोकांना हे सगळं चांगलं माहित आहे. पण फक्त स्वार्थापायी ते सामन्यांची माथी भडकवत आहेत.. काय करणार इलाज नाही.. आपल्या हातात काहीच नाही ! :(
ReplyDelete>> तोंड आहे आणि अक्कल/ मेंदू नाही म्हणून उठसुठ कोणीही उठतो आणि नवीन इतिहास सांगतो.
यांना कळत नाहीये की आत्ता इतिहास बदलायला जातायत. पण असेच चुकीच्या इतिहासात रममाण झाल्याने बघता बघता भूगोल बदलला जायला वेळ लागणार नाही. :(
आणि हो **देवावर लिहिण्याएवढी माझी कुठली योग्यता ? तेथे पाहिजे जातीचे ;) ('जातीचे' म्हणजे या बरगड्डी अर्थाने 'जातीचे' नाही रे ;))
हेरम्ब, फारच भारी पोस्ट!!! (आणि तुझ्या लिहिण्याच्या उत्साहाला तर थेट सलाम! मधे अधे काय नाय!!)
ReplyDeleteही माणसं घाऊक विद्वेषाचं तत्वज्ञान पसरवणारी आहेत, आणि ते पण अशा माणसाच्या नावावर ज्याने आपल्या राज्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांना अभिजात औदार्याने वागवलं. अशा लोकांना सतत एक शत्रू लागतो, कारण त्याशिवाय त्यांचा विखार पेटता राहत नाही. सन्दर्भ सोडून वाक्यं काढायची, नको ते अर्थ लावायचे हा तर संशोधनातला अक्षम्य अपराध मानला जातो. पण यांची अभ्यास करण्याची तयारी नाही. यांचे तथाकथित संशोधक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, यांच्या नेत्यांना सत्तेची आस लागलेली. अशा स्थितीत यांच्याकडून काय अपेक्षा करणार?
"याउलट शिवाजीराजांनी अनेक ब्राह्मण कापले आणि म्हणाले, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? यावरून सिद्ध होते की शिवाजीराजे शिवधर्माचे आहेत" हे वाक्य यांच्याच एका इ-बुकातलं आहे. म्हणजे शिवधर्माची नक्की उद्दिष्टं कोणती?
आणि गम्मत म्हणजे आज जे लोक महाराजांच्या नावावर असं अद्वातद्वा लिहित आहेत, त्यातल्या अनेक लोकांचे पूर्वज महाराजांच्या विरोधात लढ़लेले आहेत!! मग इतिहास काढायचा यांना तरी काय अधिकार?
खरं तर जसा जसा समाज प्रगत होत जातो, तशी तशी देव, जाती-धर्मावरून निर्माण होणा-या प्रश्नांची तीव्रता कमी होत जाते. आपल्याइथे सगळी उलटी गंगा आहे!!
थोडी उशिरा प्रतिक्रिया देतोय.
ReplyDelete" ही सगळी पोस्ट म्हणजे एका मोठ्या conspiracy चा भाग आहे. हा एका बामनाने मावळ्यांच्या अस्मितेवर केलेला हल्ला आहे. हा एक बामणी कावा आहे...आम्ही याला चोख प्रत्युतर देऊ. आमच्या मनगटात जान आहे. हेरम्ब्या,हा सत्यशोधक तुला सोडणार नाय."
मी आधी यांना अनुल्लेखाने मारायचे ठरवले होते. त्याच्या ब्लोगवर मी तुझ्या , शिरीषच्या प्रतिक्रिया बघितल्या, पण मी प्रतिक्रिया द्यायचे टाळत होतो. शेवटी राहावले नाही म्हणून एक प्रतिक्रिया टाकली. पण हा मूर्ख अशाने समजणार नाही. मला आता असे वाटते कि ह्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे याला सारे रान मोकळे करून देणे आहे. बाबाने आणि तू सुरवात केलेली आहेसच, सर्व ब्लोग्गर्स नी जर याविरुद्ध लेख लिहून हल्ला चढवला तर?? याच्या डोक्यात थोडासा तरी प्रकाश पडेल का ?
हेरंब, या दोन्हीपैकी कुठल्याच जातीतली नसल्यामुळे बहुतेक एक त्रयस्थ म्हणून हे सर्व वाचते आणि वाईट वाटतं....म्हणजे हे सगळं चुकीच्या दिशेने जातंय, याने कुणाचंच काही साधणार नाही हे कळतंय...त्यांना कधी कळणार काय माहित...
ReplyDeleteबाकी इतिहास उर्फ़ its history असं म्हणून वर्तमानाच्या दिशेने पावलं उचलायला हवीत. ते सर्वांच्याच हिताचं होईल..नाहीतर सागरने म्हटल्याप्रमाणे सगळंच दुसरा धर्मधार्जिणं होईल...मुळात आपण एका धर्माचे आहोत म्हणजे काय?? असा प्रश्न पडावा आजकाल इतके सर्वच पेटलेत....
हेरंबा,खरच कंटाळा आला आहे रे सगळीकडे हे बघुन..मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी उगाच समाजात दुही निर्माण होत आहे.बाकी पोस्ट तर एकदम धरुन फ़ट्याक...हा लेख वाचुन तुला ते डायरेक्ट अध्यक्ष म्ह्णुनच घेतील बघ आता... :)
ReplyDeleteपरवाच वाचलेलं, प्रतिसाद राहिला होता.
ReplyDeleteवर काही जणांनी लिहीलंय, तुलाही माहितीच आहे.. 'सगळीकडे चांगली आणि वाईट लोकं असतात..'
परवाच अजून एका ठिकाणी वाचलं, जे पटलंही, की :
वाईट लोक सक्रीय झाल्यामुळे होतो, त्यापेक्षा जास्त त्रास चांगली लोकं निष्क्रीय झाल्याने होतो.
पोस्ट बाकी चा, मारी आणि धरून फट्याकच.
ह्यातून त्या धुम-२ ला काही सम्यक विचार मिळाले म्हणजे मिळवली.
त्याला सम्यक शब्द १ लाख वेळा लिहायला लावायला हवा. अर्थासकट.
Heramb, eka aathavdyacha 'Net-upvaas' tuzi post vachun sodala.:) faar bare vatale tu lihilele vachun. British gele te keval dehane, duphalichi vishavalli itki jabar perlit ki aaj sarvatra tiche raan majaley. Drudaiv. ( ya khichadibaddl sorry re )
ReplyDeletePost perfect. :)
छान लिहिलंयस हेरंबा,टू द पॊइंट आणि अत्यंत मार्मिक.वर्णनात्मक सांगून कुणाच्या लक्षात येत नसेल तर विडंबनात्मक/निखळ विनोदात्मक का लिहू नये. छान..
