* भाग १ इथे वाचा
* भाग २ इथे वाचा
एवढ्यात अचानक जोरात चित्कारल्याचा आवाज आला. तो आमच्यातल्याच एकाचा आवाज होता आणि तो आनंदातिशयाने ओरडत होता. तो बाकी ग्रुपच्या थोडा पुढे होता आणि खाणाखुणा करून आम्हाला बोलवत होता. त्याचा तो आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून सगळेजण अक्षरशः धावतच त्याच्याकडे गेलो. तो जिकडे उभा होता तिथून पायथा, रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी ओलांडलेला पोल्ट्री फार्म दिसत होता. बघता बघता आमचे चेहरे उजळले. काय करावं काही सुचेना. वेड्यासारखे ओरडत एकदा त्या पोल्ट्री फार्मकडे आणि एकदा एकमेकांच्या चेहर्यांकडे बघत होतो. प्रचंड आनंद झाला होता. लवकरच या दिवसभराच्या कटकटीतून आम्ही सुटणार होतो. पण... !!!
आमच्या फुग्याला क्षणभरातच टाचणी लागली. खालचा रस्ता, पोल्ट्री फार्म वगैरे सगळं दिसत होतं पण दिसत नव्हती ती एकच गोष्ट. आम्ही उभे होतो त्या टेकडीवरून खाली त्या पोल्ट्री फार्मपर्यंत जाण्याची वाट...... !!!!
पक्की वाट नाही की साधी छोटीशी पायवाट नाही. उलट सगळीकडे एक तर वाळलेलं गवत होतं किंवा मग निसरडे खडक.आता मात्र चांगलंच टेन्शन यायला लागलं होतं. दिवसभर पुरवून पुरवून वापरलेला पेशन्स आता मात्र संपला होता. सकाळपासून एकही गोष्ट धड झाली नव्हती. अर्थात सारखं सारखं तेच तेच रडगाणं गाऊनही उपयोग नव्हता. साडेपाच होत आले होते. बघता बघता आकाशातला सोनेरी रंग कमीकमी होत जात होता. लवकरच अंधार पडणार होता त्यामुळे तातडीने काहीतरी करायला लागणार होतं. आम्ही निर्णय घेतला. इथून उतरत खाली जाणं तर शक्य नव्हतं, आमच्या हातात वेळही नव्हता. आम्हाला एकच मार्ग सुचत होता, एकच पर्याय दिसत होता. आता विचार केला तर त्या पर्यायाला तितकासा अर्थ नव्हता हे लगेच लक्षात येतं. पण त्यावेळी तरी आमची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटली असावी.
आम्ही खाली पोचू शकत नसल्याने खालच्यांचं (जे तिथे होते की नव्हते हेही आम्हाला दिसत नव्हतं) लक्ष आमच्याकडे वेधून घेणं हा एकमेव पर्याय आम्हाला दिसत होता. अर्थात खाली असलेल्या लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं तरी "आम्ही चुकलो आहोत, खाली यायचा रस्ता कुठून आहे?" वगैरे गोष्टी आम्ही त्यांना कशा विचारणार होतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आणि तेव्हाही आमच्याकडे नव्हतं. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही कोणी एवढा विचारही केला नव्हता.....
आमच्याकडे जुनी वर्तमानपत्रं होती. आमच्याकडे काडेपेटी होती. लक्ष वेधून घेण्याचा एकमेव मार्ग आम्हाला दिसत होता. बघता बघता वर्तमानपत्रांच्या गुंडाळ्या केल्या गेल्या आणि त्यांच्या टोकाशी पेटती काडी धरण्यात आली. सगळे कागद एकदम संपू नयेत म्हणून एका वेळी एकच वर्तमानपत्र पेटवण्याची हुशारी (!!) आम्ही दाखवत होतो. खरंच खाली कोणी होतं की नाही याचाही काही अंदाज येत नव्हता. पेटवलेलं वर्तमानपत्र जोरजोरात हलवून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आमचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते. एकेक करत कागद संपत चाललेले बघून आमचा दिवसभर ताणून धरलेला उरला सुरला पेशन्सही संपला. कदाचित एकच पेटवलेला पेपर त्यांना दिसत नसेल म्हणून आम्ही उरलेले सगळे पेपर एका वेळी पेटवण्याचं ठरवलं आणि बघता बघता ते पेटवलेही. शेवटचा पेपर जाळून संपत चालला होता. पण ढिम्म........ शून्य.......... खाली (न)असलेल्या कोणालाही वर काय चाललंय इकडे लक्ष देण्याची काहीएक फिकीर पडली नव्हती. शेवटचा कागद अगदी बोटाला चटका बसेल इतक्या अखेरच्या क्षणापर्यंत हातात धरला गेला होता. हाताला जेव्हा चांगलाच चटका बसला त्यावेळी तो कागद हातातून खाली पडला. आणि खल्लास.........