ReplyDeleteमंदार चा बाफ़ उडवला....पण हा लेख माबो वर पोस्टायला हरकत नसावी.
शुभेच्छा.
अश्विन खूप आभार :) अरे लिहिण्याचा उत्साह आपला असाच.. मधूनच भाराभार लिहितो नाहीतर एकदम थंड.. असो
ReplyDeleteअरे यातल्या ९०% लोकांना आपण ब्राह्मणद्वेष का करतोय याची कल्पना नाही. उगाच कोणीतरी यांचा एखादा नेता (!!) सांगतो म्हणून हे लोक थेट गरळ ओकायला लागतात.. सांगकामे असल्यासारखे.. आणि त्या वर बसलेल्यांना तर आपली राज्यं चालवण्यासाठी हे सततचे वाद चालू राहणं आवश्यकच.. चक्र चालूच !!
>> आणि गम्मत म्हणजे आज जे लोक महाराजांच्या नावावर असं अद्वातद्वा लिहित आहेत, त्यातल्या अनेक लोकांचे पूर्वज महाराजांच्या विरोधात लढ़लेले आहेत!! मग इतिहास काढायचा यांना तरी काय अधिकार?
हे तर अगदी अगदी खरं आहे ! या एका मुद्द्यावरच त्यांचे सगळे विरोध गळून पडू शकतात..
आणि तसं आपल्या इथेहि जाती-धर्मावरून झगडे सर्व सामान्य लोकांना नकोच आहेत पण यांच्यासारखे तथाकथित स्वघोषित नेते जबरदस्तीने लोकांना दावणीला बांधून त्यांची दिशाभूल करून समाजात द्वेष पसरवतात हे आपलं दुर्दैव !!
बा 'सत्यसंकेता'.. घाबरलो रे तुला.. :P
ReplyDeleteअरे अनुल्लेखाने मारायची या लोकांची लायकीच नाही रे.. साले अजून डोक्यावर चढून बसतात.. त्यांच्या या दुषित विचारांना आणि सडक्या मतांना वेळच्यावेळीच ठेचलं पाहिजे. अरे मी तर 'त्यांच्या' सगळ्या सडक्या कुसक्या नासक्या ब्लॉग्ज वर जाऊन प्रतिक्रियेत माझ्या या पोस्टची लिंक देऊन आलोय. समजून जा, विचार करा आणि दोन्ही झेपत नसेल तर या मैदानात लढायला.. !!
>> सर्व ब्लोग्गर्स नी जर याविरुद्ध लेख लिहून हल्ला चढवला तर?? याच्या डोक्यात थोडासा तरी प्रकाश पडेल का ?
त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का याचं उत्तर जवळपास ठरलेलं आहे पण त्यामुळे आपण हल्ला करायचा नाही असं मुळीच नाही.. कल्पना छान आहे. तूही एकदा देवाजींच्या खास भाषेत डोस देऊन बघ कसा.. ;)
अपर्णा, अग मी स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही हा लेख या दोन जातींसाठी असा नव्हताच. सगळ्यांसाठीच होता.. खरं तर हे सगळंच चुकीच्या दिशेने जातंय हे त्या महामुर्ख लोकांना सोडून सगळ्यांनाच दिसतंय आणि कळतंयही.. हेच त्यांना आणि त्यांना कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचवणार्या त्यांच्या नेत्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं देशाचं सौभाग्य.. त्यांच्यातल्या एखाद्या नेत्याने हा लेख वाचला पाहिजे !!
ReplyDeleteखरं रे देव.. खुपच कंटाळा आला आहे. पण या गोष्टी थांबण्या ऐवजी उलट दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत !!
ReplyDeleteबाप रे थेट अध्यक्ष?? माझ्या जवाबदार्या वाढल्या रे म्हणजे आता ;)
धन्स धन्स ऋयामा.. हो रे सगळीकडे चांगली आणि वाईट लोकं असतातच. म्हणून तर मी सरसकट एखाद्या जातीला दोष देत नाहीये.. काही लोकांमुळे सगळ्या जातीला दूषणं देण्याइतके हलक्या त्यांच्यासारखे हलक्या मनाचे आपण नाही..
ReplyDeleteधूम-२ हा हा हा !! अरे तो एकटाच नाहीये.. तो सत्यशोधक, बरगड्डीचा स्वतःचा ब्लॉग आणि त्यांच्या त्या 'गोड आंबे' खाणाऱ्या अजून एकाचा ब्लॉग.. असो नावं देऊ तेवढी थोडी आहेत.. त्या सगळ्यांना होता हा दणका..
>> त्याला सम्यक शब्द १ लाख वेळा लिहायला लावायला हवा. अर्थासकट.
लय भारी शिक्षा आहे रे :D आवड्या !!
श्रीताई, तुला नेटोपास सोडताना ही असली पोस्ट वाचायला लागली त्याबद्दल सॉरी.. पण या दिवसागणिक फोफावणार्या विषवल्लीला काहीतरी उत्तर देणं भागच होतं. ब्रिटिशांची ही पिलावळ आता जातीजातीत द्वेष पसरवायला सिद्ध झाली आहे. खरंच कठीण आहे सारं !!
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल खूप आभार !!
डॉ कैलास, खूप आभार.. वर्णनात्मक काय किंवा विडंबनात्मक काय या लोकांना काहीही कळेल अशी अपेक्षा करणंही मुर्खपणाचं पण तरीही प्रयत्न करत राहिलंच पाहिजे.
ReplyDeleteआणि माबोबद्दलकेदार जोशी यांना आधीच उत्तर दिलंय. सॉरी माझा नाईलाज आहे.
आणि हो. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
छान लिहिलं आहेस एकदम. शालजोडीतून मारले आहेस. :-) चला, हा शेवटचा लेख आणि ही माझी शेवटची प्रतिक्रिया (आता नवीन प्रतिक्रिया नवीन लेखावर) हा वीकेंड तुझा सगळा लेखनप्रपंच वाचण्यातच गेला. तसंही ठरवलेलं होतं सगळे लेख वाचण्याचं. चला, केलेला संकल्प पूर्ण झाला. आता मला गंगास्नानाचं पुण्य लाभेल. ;-) ;-)
ReplyDeletethoda far musliman var zalelya atyachara baddal hi liha thoda kuthe bramhanan virudha kuni bolla tar evadha lagala tithe gujarat madhe muslimann chi kattal zali kaay watala asel tyanna?
ReplyDeleteBramhannani kahich chuk kela nahi asa ajeebatach nahiye te ajunahi jati bhed karatatach disatach te uthun kadhi marathi manus apalyatach bhandat rahanar ahe kay mahit baher bagha he tamil telagu kase ekjutine rahatata
ती सत्यशोधक(?)ची पोस्ट वाचली होती. कैच्याकै. अजुन एक येडxx आणि गावात नवा...