एवढा वेळ शहाण्यासारखं आमच्याकडे पाहणार्या आणि आमच्या सभोवती जिकडे नजर जाईल तिथवर पसरलेल्या त्या वाळलेल्या गवताने बघता बघता पेट घेतला. अचानक सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या. ती आग विझवण्याचे आकाशाला ठिगळ लावण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न करून झाले. पण आग काही दाद देईना.... !!!
त्यानंतर जे झालं ते कसं झालं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही आठवत नाहीये. अंधुक अंधुकसं एवढं मात्र नक्की आठवतंय की बघावं तिकडे मोठमोठ्या ज्वाळांचं तांडव चालू होतं. ती धग असह्य झाल्यावर, पायाखालचं गवत जळायला लागल्यावर आमच्यातल्या प्रत्येकाने काहीही विचार न करता जिथून दिसेल तिथून, जिथून सुचेल तिथून खालच्या दिशेने उड्या घेतल्या. खरचटत, धडपडत, घसरत, पडत खाली आलो. काही मिनिटांपूर्वी इथून कसं उतरायचं वगैरेचे भंपक विचार करणारे आम्ही पाचव्या मिनिटाला (धडपडत का होईना पण) खाली आलो होतो. जवळपास प्रत्येकाचे गुढगे फुटले होते. कोपर, दंड, पाठ, मनगट अशा कुठल्या ना कुठल्या अवयवावर रक्तदान केल्याच्या खुणा उमटल्या होत्या. केस पिंजारले होते. चेहरे धुळीने माखले होते. पण कोणालाही त्याचं कसलंही दुःख नव्हतं. वाईट रीतीने अडकलेलो असताना अचानक सुटका झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. त्यासमोर या जखमा वगैरे फारच क्षुल्लक होत्या.
अजूनही तो पोल्ट्री फार्म अगदी जवळ असा नव्हता पण तिथपर्यंत जाण्याची वाट मात्र चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. पोल्ट्री फार्म क्रॉस केला की आम्ही सुटणार होतो. जसजसा तो पोल्ट्री फार्म जवळ यायला लागला तसतसा आमचा उत्साह वाढत चालला होता.
आम्ही एव्हाना त्या फार्मच्या एवढे जवळ येऊन पोचलो होतो की दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पहिली म्हणजे सकाळी जाताना लागलेला पोल्ट्री फार्म आणि आम्हाला आत्ता समोर दिसत असलेला फार्म वेगवेगळे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला साधारण १५-२० घरांचा एक पाडा (छोटं गाव) होता. अचानक इतका वेळ विसरलेल्या किंवा दाबून ठेवलेल्या तहान-भूक वगैरे वगैरेची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. पण तो पाडा इतका छोटा दिसत होता की तिथे खायला वगैरे काही मिळणं ही गोष्ट अगदीच दुरापास्त होती. पण निदान पाणी तरी नक्की मिळेल या आशेने आम्ही तिथल्या पहिल्या घरासमोर जाऊन उभे राहिलो आणि पाणी द्यायची विनंती केली. त्यांनी जणु आमच्या स्वागतासाठी पाणी तयारच ठेवलेलं असल्यागत भराभर पाण्याने भरलेले तांब्ये आमच्या हातात दिले.
खरंच सांगतो, आयुष्यात एका वेळी एकदम प्यायलं नसेल एवढं पाणी त्यादिवशी पहिल्यांदा प्यायलो. तहान भागल्यावरही निव्वळ प्यायचं म्हणून प्यायलो, चेहर्यावर ओतलं, मानेवर ओतलं, हात धुतले. पुन्हा भरपूर पाणी प्यायलो. पुन्हा पुन्हा प्यायलो. पाणी पिऊन मस्त ताजेतवाने होऊन आम्ही निघणार एवढ्यात..........
एवढ्यात तिथल्या एका माणसाने आमची वाट अडवली........ !!!!!!!!!!
क्रमशः
- भाग ४ इथे वाचा.