ReplyDeleteसंकेत,
ReplyDeleteअरे त्यांचे ते ब्लॉग्स आणि मुर्खासारखी शोधलेली सत्य वाचून वैताग आला होता नुसता !! असो..
अरे पूर्ण विकांत तुझ्याच प्रतिक्रिया वाचतो आहे. जवळपास प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया !!!! महान आहेस तू :) खरंच असा वाचक भेटला ना की खूप खूप बरं वाटतं ब्लॉगरला !! पुन्हा एकदा आभार.
गंगास्नान !! लोल :)
प्रिय अनामिक,
ReplyDeleteमी संभाजी ब्रिगेडसारख्या महापुरुषांच्या नावाने संघटना उघडून त्यांचा अपमान करणार्या एका यत्किंचित संघटनेबद्दल, त्यांच्या उद्देशांबद्दल, त्यांच्या कार्या (!!!!!!!) बद्दल तीव्र नापसंती दर्शवली याचा अर्थ मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचं मी समर्थन करतो हा बादरायण संबंध तुम्ही लावत असलात तर तुम्हीही नक्कीच त्या बिनडोक संघटनेचे (अ)कार्यकर्ते असणार यात काहीच संशय नाही.
मी माझ्या ब्लॉगवर काय लिहावं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःचा नवीन ब्लॉग उघडा आणि तुम्हाला मुस्लीम किंवा इतरांवर जे काही लिहायचं ते लिहा. पण तुम्ही मुस्लिमांवर लिहिल्यावर "तुम्ही हे लिहिताय पण अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर किती अन्याय होतो हे तुम्हाला माहित आहे का?" अशा स्वरुपाची प्रतिक्रिया आली तर त्याला काय उत्तरं द्यायचं याचीही तयारी करून ठेवा.
हा हा .. बरोबर बरोबर.. त्या भेदक पोस्टबद्दल आणि 'गप्पाटप्पा' मारण्याच्या नावाखाली जातीय विखार पसरवणार्या एका ब्लॉगला वैतागून ही पोस्ट टाकली.
ReplyDelete>> अजुन एक येडxx आणि गावात नवा.
अगदी अगदी !!:)
खुप सही लिहील आहेस, आवडल, त्यांच्या मनात इतका द्वेष भरला आहे की सांगायला नको, कारण त्यांच्याकडे लोक गोळा करण्यासाठी कोणताच मुद्दा नाहीये, महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर त्यांचीच सत्ता आहे, पण त्यांच्या नेत्यांनी स्वत:च्या तुमड्या भरुन आपल्या समाजाला द्वेषामध्येच अडकवुन ठेवले
ReplyDeleteअनेक आभार गौरव. खरंच रे अति अति द्वेष भरलेला आहे. आणि तोही विनाकारण कोणीतरी चांगल्या पुस्तकांचे, त्यातल्या वाक्यांचे काहीतरी विचित्र अर्थ यांच्या डोस्क्यात भारावून देतं म्हणून !!
ReplyDeleteअरे लोकं भांडत राहिली नाहीत तर यांची दुकानं कशी चालणार ? सगळं त्या नेत्यांच्या आशीर्वादानेच घडतंय !! :(
मी तुमचा ब्लोग नियमित वाचते विशेषतः तुमचा धरम बिरम खूप चांगला विभाग आहे असं माझं मत आहे (होतं??). तुमच्या या लेखाने माझं भ्रम निरास केला . तुम्ही जातीभेद मानत नसाल असं मला वाटतं. निदान तुमच्या आधीच्या लेखांवरून तरी असं जाणवतं. बहुसंख्य मराठा लोक त्या चक्रम संस्थेच्या विरोधात आहेत हे तर तुम्हीच मान्य केलं आहे लेखात ...मग लेखातला राग त्या मुठभर लोकांवर व्यक्त करायचा आहे का फक्त? आमच्याकडे असं म्हणतात कि कुत्री आपल्यावर भुंकू लागली तर आपण काही कुत्र्यावर उलट भुंकत नाही. तुमचा राग खरा आहे, रास्त तर आहेच आहे पण जी गरळ बरगड्डीच्या लोकांनी ब्राम्हण विरोधी ओकली आहे ती समजा दुसऱ्या इतर कुठल्याही समाजाबद्दल असती तर तुम्ही असेच पेटून उठला असता का ? म्हणजे तुम्हीही जातीभेद मानता ? दुसऱ्याच्या जातीबद्दल असते ती फक्त अनुकंपा का ?
ReplyDeleteनमस्कार अनामिक (ताई),
ReplyDeleteसर्वप्रथम ब्लॉग आणि विशेषतः धरम-बिरम विभाग आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल अनेक आभार. हो.. तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला जे माझ्या अन्य पोस्ट्समधून दिसलंय ते पूर्णतः खरं आहे. मी जातीभेद मानत तर नाहीच उलट त्याचा तीव्र निषेधही करतो. मी कधीही ब्राह्मण म्हणजे ग्रेट अशा अर्थाची वक्तव्यं केली नाहीत. माझ्या ओर्कुट प्रोफाईल मध्येही जाती/धर्मावरून असलेल्या कम्युनिटीजना जागा नाही. तुम्हाला अजूनही मी म्हणतो ते पटत नसेल तर माझे हे लेख वाचा
http://www.harkatnay.com/2009/10/blog-post_29.html
http://www.harkatnay.com/2010/05/blog-post_13.html
http://www.harkatnay.com/2010/06/blog-post_21.html
इतकंच नव्हे तर माझ्या इंग्रजी ब्लॉगवरचे हे दोन लेखही वाचा
http://harkatnai.blogspot.com/2009/10/whats-your-jaatee.html
http://harkatnai.blogspot.com/2009/11/whats-your-jaatee-part-ii.html
एवढं सगळं वाचल्यावरही तुम्हाला जर मी जातीयवादी वाटत असेन तर माझा नाईलाज आहे. ते मी माझं दुर्दैव समजतो.
>> बहुसंख्य मराठा लोक त्या चक्रम संस्थेच्या विरोधात आहेत हे तर तुम्हीच मान्य केलं आहे लेखात ...मग लेखातला राग त्या मुठभर लोकांवर व्यक्त करायचा आहे का फक्त?
हो. अर्थातच. मला वाटतं तसं मी स्पष्टपणे लिहिलं आहे. अजून स्पष्ट करून सांगतो. त्या स्वतःला संघटना म्हणवून घेणार्या खत्रूड समूहात काम करणारा प्रत्येक माणूस मग तो कुठल्याही जातीचा/धर्माचा का असेना माझा व्यक्तिगत शत्रू आहे असं मी मानतो.