* भाग २ इथे वाचा
एवढ्यात अचानक जोरात चित्कारल्याचा आवाज आला. तो आमच्यातल्याच एकाचा आवाज होता आणि तो आनंदातिशयाने ओरडत होता. तो बाकी ग्रुपच्या थोडा पुढे होता आणि खाणाखुणा करून आम्हाला बोलवत होता. त्याचा तो आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून सगळेजण अक्षरशः धावतच त्याच्याकडे गेलो. तो जिकडे उभा होता तिथून पायथा, रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी ओलांडलेला पोल्ट्री फार्म दिसत होता. बघता बघता आमचे चेहरे उजळले. काय करावं काही सुचेना. वेड्यासारखे ओरडत एकदा त्या पोल्ट्री फार्मकडे आणि एकदा एकमेकांच्या चेहर्यांकडे बघत होतो. प्रचंड आनंद झाला होता. लवकरच या दिवसभराच्या कटकटीतून आम्ही सुटणार होतो. पण... !!!
आमच्या फुग्याला क्षणभरातच टाचणी लागली. खालचा रस्ता, पोल्ट्री फार्म वगैरे सगळं दिसत होतं पण दिसत नव्हती ती एकच गोष्ट. आम्ही उभे होतो त्या टेकडीवरून खाली त्या पोल्ट्री फार्मपर्यंत जाण्याची वाट...... !!!!
पक्की वाट नाही की साधी छोटीशी पायवाट नाही. उलट सगळीकडे एक तर वाळलेलं गवत होतं किंवा मग निसरडे खडक.आता मात्र चांगलंच टेन्शन यायला लागलं होतं. दिवसभर पुरवून पुरवून वापरलेला पेशन्स आता मात्र संपला होता. सकाळपासून एकही गोष्ट धड झाली नव्हती. अर्थात सारखं सारखं तेच तेच रडगाणं गाऊनही उपयोग नव्हता. साडेपाच होत आले होते. बघता बघता आकाशातला सोनेरी रंग कमीकमी होत जात होता. लवकरच अंधार पडणार होता त्यामुळे तातडीने काहीतरी करायला लागणार होतं. आम्ही निर्णय घेतला. इथून उतरत खाली जाणं तर शक्य नव्हतं, आमच्या हातात वेळही नव्हता. आम्हाला एकच मार्ग सुचत होता, एकच पर्याय दिसत होता. आता विचार केला तर त्या पर्यायाला तितकासा अर्थ नव्हता हे लगेच लक्षात येतं. पण त्यावेळी तरी आमची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटली असावी.
आम्ही खाली पोचू शकत नसल्याने खालच्यांचं (जे तिथे होते की नव्हते हेही आम्हाला दिसत नव्हतं) लक्ष आमच्याकडे वेधून घेणं हा एकमेव पर्याय आम्हाला दिसत होता. अर्थात खाली असलेल्या लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं तरी "आम्ही चुकलो आहोत, खाली यायचा रस्ता कुठून आहे?" वगैरे गोष्टी आम्ही त्यांना कशा विचारणार होतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आणि तेव्हाही आमच्याकडे नव्हतं. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही कोणी एवढा विचारही केला नव्हता.....
आमच्याकडे जुनी वर्तमानपत्रं होती. आमच्याकडे काडेपेटी होती. लक्ष वेधून घेण्याचा एकमेव मार्ग आम्हाला दिसत होता. बघता बघता वर्तमानपत्रांच्या गुंडाळ्या केल्या गेल्या आणि त्यांच्या टोकाशी पेटती काडी धरण्यात आली. सगळे कागद एकदम संपू नयेत म्हणून एका वेळी एकच वर्तमानपत्र पेटवण्याची हुशारी (!!) आम्ही दाखवत होतो. खरंच खाली कोणी होतं की नाही याचाही काही अंदाज येत नव्हता. पेटवलेलं वर्तमानपत्र जोरजोरात हलवून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आमचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते. एकेक करत कागद संपत चाललेले बघून आमचा दिवसभर ताणून धरलेला उरला सुरला पेशन्सही संपला. कदाचित एकच पेटवलेला पेपर त्यांना दिसत नसेल म्हणून आम्ही उरलेले सगळे पेपर एका वेळी पेटवण्याचं ठरवलं आणि बघता बघता ते पेटवलेही. शेवटचा पेपर जाळून संपत चालला होता. पण ढिम्म........ शून्य.......... खाली (न)असलेल्या कोणालाही वर काय चाललंय इकडे लक्ष देण्याची काहीएक फिकीर पडली नव्हती. शेवटचा कागद अगदी बोटाला चटका बसेल इतक्या अखेरच्या क्षणापर्यंत हातात धरला गेला होता. हाताला जेव्हा चांगलाच चटका बसला त्यावेळी तो कागद हातातून खाली पडला. आणि खल्लास.........
एवढा वेळ शहाण्यासारखं आमच्याकडे पाहणार्या आणि आमच्या सभोवती जिकडे नजर जाईल तिथवर पसरलेल्या त्या वाळलेल्या गवताने बघता बघता पेट घेतला. अचानक सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या. ती आग विझवण्याचे आकाशाला ठिगळ लावण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न करून झाले. पण आग काही दाद देईना.... !!!
त्यानंतर जे झालं ते कसं झालं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही आठवत नाहीये. अंधुक अंधुकसं एवढं मात्र नक्की आठवतंय की बघावं तिकडे मोठमोठ्या ज्वाळांचं तांडव चालू होतं. ती धग असह्य झाल्यावर, पायाखालचं गवत जळायला लागल्यावर आमच्यातल्या प्रत्येकाने काहीही विचार न करता जिथून दिसेल तिथून, जिथून सुचेल तिथून खालच्या दिशेने उड्या घेतल्या. खरचटत, धडपडत, घसरत, पडत खाली आलो. काही मिनिटांपूर्वी इथून कसं उतरायचं वगैरेचे भंपक विचार करणारे आम्ही पाचव्या मिनिटाला (धडपडत का होईना पण) खाली आलो होतो. जवळपास प्रत्येकाचे गुढगे फुटले होते. कोपर, दंड, पाठ, मनगट अशा कुठल्या ना कुठल्या अवयवावर रक्तदान केल्याच्या खुणा उमटल्या होत्या. केस पिंजारले होते. चेहरे धुळीने माखले होते. पण कोणालाही त्याचं कसलंही दुःख नव्हतं. वाईट रीतीने अडकलेलो असताना अचानक सुटका झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. त्यासमोर या जखमा वगैरे फारच क्षुल्लक होत्या.
अजूनही तो पोल्ट्री फार्म अगदी जवळ असा नव्हता पण तिथपर्यंत जाण्याची वाट मात्र चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. पोल्ट्री फार्म क्रॉस केला की आम्ही सुटणार होतो. जसजसा तो पोल्ट्री फार्म जवळ यायला लागला तसतसा आमचा उत्साह वाढत चालला होता.
आम्ही एव्हाना त्या फार्मच्या एवढे जवळ येऊन पोचलो होतो की दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पहिली म्हणजे सकाळी जाताना लागलेला पोल्ट्री फार्म आणि आम्हाला आत्ता समोर दिसत असलेला फार्म वेगवेगळे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला साधारण १५-२० घरांचा एक पाडा (छोटं गाव) होता. अचानक इतका वेळ विसरलेल्या किंवा दाबून ठेवलेल्या तहान-भूक वगैरे वगैरेची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. पण तो पाडा इतका छोटा दिसत होता की तिथे खायला वगैरे काही मिळणं ही गोष्ट अगदीच दुरापास्त होती. पण निदान पाणी तरी नक्की मिळेल या आशेने आम्ही तिथल्या पहिल्या घरासमोर जाऊन उभे राहिलो आणि पाणी द्यायची विनंती केली. त्यांनी जणु आमच्या स्वागतासाठी पाणी तयारच ठेवलेलं असल्यागत भराभर पाण्याने भरलेले तांब्ये आमच्या हातात दिले.
खरंच सांगतो, आयुष्यात एका वेळी एकदम प्यायलं नसेल एवढं पाणी त्यादिवशी पहिल्यांदा प्यायलो. तहान भागल्यावरही निव्वळ प्यायचं म्हणून प्यायलो, चेहर्यावर ओतलं, मानेवर ओतलं, हात धुतले. पुन्हा भरपूर पाणी प्यायलो. पुन्हा पुन्हा प्यायलो. पाणी पिऊन मस्त ताजेतवाने होऊन आम्ही निघणार एवढ्यात..........
एवढ्यात तिथल्या एका माणसाने आमची वाट अडवली........ !!!!!!!!!!
क्रमशः
- भाग ४ इथे वाचा.