>> जी गरळ बरगड्डीच्या लोकांनी ब्राम्हण विरोधी ओकली आहे ती समजा दुसऱ्या इतर कुठल्याही समाजाबद्दल असती तर तुम्ही असेच पेटून उठला असता का ?
अगदी १०१%. प्रश्नच नाही. बरगड्डीच्या लोकांनी (मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असोत) कुठल्याही जातीधर्माच्या लोकांविरुद्ध गरळ ओकली असती तरी मी असाच असाच पेटून उठलो असतो आणि त्यांना असंच फोडून काढलं असतं.
>> म्हणजे तुम्हीही जातीभेद मानता ? दुसऱ्याच्या जातीबद्दल असते ती फक्त अनुकंपा का ?
मी जातीभेद मानत नाही हे तर मी पुराव्यांनिशी सिद्ध केलं आहे. पण तुम्ही माझ्याविषयी हा ग्रह का करून घेतला आहात? तुम्ही माझ्याविषयीची तुमची मतं कशाच्या आधारावर बनवलीत हे कळू शकेल?
तुम्ही सुचवलेले मराठी लेख मी आधीच वाचले होते पुन्हा वाचले. इंग्रजीही वाचले. तुम्ही जातीयवादी आहात असा आरोप मी केला नव्हता.माझा कसला ग्रह ही नव्हता पण मला शंका आली ( फक्त या लेखामुळे ). ती पटकन दूर केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे धरम बिरम आणि सचिन वरचे लेख वाचून वाटलं अरे या माणसाशी काय मस्त सूर जुळतोय आपला. सचिनला तुम्ही देवबाप्पा म्हणता पण तो तर कधीच अशा प्रतिक्रिया देत नाही कुणी कित्तीही आरोप केले तरी ! शिकुयात न त्याच्याकडून एव्हढ तरी. पण हा लेख वाचून मन थोडं खट्टू झालं. आम्हा बायकांना असं पेटून धुमसायला नाही येत, आम्हाला फक्त सलतं, खुपतं. जाऊ देत तो एकदम वेगळा विषय आहे, मला नावासहित प्रतिक्रिया कशी द्यायची माहित नाही म्हणून अनामिका ! कारण URL च्या रकान्यात काय भरायचे माहित नाही. जाने दो. अजनबी भी दोस्त बन सकता हैं!
ReplyDelete>> तुमचा धरम बिरम खूप चांगला विभाग आहे असं माझं मत आहे (होतं??). तुमच्या या लेखाने माझं भ्रम निरास केला .
ReplyDelete>> दुसऱ्या इतर कुठल्याही समाजाबद्दल असती तर तुम्ही असेच पेटून उठला असता का ?
>> म्हणजे तुम्हीही जातीभेद मानता ?
या सर्व विधानांवरून मला असं वाटलं की तुम्हाला मी जातीयवादी वगैरे वाटलो. असो. पण तुमची शंका पटकन दूर झाल्याचं वाचून बरं वाटलं. अहो सचिन म्हणजे असामान्य आहे. तो खरोखरीचाच देवबाप्पा आहे. त्याच्यासारखं वागायला आपल्यासारख्या सामान्यांना कसं जमायचं :)
>> आम्हा बायकांना असं पेटून धुमसायला नाही येत, आम्हाला फक्त सलतं, खुपतं.
ह्म्म्म.. हा एक फरक असू शकेल आपल्या विचारांतला.. कारण मी काही काळ दुर्लक्ष करू शकतो पण अति झालं तर मग माझ्या शैलीत पार झोडून टाकतो समोरच्याला. आत्ताही तेच झालं ही पोस्ट लिहिताना. असो.
>> अजनबी भी दोस्त बन सकता हैं!
बन *गये* है :)
Koni tari faltu loka ektra yeun kahi tari bramhanan vishayi bolatat ani sagalya bramhan blogs var tyanchya virudha danga chalu hoto..
ReplyDeleteare kay he
are barach kahi ghadatay hya jadat tya faltu sanghatane vyatirikt
tumachya itar links wachalya tumhi 1 rational manus ahat he tya links wachun watala pan kuthe tari maap zhukatay asa hya post varun watala
ReplyDeletethodahi apalya jaaticha swabhiman ha tumhala jatiy wadich tharavel
भन्नाट....खुप दिवसांनी आले आज ब्लोगवर...तर एकापाठोपाठ एक मस्त वाचायला मिळाले..असाच लिहित रहा रे !!
ReplyDeleteदोन्ही अनामिक (तुम्ही दोघे एकच आहात बहुतेक),
ReplyDeleteमी ही पोस्ट का लिहिली ते मी पोस्टच्या शेवटच्या परिच्छेदात आणि वरच्या अनेक प्रतिक्रियांच्या उत्तरांत स्पष्टपणे लिहिलं आहेच. तसंच माझे जाती-धर्माविषयीचा दृष्टीकोन, माझी मतं हे माझ्या वेगवेगळया पोस्ट्सची उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहेच. तरीही तुम्हाला माझा ब्लॉग म्हणजे 'ब्राह्मणी ब्लॉग' आणि मी स्वतः जातीयवादी वाटत असेन तर तुम्ही तुमचे चष्मे उतरवावेत एवढीच विनंती मी करेन. याउप्पर मी करूही काय शकतो????
धन्यवाद माऊ. हम्म बरीच बिझी होतीस ना तू.. आता मोकळी झाली असशील.. गेल्या काही दिवसांत एकामागोमाग एक सुचत गेलं आणि मी लिहीत गेलो :) .. पुन्हा एकदा आभार ..
ReplyDeleteThis looks me completely bhatgi blog..
ReplyDeleteif you want to see the difference between brahman and baman than see this link...
I think 80% Brahmans are Baman.
http://www.youtube.com/watch?v=uws6pFqfHbE&feature=player_embedded
माननीय नावासकट प्रतिक्रिया देण्याची हिंमत नसलेल्या महाशय/महोदया,
ReplyDelete>> This looks me completely bhatgi blog..
तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. हा ब्लॉग आणि मी स्वतः कसा आहे, काय आहे हे मी तुमच्यासारख्या भेकड, चेहरा लपवणार्या व्यक्तीला समजावून, पटवून द्यावं अशी तुमची अपेक्षा असेल तर ते मला शक्य नाही कारण तुमची तेवढी लायकी नाही.
शेंडाबुडखा नसलेल्या आणि स्वतःला हवे ते(च) निष्कर्ष काढणार्या प्रतिक्रिया दिल्यात तरी हरकत नाही पण त्या स्वतःची ओळख लपवून ठेवून दिल्यात तर पुढच्या वेळी ब्लॉगचा मालक या नात्याने त्या तिथल्या तिथे निर्दयीपणे उडवल्या जातील याचं भान बाळगा !!!!!
Bhatanche vakude bole....ankin kai...
ReplyDeleteम्हंजी वो?
ReplyDeleteमला खरंच एक आश्चर्य वाटतं. विरुद्ध मत देणाऱ्या एकाही व्यक्तीला आपलं नाव देऊन मत देण्याचं धाडस होऊ नये म्हणजे कमाल झाली !!!!!!
सहसा ब्लॉगचा/ची लेखक/लेखिका प्रतिक्रियांना उत्तरं देतो/ते. पण या अनामिकांकडून होणारा प्रतिक्रियांचा मारा पाहून मलाही उत्तर दिल्याशिवाय राहवत नाही.
ReplyDelete@ व्हिडिओची लिंक देणारा प्राणी,
मी पाहिला तुम्ही सांगितलेला व्हिडिओ आवर्जून. ‘भिक्षा मागणारे ते बामण’ असं बाळासाहेब ठाकरेंचं (वास्तविक हे त्यांच्या वडिलांचं म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंचं मत आहे. त्यांच्याकडून ते बाळासाहेबांनी घेतलं.) मत असल्याचं त्या व्हिडिओवरून जाणवलं. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बाळासाहेबांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत हे महाराष्ट्रातील जनतेचं प्रातिनिधिक मत नाही हे त्यांनी सचिन आणि पुलंवर केलेल्या टीकेतून दिसून आलेलं आहे. तेव्हा निव्वळ ते म्हणाले म्हणून एखादी गोष्ट बरोबर असा अर्थ होत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या माहितीच्या आधारे तुम्ही हा निष्कर्ष काढलात की ८०% ब्राह्मण हे ‘बामण’ आहेत? तोंडाला येईल ते बरळण्याआधी आपण जे विधान करणार आहोत ते जरा सत्यासत्यतेच्या कसोटीवर तपासून पाहिलं असतं आपण तर लोकांचा वेळ या अशा निरर्थक पोस्ट्स वाचण्यात आणि त्यांवर मतं व्यक्त करण्यात वाया गेला नसता. Anyway, तुम्हाला हे कळण्याएवढी बुद्धी असती तर अशी विधानं तुम्ही केलीच नसती. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते!’
@ ‘भटांचे वाकुडे बोल’ लिहिणारा प्राणी,
एखाद्याला ‘महार’ किंवा ‘चांभार’ म्हणणं हे आजकाल जातीभेदाचं किंवा Racism चं लक्षण मानलं जातं. मग ब्राह्मणांना ‘बामण’ किंवा ‘भट’ म्हणणं हाही Racism च आहे! शिव्या आम्हीही देऊ शकतो, पण तेवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची इच्छा नाही कोणाची. पण याचा अर्थ असा होत नाही की, ब्राह्मणांच्या विरोधात कोणीही आणि काहीही बोललं तर त्याला प्रतिकार होणार नाही! We don't retaliate because we do not believe in fights and altercations. It does not in any way imply that, we lack courage to retaliate. Do not mistake our composure for our timidity! Mind your language while posting!
धन्यवाद संकेत.. अरे ज्यांना स्वतःची नावं देऊन प्रतिक्रिया देता येत नाही असल्या लोकांकडून अजून अपेक्षा तरी काय ठेवणार. जन्मभर हे लोक द्वेषाचं राजकारणच करत राहणार. यांचे नेते यांना गंडवतात आणि हे लोकं काहीही विचार न करता त्यांच्या विखारी प्रचाराला मुर्खासारखे बळी पडतात.
ReplyDelete"तिच्यायला ए बामण्या--नाही नाही--बामन्या, आमच्यावर ज्योक करतोस ? आरे आमच्यावर आमीच ज्योक करतो नवीन नवीन 'सर्च' करून..... तू काय आमची चेस्टा करनार ? तुमच्या या चेस्टेचा आमच्या निधड्या 'चेस्ट' वर काही परिनाम होनार नाही"
ReplyDelete:D :D :D
'A1 पोस्ट'
क्षितीज :D :D :D
ReplyDeleteया लोकांना कळायचं नाही ते.. सोडून दे..
खूप धन्यवाद..
oi bhatgi americat galat tari sudarle nahi..jaoo daya kai karnar shaput vakada ta vakdach..
ReplyDeleteआम्ही सुधारलो नाही? पण सुधारण्यासाठी बिघडावं लागतं आधी. आणि आम्ही असं काय बोललो आहोत ब्राह्मण नसलेल्यांच्या विरोधात? या लेखातलं (किंवा for that matter, प्रतिक्रियांमधलंसुद्धा) एकतरी वाक्य जातीयवादी आहे का? तसं असेल तर दाखवून द्या ना! आम्हा अज्ञ पामरांना कळू तरी द्या की कोणत्या वाक्यातून कोणत्या जातीचा अपमान झाला आहे ते! उलट बरीच वाक्यं वरपांगी ब्राह्मणविरोधीच वाटतात! आणि एवढीच जर धमक असेल अंगात तर समोर या ना! जो काय वाद व्हायचा आहे तो आमनेसामने होऊ द्या. आडून वार का करता? स्वतःचं नाव सांगून समोरच्याची निंदा करायलाही सिंहाचं काळीज लागतं. तुमच्यासारख्या भेकड, भित्र्या गांडुळाचं ते काम नव्हे! आणि प्रतिक्रिया देताना जरा सभ्यतेचे नियम पाळा. I repeat, आम्ही नीट बोलतो याचा अर्थ आम्हाला शिव्या देता येत नाहीत असं समजू नका! Racist शब्द वापरू नका, नाहीतर एकेरीवर यायला आम्हाला फार वेळ लागणार नाही!
ReplyDeleteजबरी लिहिलंस रे... मी अपर्णाच्या प्रतिक्रियेला दुजोरा देऊ इच्छीतो.
ReplyDeleteउशीरा प्रतिक्रियेबद्द्ल क्षमस्व :(
प्रिय हेरंब,
ReplyDeleteयार कमाल केलीस.क मा ल .
ह्या विषयावरचे कुठेही म्हणजे अगदी कुठेही इतके एकटाकी,मस्त,मुद्देसूद नि विषयाला धरून केलेले लिखाण माझ्या पाहण्यात नाही.ह्यातला प्रत्येक मुद्दा नि मुद्दा वास्तवतेचा विचार करायला लावणारा आहे.लिखाण करतांना ज्याला आपण एक तार म्हणतोना तार,तशी लागली होती तुझी.आता एक मात्र झालं इथे वारंवार येण होणार.
धन्यवाद.
आणि दुसरे असे कि विषय धारदार आहे अगदी सुरी सारखा.म्हटल तर लोणी हि कापता येईल नि म्हटल तर अगदी खून सुध्धा होऊ शकतो.ती वापरायची कशी हे मात्र ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे.आणि हे सगळं तुला माहिती असून हि कॉमेंट पोस्ट मध्ये अप्रुव्हलचे जोखड/झेंगट काढून फेकून द्यायचे जे धाडस तुझ्यात आहे त्याला माझा मना पासून सलाम.अनामिकपणे अर्वाच्य भाषेत "लीव्नार्या" सगळ्यांना तु जोरात चपराक ठेऊन दिली आहेस हे तुझा मार सहन न झालेल्या काहींच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येतंय बर का?खरे तर आपआपल्या पद्धतीने चांगल्या सभ्य भाषेत मग ते उपहासात्मक का असेना विचार व्यक्त करायला कोणीच हरकत घेता कामा नये पण म्हणतात ना कि खाई त्याला खवखवे.दुसर काय?
ReplyDeletethanks vikram,
ReplyDeleteya bhatana apan tanchi jaga dakvoch. hacha pan bhandarkar karoo..
हाकला रे या अनामिकाला...
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteहा डोमकावळा फार कावकाव करतोय. या ब्लॉगवरून अनामिक पोस्टिंग करणं ब्लॉक नाही का करता येणार? आणि मुख्य म्हणजे या हरामखोराच्या (ही मी फारच सौम्य शिवी दिली आहे. याची वास्तविक आयमाय उद्धरणं कठीण नाही, पण हा ब्लॉग पब्लिक असल्यामुळे सध्या ‘हरामखोर’ वर भागवतोय.) सगळ्या पोस्ट्स डिलिट कर.
हाहा.. आसूड आहे हा लेख... दुर्दैव "Anonymous"चं... त्याला समजेना ते नक्की कशावर ओढले गेले. त्याला फक्त शब्दार्थ समजले, मतितार्थ नाही...
ReplyDelete@संकेत आपटे: अरे असा मागास विचार असलेल्यांच्या मतां बाबतित एवढा रागराग करु नकोस. नको तेथे शक्ती वाया घालवण्यात अर्थ नाही.
बाकी दुर्दैव कि सद्ध्या फुटीचे राजकारण खेळुन भविष्यातला इतिहास (बि)घडवणारे, परके नसून आपलेच आहेत.
@ सौरभ,
ReplyDeleteवास्तविक मी तसा शांत मुलगा आहे. माझी कधीच कोणाशीही भांडणं होत नाहीत. पण त्या अनामिकाच्या भाषेने माझं रक्त उसळलं. भटांना त्यांची जागा दाखवून देऊ? त्यांचा भांडारकर करू? एवढ्या ओपनली धमकी देण्याची जर याची हिंमत आहे तर मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. मी का म्हणून ऐकून घ्यायचं माझ्या जातीच्या विरोधात बोललेलं? आणि समजतो कोण हा स्वतःला? अरे जा, काय करायचं ते कर! आम्ही ब्राम्हण घाबरणार नाही तुझ्यासारख्या भिजलेल्या कुत्र्याला!
Anyway, काहीबाही बोलून उगाचच लोकांचा संताप वाढवायचा आणि त्यानिमित्ताने या ब्लॉगवाचकांमध्ये भांडणं लावायची असा हेतू आहे या अनामिकाचा. त्यामुळे सौरभ, तुझा सल्ला मानतोय मी. आता यापुढे दुर्लक्ष करण्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही...
प्रिय मित्र अनामिक यास,
ReplyDeleteअमेरिकेतले लोक सुधारलेले असतात हे तूच मांडलेलं गृहीतक पुढे रेटायचं झाल्यास तू संपूर्ण भारताला मागासलेला म्हणतो आहेस हे तुला कळतंय का बेअक्कल मुर्ख माणसा?
आणि तुझी दुसरी प्रतिक्रिया तुझं विंग्रजीचं शिक्षण कितपत झालं असावं आणि तुला उपरोध या (आमच्या) मराठी भाषेतल्या अलंकाराविषयी किती अक्कल असेल (नसेल) याची साक्ष देते.
कारण इंग्रजीत Vikrant असं लिहिलं की त्याचा मराठी उच्चार विक्रम असा नाही तर विक्रांत असा होतो. दुसरा मुद्दा म्हणजे मी जेवढ्या उपरोधिकपणे हा लेख लिहिला आहे तेवढ्याच उपरोधिकपणे विक्रांतने तुझ्यासारख्या हलकट लोकांची लाज काढली आहे हे तुझ्या फुटक्या मेंदूत घुसतंय का?
तिसरी गोष्ट.............. जोक्स अपार्ट !!!!!!!
पुन्हा बुरख्याआड लपून, चेहरे लपवून माझ्या ब्लॉगवर विचारमैथुन करायला आलास तर तुझ्या ब्रिगेडच्याच भाषेत "मी भर चौकात नागडं करून तुला झोडेन" हे लक्षात ठेव. तू कोण आहेस हे मला माहित नाही असं वाटलं की काय तुला? मुर्खा, या भ्रमात राहू नकोस. ज्याला त्याच्या ब्लॉगवर मी दिलेली 'बोलू वाकुडे कवतुके' ही प्रतिक्रिया जशीच्या तशी कॉपी करूनही माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया म्हणून टाकता येत नाही त्या मुर्ख माणसाला नादी मला लागायचं नाही. पुन्हा इथे येऊन घाण केलीस तर तुझी वरात निघेल हे नक्की समज. !!!!!!!!!!!!!
संकेत, मी हजर नसताना माझ्या वतीने मित्रवर्य अनामिक यांस ठोकल्याबद्दल अनेक आभार.. अरे पण जाऊदे आता.. त्याला व्यवस्थित धुतलाय मी आता. पुन्हा येऊन त्याने प्रतिक्रिया दिली तर तो संपलाच !!! सोडून दे.. तु त्रास करुन्म घेऊ नकोस.
ReplyDeleteआनंद, अरे अपर्णाला सांगितलं तेच तुला सांगतो. हा लेख कोणाच्याही (कुठल्याही जातीच्या) बाजूचा नाही आणि कोणाच्याही (कुठल्याही जातीच्या) विरुद्ध नाही. कुठल्याही एका जातीच्या लोकांनी कुठल्याही अन्य जातीच्या लोकांवर निव्वळ ते त्या जातीचे आहेत म्हणून शाब्दिक/शारीरिक हल्ले केले तरी मी दर वेळी पेटून उठून त्यांना असाच फोडेन याबद्दल शंका नसावी. !! आणि क्षमस्वची आवश्यकता खरंच आहे???????
ReplyDeleteप्रिय mynac दादा,
ReplyDeleteखूप आभार.. बाप रे दोन प्रतिक्रियांमध्ये दोन डझन कौतुकाचे शब्द? बाप रे.. हरभर्याचं झाड कोसळलं रे ;)
असो.. अरे गेले कित्येक दिवस या अशा सडक्या आणि पूर्वग्रहदुषित ब्लॉग्जवर हे असले प्रकार चालू आहेत आणि पुरावे म्हणून बातम्या आलेल्या पेपर्सचे कटआउटस देतात आणि ते पेपर कुठले तर कुठलेतरी फाटके लोकल गल्लीतले पेपर. यांच्या प्रत्येक ब्लॉगपोस्ट मध्ये विखार एवढा ठासून भरलेला असतो की खरंच असह्य होतं. हे सगळं इतके दिवस साचलेलं या पोस्टमधून बाहेर निघालं.
आणि अप्रुव्हल बद्दल आणि वर्ड व्हेरिफिकेशन बद्दल म्हणशील तर मी ते दोन्ही फार फार पूर्वीच काढून टाकलंय. धाडस वगैरे असं काही नाही रे पण असंच उगाच ते प्रकार म्हणजे वाचक आणि ब्लॉग यांच्या कम्युनिकेशनमधला अडथळा वाटले मला. अर्थात महिला ब्लॉगर्सनी अप्रुव्हल ठेवणं हे योग्यच आहे.. असो.. एवढ्या सविस्तर आणि एनकरेजिंग प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. अशा प्रतिक्रिया लिहिण्याचं बळ आणि हुरूप वाढवतात. !!
विक्रांता, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन... तुला बरगड्डी सदस्यत्व नक्की मिळणार !!!! तुझ्या प्रतिक्रियेमुळे त्या पळपुट्या अनामिकाला तू त्याचा मित्र वाटायला लागला आहेस.. सांभाळ रे बाबा !!! ;)
ReplyDeleteअरे 'त्यांच्या' त्या जालीम, जहाल, विखारी पोस्ट्स वाचून मीही असाच नेहमी गडबडा लोळतो, फुटतो.. ;)
सौरभ, खूप आभार.. !!
ReplyDeleteअगदी अगदी.. चि. अनामिकला नक्की काय लिहिलंय, कशावर लिहिलंय, का लिहिलंय, कशाबद्दल लिहिलंय या कशाकशाचीच काहीच टोटल लागलेली नाही !!!!
>> सद्ध्या फुटीचे राजकारण खेळुन भविष्यातला इतिहास (बि)घडवणारे, परके नसून आपलेच आहेत.
यापरतं दुर्भाग्य ते कुठलं रे !!! पण लक्षात कोण घेतो !!!!!!!
हेरंब,
ReplyDeleteकुठे त्या अनामिकाच्या जहाल/तिखट प्रतिक्रिया आणि कुठे तुझा बाळालाही बोध होईल असा बाळबोध लेख.
कितीही अर्ज- विनंत्या केल्यास तरी तुला 'तिथे' प्रवेश मिळणार नाही.
Don't worry Be happy:))
arthantar
अतिशय जबरी पोस्ट आहे, अशा अनामिक लोकाना खरोखर फोडले पाहिजे, स्वताची ओळख दाखवायला ज्यांना लाज वाटते त्यांना फारच जोरदार चपराक मारलीस त्या बद्दल आभार
ReplyDeleteकाय राव ! अशी चेष्टा करायची आसती का ! आता न्हाइ आमाला उच्चारता येत शब्द "ब्राम्हण" मंग तुमि आसं बोलनार ! आता न्हाइ आमाला डोकि म्हुनशान तर मंग हात चालवुन भांडारकर फ़ोडिले ना !
ReplyDeleteहा हा हा!
हेरंब भन्नाट लेख ! मि हि चौकशी केली आणि कळले कि ब्राम्हणाना चुकलो चुकलो 'बामणाना येथे प्रवेश नाही"!!!! नाही तर मी ऑफर पण दिलि होती कि तुमचे बोलणे शुध्द करुन दाखवतो :-) !!!
आभार अनामिक-१ आणि २
ReplyDeleteमहेश, :D.. आभार.. एखाद्या जातीचा/धर्माचा/समाजाचा आंधळा द्वेष हाच ज्या संघटने(!!)चा पाया असतो त्या संघटनेत आपल्याला प्रवेश नसणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. फक्त यांचं द्वेषपूर्ण लेखन फारच वाढलं होतं तेव्हा थोडी चपराक मारावी म्हणून हे लिहिलं.. आभार आणि ब्लोगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
ReplyDeleteExcellent article Heramb,
ReplyDeleteWe have Opened fight with BGrade on Facebook Please join us.
Kind regards
Aniruddha Kulkarni
जेम्स लेनला १४ बामणांनी काय सांगितले???
by Kulkarni Aniruddha on Thursday, December 9, 2010 at 9:45am
मित्रहो, मला सांगा. जेम्स लेन नावाचा एक माणूस येतो..म्हणतो मला तुमच्या (मराठा) संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे..आणि तुमची संस्था (भांडारकर) इतिहासाशी अतिशय निगडीत आहे. असे म्हटल्यावर कोण नाही म्हणेल? प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी महाराजांबद्दल किती बोलू आणि किती नको असे झालेले असते. त्या १४ भटांना सुद्धा झाले नसेल काय? का ते वाटच पाहत होते..कधी एकदा जेम्स लेन येतो आणि आम्ही शिवाजीची बदनामी करतो? त्या १४ भटांनी जेम्स लेन ला काय सांगितले हे या ब्रिगेडवाल्यांना माहित आहे काय? आता जेम्स लेनने काशी घातली..त्यात या बामणांचा काय दोष?
एक उदाहरण देतो.. बघा पटतंय का!
अजमल कसाब ने मुंबई किनार्यावर उतरल्यावर एका घरात पाणी मागितले.. त्याला ते मिळाले.. शिवाय त्याला शिवाजी टर्मिनस चा पत्ता देखील एका माणसाने सांगितला..आता तुम्ही ज्या बाईने त्याला पाणी दिले आणि ज्या माणसाने त्याला पत्ता दिला त्यांना देशद्रोही म्हणणार का? "अतिथी देवो भव" अशी आपली सभ्यता आहे न? मग कसाब कशासाठी आला होता हे त्यांना माहित असणार होते का?
तसेच जेम्स लेन अश्या काही गोष्टी लिहिणार आहे हे त्या १४ बामनांना माहित तरी होते का? मग कशाला तुम्ही त्यांच्या नावाने शंख करताय? तुमच्या अश्या वागण्याने उद्या ब्रह्मदेव जरी आला आणि म्हणाला कि मला शिवाजी महाराजांची माहिती द्या..तरी कोणी शिवाजीच्या विषयी एक शब्द सुद्धा काढणार नाही..काय माहित उद्या ब्रह्मदेवाने आई घातली तर ब्रिगेडवाले बसलेतच त्याची मारायला.
अरे अडाणचोट ब्रिगेड वाले लोकहो! कळतेय का तुम्हाला काही? डोक्यात शिरतेय का तुमच्या मी काय म्हणतो ते?
त्या १४ भटांनी महाराजांविरुद्ध काहीही सांगितले नाही (कुठलाही 'मराठा' असे कृत्य करणार नाही). त्या १४ लोकांना कोणीही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी आपले आयुष्य इतिहासासाठी खर्ची घातले आहे. अरे त्या बाबा पुरंदरे सारखी एक लाईन तरी लिहून दाखवा (पुस्तक राहू द्यात, तेवढी तुमची अक्कल देखील नाही), तुमच्या टांगे खालून जाईन. अरे त्याचे केस पांढरे झाले शिवाजीसाठी. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला त्यांच्या विषयी अनुद्गार काढताना. म्हणे पुरंदरे सातवी पास होते..ते कसले इतिहास संशोधक! अरे तुमच्या शिर्मंत कोकाटेला जे MA (History) करून जमले नाही ते बाबा पुरंदरेने करून दाखवले आहे.
पुन्हा त्या १४ बामनांचे नाव घ्यायचे नाही..आधी पुरावा आणा, त्यांनी जेम्स लेनला नेमके काय सांगितले याचा..आणि मग आरोप करा..
(काही व्यक्तींचे मी एकेरी उल्लेख केले आहेत कारण ब्रिगेडच्या लोकांना ओळखीचे वाटावेत आणि वाचता यावेत म्हणून )
मित्रहो, ब्रिगेड च्या प्रत्येक समाजद्रोही विधानाला जशास तसे उत्तर द्या. जसे जमेल तसे..
Nice article
ReplyDeleteWe have opened fight with BGrade on FB
Please join us on FB
Aniruddha Kulkarni
जेम्स लेनला १४ बामणांनी काय सांगितले???
http://www.facebook.com/home.php?#!/note.php?note_id=134757619914784
अनिरुद्ध, अतिशय उत्तम.. या लोकांच्या पालथ्या घड्यात काही शिरायचं नाही. पण अर्थात म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाहीत असं मात्र नाही..
ReplyDeleteसोशल नेटवर्किंग साईट्सवर मी जरा कमीच असतो. तरी फेसबुकवर आज एक चक्कर मारून येईन तुमच्या पेजवर. धन्यवाद.
ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा..
ह्या लेखावर माझी प्रतिक्रिया नाही?? असे कसे होईल? सुटला की काय... :(
ReplyDeleteतू लेख छान लिहिला आहेस.. सत्य परिस्थिती एकदम...
पण.. काल जे काही झाले आहे त्यानंतर ...
'महाराज आम्हाला क्षमा करा'
अशी याचना करण्याच्या लायकीचे तरी राहिलो आहोत का आपण... आता काही बोलावे ते समजतच नाही... कितीही दाबले तर किनाऱ्यावरच्या वाळूप्रमाणे सर्व काही निसटून जात आहे...
.
.
"रोने का अलाउड नाही है बॉस... रोना आता है तो पिशाब करनेका.. सारा पानी बाहर... "
हो रे रोहणा, तुझी प्रतिक्रिया या लेखावर नाही हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं.. म्हटलं तू 'गडा'वरून 'मोहिमे'वर आलास की देशील प्रतिक्रिया.
ReplyDeleteतेव्हा जे फालतू प्रकार चालू होते त्याला वैतागून ही पोस्ट टाकली होती पण आता परवा जे घडलं आहे ते पाहता विनाश जवळ आला आहे असंच म्हणावंसं वाटतं. या देशी तालिबान्यांच्या हातात सत्ता गेली तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक र्हास अटळ रे !!! :(
>> रोने का अलाउड नाही है बॉस... रोना आता है तो पिशाब करनेका.. सारा पानी बाहर...
दुर्दैवाने खरं आहे हे :((
"एखाद्याला ‘महार’ किंवा ‘चांभार’ म्हणणं हे आजकाल जातीभेदाचं किंवा Racism चं लक्षण मानलं जातं. मग ब्राह्मणांना ‘बामण’ किंवा ‘भट’ म्हणणं हाही Racism च आहे! शिव्या आम्हीही देऊ शकतो, पण तेवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची इच्छा नाही कोणाची. पण याचा अर्थ असा होत नाही की, ब्राह्मणांच्या विरोधात कोणीही आणि काहीही बोललं तर त्याला प्रतिकार होणार नाही! We don't retaliate because we do not believe in fights and altercations. It does not in any way imply that, we lack courage to retaliate. Do not mistake our composure for our timidity! Mind your language while posting!"
ReplyDeleteसंकेत माझा त्रास वाचवलास रे... :)
मी हा पोष्ट खूप आधी वाचला होता, पण त्याखालच्या comments वाचल्या नाहीत... छे... चूक झाली, गम्मत इथेही होती तर...
हेरंब, comment आत्ता देत असलो तरी blog आधीपासूनच वाचतो आहे... अर्थातच छान लिहितोस, महत्वाचे म्हणजे अभ्यासपूर्वक...
मग लेख, ओसामा, ओबामा, बी-ग्रेड कशावरचाही असुदे...
बी-ग्रेडी अनामिकांना, तुम्ही असेच भेट देत चला, comment टाकत चला... त्याशिवाय मजा नाही यारो, काहीतरी फालतू वाचायची इच्छा झाली तर काय करावं नाहीतर आमच्यासारख्याने, नाही का?
तुमच्या अंगात दम नसेल तर घाबरू नका, नाव लपवा, पण comment द्या... धन्यवाद...
ॐकार, धन्यवाद. हल्ली तर या बी-ग्रेडी कुत्र्यांचं प्रस्थ अतीच वाढलंय. उगाच जातीपातीवरून सतत कुरापती काढत राहतात !!
ReplyDeleteअसो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
धन्यवाद ॐकार,
ReplyDeleteअरे हे असले दळभद्री बी-ग्रेडी लोक सुधारणार नाहीत. यांचे नेते उगाच जातीपातीच्या नावावर राजकारण करत राहतात आणि या मठ्ठ लोकांना ते दिसतही नाही !! असो.. इलाज नाही..
प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
tumhihi B grade cha vatlat
ReplyDeleteKay pratikriya aani tyala tumchi uttara
हंसराज्ज्ज्या, गेट वेल सून रे बाबा !!
ReplyDelete